शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

मुस्लिम असल्यामुळेच आम्हाला टार्गेट केलं जातंय- ओवैसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 17:51 IST

तेलंगणा- हैदराबादेत एका जनसभेला संबोधित करताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

तेलंगणा- हैदराबादेत एका जनसभेला संबोधित करताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राजस्थानातील राजसमंद येथील हत्याकांडाचा हवाला देत असदुद्दीन ओवैसींनी मोदींना लक्ष्य केलं आहे. भाजपा सत्तेत आल्यापासून मुस्लिमांवरील हल्ल्यांच्या घटना वाढतायत. मुस्लिमांसह अल्पसंख्याकांवर निशाणा साधला जातोय. मुस्लिम असल्यामुळे आमच्यासोबत असा दुजाभाव केला जातोय, असंही ओवैसी म्हणाले आहेत.राजस्थानातील राजसमंद येथील एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता. या व्हिडीओत शंभूलाल रेगर नामक व्यक्ती एका मुस्लिम व्यक्तीवर पाठीमागून हल्ला करताना पाहायला मिळतंय. त्यानंतर त्या व्यक्तीला जिवंत पेटवण्यात आलं. शंभूलालनं लव्ह जिहाद रोखण्यासाठी असं केल्याचं सांगत सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला होता. पोलिसांनी शंभूलाल या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकारावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. हत्या करण्यात आलेला माणूस हा पश्चिम बंगालमधील मालदा येथे वास्तव्याला होता. त्यानंतर त्या मुस्लिम व्यक्तीच्या कुटुंबीयांना पश्चिम बंगाल आणि राजस्थान सरकारनंही मदत जाहीर केली आहे.गेल्या काही दिवसांपासून भाजपाशासित राज्यांत अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या आकडेवारीनुसार, देशभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांत प्रत्येक एक लाख दलित लोकसंख्येमागे 20 प्रकरणे दाखल झाली. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गोवा ही राज्ये त्यात पुढे असून, यानंतर बिहार व गुजरात आहेत.मध्य प्रदेशात प्रति एक लाख दलित लोकसंख्येत 43.4 प्रकरणे, राजस्थानात 42, गोव्यात 36.7, बिहारमध्ये 34.4 आणि गुजरातमध्ये 32.5 प्रकरणे दाखल करण्यात आली. मध्य प्रदेशात एकूण 4,922 प्रकरणे दाखल झाली. राजस्थानात 5134 प्रकरणे दाखल झाली. गोव्यात दलितांवरील अत्याचारांची 11 प्रकरणे दाखल झाली असली तरी ते प्रमाण प्रति एक लाख लोकसंख्येमागे 36.7 आहे. चौथ्या क्रमांकावर बिहार आहे. बिहारमध्ये एक वर्षात 5,701 प्रकरणे दाखल झाली. देशातील एकूण प्रकरणात हे 14 टक्के आहे. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी