शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

‘कोट्यवधींची श्रद्धा हाच माझ्या जन्मस्थानाचा पुरावा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 06:26 IST

श्रीरामाच्या वतीने सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त जागा हेच माझे जन्मस्थान आहे, याला या देशातील कोट्यवधी भाविकांची निस्सीम श्रद्धा हा सबळ पुरावा आहे, असा युक्तिवाद ‘रामलल्ला विराजमान’ देवतेच्या वतीने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या २.७७ एकर वादग्रस्त जमिनीच्या मालकीच्या वादातून केलेल्या अपिलांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विशेष घटनापीठापुढे दुसऱ्या दिवशीही सुनावणी सुरू राहिली. वादग्रस्त जागेवर कित्येक शतकांच्या कब्जे वहिवाटीने हक्क सांगणाºया ‘निर्मोही आखाडा’ या पक्षकाराचा मंगळवारी अपूर्ण राहिलेला युक्तिवाद पूर्ण झाल्यावर श्री रामलल्लाच्या वतीने ज्येष्ठ वकील के. पराशरन यांनी युक्तिवाद केला.त्यांनी सांगितले की, रामजन्मभूमी हेच हिंदूंसाठी भगवान श्रीरामाचे मूर्तिमंत रूप व श्रद्धास्थान आहे. हजारो वर्षांपूर्वी झालेल्या श्रीरामाच्या जन्माचे ठिकाण नेमके हेच आहे, याचा याहून वेगळा पुरावा तरी कसा देता येईल? श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाला याचे दाखले वाल्मिकी रामायणात तीन ठिकाणी मिळतात.लोकांची श्रद्धा हा कायद्याने ग्राह्य पुरावा होऊ शकतो का? येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहॅममध्ये झाल्याचे भाविक मानतात. पण खरंच तसे आहे का, हा मुद्दा एखाद्या न्यायालयात उपस्थित होऊन त्यात श्रद्धेचा पुरावा दिला गेला आहे का, असा सवाल खंडपीठावरील न्या. शरद बोबडे यांनी केला. त्यावर पराशरन यांनी, ‘लगेच सांंगता येणार नाही. शोध घेऊन सांगेन’, असे उत्तर दिले. अयोध्याच श्रीरामाचे जन्मस्थान मानले जाते, यावर पराशरन जोर देत होते तेव्हा न्यायालयाने विचारले की, तेथील मूर्ती किती जुन्या आहेत, हे ठरविण्यासाठी ‘कार्बन डेटिंग’ तंत्राचा कोणी उपयोग केला आहे का?बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू ६ डिसेंबर १९९२ रोजी उद्ध्वस्त करण्याच्या कित्येक वर्षे आधी तिथे श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यासंबंधी न्यायमूर्तींनी बारकाईने विचारलेल्या प्रश्नांवर पराशरन म्हणाले की, मूर्तीची प्रतिष्ठापना करणे चूक होते की बरोबर हे आधी मंदिर होते की मशीद यावर ठरवावे लागेल. तेथे मूर्ती ठेवणे चूक होते व ती चूक कायम राहिली हे वादासाठी मान्य केले तरी न्यायालयाने हस्तक्षेप करून वादग्रस्त जागा ‘रिसिव्हर’च्या ताब्यात दिली, तेव्हा कथित चूक पुसली गेली. न्यायालयाने नेमलेल्या ‘रिसिव्हर’ने घेतलेला ताबा हे चूक पुढे सुरू ठेवणे असू शकत नाही. रामलल्लाच्या वतीने दावा केला की, वादग्रस्त वास्तू मंदिर होते की मशीद याचा निर्णय तेथे कोणत्या धर्माची उपासना चालायची यावरून केला जाऊ शकतो. त्यादृष्टीने निर्णय मशिदीच्या बाजूने होऊ शकत नाही, कारण तेथे आजही मूर्ती आहेत.पुरावे चोरीला!वादग्रस्त वास्तूवर कब्जे वहिवाटीने हक्क सांगणाऱ्या ‘निर्मोही आखाड्या’स न्यायालयाच्या सरबत्तीस सामोरे जावे लागले. न्यायालयाने आखाड्याचे ज्येष्ठ वकील निर्मलकुमार जैन यांना सांगितले की, तुम्ही कित्येक शतकांच्या वहिवाटीचा हक्क सांगता, मग त्याच्या महसुली दप्तरात नोंदी असतील तर त्या दाखवा.जैन म्हणाले की, मूळ दाव्यात आम्ही सादर केलेल्या पुराव्यांचा ऊहापोह उच्च न्यायालयाच्या निकालपत्रात केला आहे. त्याआधारे मी ते दाखवू शकतो.नंतर जैन यांनी १९८२ मध्ये पडलेल्या दरोड्यात सर्व रेकॉर्ड चोरीला गेल्याने आम्ही कागदोपत्री पुरावा दाखवू शकत नाही, असे सांगितले. त्यावर न्यायालयाने त्यांना शोध घ्या, तयारी करा, असे सांगून पुढील पक्षकाराच्या वकिलास युक्तिवाद सुरू करण्यास सांगितले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या