शहरं
Join us  
Trending Stories
1
iPhone 17 सीरीजचे चार नवे मॉडेल्स लॉन्च, Pro Motion डिस्प्ले, 20 म‍िनिटांत चार्ज; आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
2
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
3
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
4
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
5
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
6
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
7
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
8
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
9
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
10
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
11
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
12
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
13
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
14
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
15
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
16
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
17
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
18
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
19
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?

"...यावरून काँग्रेस आरक्षण संपवणार हे स्पष्ट", राहुल गांधींच्या वक्तव्यावर मायावती संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 13:15 IST

BSP supremo Mayawati : मायावती म्हणाल्या, खरंतर काँग्रेसची सुरुवातीपासूनच आरक्षणविरोधी विचारसरणी आहे.

BSP supremo Mayawati : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन सध्या राजकीय खळबळ उडाली आहे. भाजपच्या सर्व नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. आता बसपा प्रमुख मायावती यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रात दीर्घकाळ सत्तेत असताना काँग्रेस पक्षाच्या सरकारने ओबीसी आरक्षण लागू केले नाही. आता देशात जातीय जनगणना न करणारा हा पक्ष आता सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत आहे. त्यांच्या नाटकाबद्दल जागरुक राहा, जे भविष्यात कधीही जात जनगणना करू शकणार नाहीत, असे मायावती म्हणाल्या.

आता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या या नाटकापासून सावध राहा, त्यांनी परदेशात म्हटले आहे की, जेव्हा भारताची स्थिती चांगली असेल तेव्हा आम्ही एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण संपवू. यावरून काँग्रेस वर्षानुवर्षे त्यांचे आरक्षण संपवण्याचे कारस्थान करत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे मायावती यांनी सांगत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या या जीवघेण्या वक्तव्यापासून या वर्गातील लोकांनी सावध राहावे, कारण हा पक्ष केंद्रात सत्तेवर येताच या विधानाच्या नावाखाली निश्चितपणे त्यांचे आरक्षण संपवेल. संविधान आणि आरक्षण वाचवण्याचे नाटक करणाऱ्या या पक्षाचे भान या लोकांना असलेच पाहिजे, असेही मायावती म्हणाल्या.

पुढे मायावती म्हणाल्या, खरंतर काँग्रेसची सुरुवातीपासूनच आरक्षणविरोधी विचारसरणी आहे. केंद्रातील त्यांच्या सरकारमध्ये त्यांचा आरक्षणाचा कोटा पूर्ण झाला नाही, तेव्हा या पक्षाकडून न्याय न मिळाल्याने बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला. लोकांनी सावध राहावे. तसेच, एकंदरीत, जोपर्यंत देशातून जातिवाद पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत भारताची स्थिती तुलनेने चांगली असूनही या वर्गांची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती सुधारणार नाही. त्यामुळे जातीयवाद पूर्णपणे नष्ट होईपर्यंत आरक्षणाची योग्य घटनात्मक व्यवस्था चालू ठेवणे आवश्यक असल्याचे मायावती यांनी सांगितले.

काय म्हणाले राहुल गांधी?दरम्यान, जातिनिहाय जनगणना आणि आरक्षण या दोन मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मागच्या काही दिवसांपासून कमालीचे आक्रमक आहेत. दरम्यान, सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार? या एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोठं विधान केलं आहे. जेव्हा भारतात आरक्षणाच्या दृष्टीने समानता असेल, तेव्हाच काँग्रेस पक्ष देशामधील आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विचार करेल. सध्यातरी अशी स्थिती नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

टॅग्स :mayawatiमायावतीRahul Gandhiराहुल गांधीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेस