शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
9
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
10
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
11
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
12
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
13
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
14
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
16
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
17
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
18
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
19
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
20
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 20:27 IST

जर एखाद्याचे उत्पन्न लाखांमध्ये असेल आणि तो पाच वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने अथवा फसवणूक करून रेशन घेत असेल, तर त्याला किती दंड भरावा लागू शकतो? जाणून घेऊया...

भारत सरकारकडून गरीब आणि गरजू कुटुंबांना मदत म्हणून मोफत रेशन योजना चालवली जाते. याअंतर्गत, पात्र लोकांना अन्नधान्य आणि काही जीवनावश्यक वस्तू मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेचा उद्देश, दारिद्र्यरेषेखालील आणि ज्यांना दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करणेही शक्य नाही, अशा कुटुंबांना आधार देणे आहे.

मात्र, सरकारने या योजनेसंदर्भात काही नियमही निश्चित केले आहेत. याअंतर्गत योजनेसाठी पात्र असलेल्यांनाच मोफत रेशन मिळेते. जर एखाद्याचे उत्पन्न लाखांमध्ये असेल आणि तो पाच वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने अथवा फसवणूक करून रेशन घेत असेल, तर त्याला किती दंड भरावा लागू शकतो? जाणून घेऊया...

कुणाला मिळू शकत नाही सरकारी रेशन?गरजू जणांना रेशन वाटण्यासाठी सरकारने काही नियम निश्चित केले आहेत, जसे की सरकारी नोकरी असणाऱ्यांना या योजनेत समाविष्ट केले जाणार नाही. याशिवाय, ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे अथवा जे आयकर भरतात त्यांनाही मोफत रेशनचा लाभ मिळणार नाही. खरे तर, ज्यांचे वार्षिक उत्पन्न लाखांमध्ये आहे अथवा जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांना या योजनेची आवश्यकता नाही. मोफत रेशन केवळ अशाच गरीब कुटुंबांना दिले जाईल, जे खरोखरच यासाठी पात्र आहेत आणि ज्यांचे उत्पन्न दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठीही पुरेसे नाही, असे सरकारचे म्हणणे आहे.

किती दंड भरावा लागेल? -सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गरीब आणि गरजू कुटुंबांना स्वस्त दरात रेशन पुरवते. मात्र, जर कुणी या योजनेचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये पकडले गेल्यास, केवळ दंडच नाही तर शिक्षेचीही तरतूद आहे. या कालावधीत, सरकार चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या रेशनच्या रकमेइतकी रक्कम वसूल करू शकते. तसेच कालावधी मोठा असेल तर अधिक दंड देखील आकारला जाऊ शकतो.  

टॅग्स :Governmentसरकार