शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

भाजपाच्या समर्थनामुळे जेडीयूत फूट, शरद यादव व अली अनवर करणार बंडखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 17:15 IST

बिहारमधली महाआघाडी फिस्कटल्यानंतर भाजपासोबत सरकार बनवणारे नितीश कुमार यांच्याविरोधात पक्षांतर्गतच राजकारण सुरू झालं आहे. नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेले आमदार बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.

ठळक मुद्देजेडीयूचे नेते शरद यादव आणि अली अनवर बंडखोरी करणार आहेतशरद यादव आज संध्याकाळी अली अनवर आणि पार्टीच्या इतर असंतुष्ट नेत्यांची बैठक घेणार आहेतशरद यादव यांच्या बंडखोरीच्या पवित्र्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपदही दिलं जाऊ शकतं

ऑनलाइन लोकमतपटना, दि. 27 - बिहारमधली महाआघाडी फिस्कटल्यानंतर भाजपासोबत सरकार बनवणारे नितीश कुमार यांच्याविरोधात पक्षांतर्गतच राजकारण सुरू झालं आहे. नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेले आमदार बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. तसेच जेडीयूचे नेते शरद यादव आणि अली अनवर या बंडखोरांना स्वतःच्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.शरद यादव हे नितीश कुमारांच्या शपथविधी सोहळ्यालाही उपस्थित राहिले नव्हते. त्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतल्याचंही खात्रीलायक वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद यादव आज संध्याकाळी अली अनवर आणि पार्टीच्या इतर असंतुष्ट नेत्यांची बैठक घेणार आहेत. शरद यादव यांच्या निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता होणा-या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. शरद यादव यांच्या बंडखोरीच्या पवित्र्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपदही दिलं जाऊ शकतं. जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी आज या सर्व प्रकारावर मीडियासमोर उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. शरद यादव म्हणाले होते, नितीश कुमार यांनी सरकार बनवण्याचा निर्णय खूपच घाईघाईत घेतला होता. एवढ्या लवकर महाआघाडी तोडून भाजपाच्या समर्थनानं सरकार बनवण्याच्या निर्णयाचं मी समर्थन करू शकत नाही. 2013ला भाजपाशी युती तुटल्यानंतर शरद यादव यांनी भाजपावर उघड हल्लाबोल केला होता. तर जेडीयूचे खासदार अली अनवर यांनीही अंतरात्म्याचा आवज ऐकून नितीश कुमाराच्या निर्णयाला समर्थन देऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे. जेडीयू प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले, पक्षाचा हा निर्णय सर्वांच्या संमतीनं घेण्यात आला आहे. ज्यांना या निर्णयावर नाराजी आहे, त्यांनी पक्षाच्या बैठकीत तो मुद्दा उपस्थित केला पाहिजे होता. भाजपासोबत सरकार बनवल्यामुळे नितीश कुमार आरजेडी आणि काँग्रेस यांच्या रडारवर आहेत. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मी न्यायालयीन लढाई लढत आहे. पण मला शिक्षा सुनावताना घाई करण्यात आली. नितीश कुमार आणि भाजपाने रचलेलं हे षडयंत्र होतं', असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. 'नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बिहारमधून बाहेर काढण्यासाठी लोकांनी भाजपाविरोधात जाऊन आम्हाला कौल दिला होता. गोमांस खाल्लं पाहिजे असं मी सांगितल्याचा खोटा प्रचार करण्यात आला, आम्ही जिंकलो तर पाकिस्तानात फटाके फुटतील असंही सांगण्यात आलं होतं', अशी माहिती लालूप्रसाद यादव यांनी दिली. नितीश कुमार खूप मोठे संधीसाधू असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हे प्लानिंग सुरु असल्याची आम्हाला माहिती होती, आपल्या स्वार्थासाठी एखादी व्यक्ती काहीही करु शकते असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. 

'बिहारच्या जनतेने जातीयवादाविरोधात लढा देण्यासाठी नितीश कुमार यांच्या हाती सत्ता दिली होती. मात्र आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली आहे. खरं सांगायचं तर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हे प्लानिंग सुरु असल्याचं आम्हाला माहित होतं. आपल्या स्वार्थासाठी एखादी व्यक्ती काहीही करु शकते', असं राहुल गांधी यांनी सांगितलं. 'भारतामधील राजकारणात हीच मोठी समस्या आहे की, सत्तेसाठी व्यक्ती काहीही करतो. कोणताही नियम नाही, विश्वासार्हता नाही', असंही राहुल गांधी बोलले आहेत.