शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सोशल मीडियावर मदत मागणारे, टीका करणाऱ्यांवर कारवाई केल्यास खबरदार - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 06:20 IST

सरकारला दिली तंबी, केंद्रानेच सर्वांचे लसीकरण करण्याचा विचार करावा

नवी दिल्ली : ऑक्सिजनची कमतरता, व्यवस्थेतील त्रुटी आणि केंद्र-राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव अशा अनेक मुद्यांवरून सर्वोच्च न्यायालयानेकेंद्र सरकारवर ताशेरे ओढताना केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर न्यायालयाने बोट ठेवले आहे.  एवढेच नव्हे तर १०० टक्के लसीचे डोस केंद्र सरकारच विकत का घेत नाही, असा प्रश्नही न्यायालयाने केला आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सोशल मीडियावर मदतीबाबत पोस्ट करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, असा इशारा देतानाच सरकारविरोधात अफवा पसरविण्याच्या नावाखाली नागरिकांवर कारवाई केल्यास न्यायालयाच्या आदेशाची अवमानना मानली जाईल, अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १० मे रोजी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने देशातील कोरोना स्थितीबाबत दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर  सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघाडणी केली. सोशल मीडियावर ऑक्सिजन, बेड, औषधी इत्यादींची मदत मागणारे किंवा केंद्र तसेच राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांवर अफवा पसरविण्याच्या नावाखाली गप्प करण्याच्या कृतीवरून न्यायालयाने सरकारला तंबी दिली आहे.

नागरिकांचा आवाज आपण ऐकायला हवा. अशा लोकांवर कारवाई केल्यास न्यायालयाची अवमानना मानली जाईल, अशा इशारा न्यायालयाने केंद्र सरकारसह सर्व राज्य सरकार तसेच पोलीस महासंचालकांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांना विचार करून टिप्पणी करण्याचा सल्लाही दिला आहे. न्यायालयाने केलेली टिप्पणी सोशल मीडियामध्ये व्हायरल होते. पण, आम्ही कुणाच्या विरोधात आहोत किंवा कुणाचे भय आहे, असा अर्थ होत नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

आरोग्य यंत्रणा अपुरी

सुनावणीदरम्यान न्या. डी. वाय. चंद्रचूड म्हणाले, की कोरोनाचे उपचार करणारे फ्रंटलाईन डॉक्टर्स आण‍ि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही उपचारासाठी बेड मिळत नाहीत. गेल्या ७० वर्षांमध्ये उभारण्यात आलेली आरोग्य यंत्रणा अपुरी असून सध्याची परिस्थिती भीषण आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. 

लसीकरणावरून खडे बोल

न्यायालयाने लसीकरणाच्या मुद्यावरून सरकारला खडे बोल सुनावले. गोरगरीब जनता लसीकरणासाठी पैसे मोजू शकणार नाही. गरीब व अशिक्षित लोक ऑनलाईन नोंदणी कशी करू शकतील, असा प्रश्न उपस्थित करताना न्यायालयाने मागासवर्गीयांचे काय, त्यांना खासगी रुग्णालयांच्या दयेवर सोडून द्यावे लागेल का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. 

१००% लसी केंद्राने विकत घ्याव्या...

n न्यायालयाने लसीच्या वेगवेगळ्या दरावरून सवाल केला आहे. केंद्र असो किंवा राज्य, लसी जनतेसाठीच असल्यामुळे वेगवेगळे दर का ठेवण्यात आले, ५० टक्के लसी राज्यांना कधी उपलब्ध होणार, असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले. लसीचा पुरवठा करताना कोणत्या राज्याला किती लसीचे डोस मिळणार, हे लस उत्पादकांना ठरविण्याची परवानगी देता येणार नाही. 

टॅग्स :Courtन्यायालयSocial Mediaसोशल मीडियाCentral Governmentकेंद्र सरकार