शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे निमंत्रण घेतले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 05:08 IST

नयनतारा सहगल यांचा आरोप; मराठी साहित्य संमेलनाचा वाद

डेहराडून : यवतमाळ येथे शुक्रवारपासून तीन दिवस आयोजिलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून मला दिलेले निमंत्रण आयोजकांनी महाराष्ट्रातील सत्ताधाºयांच्या राजकीय दबाबामुळेच मागे घेतले, असा आरोप ख्यातनाम लेखिका नयनतारा सहगल यांनी केला आहे.

त्या म्हणाल्या की, माझे विचार काय आहेत, मी कोणत्या स्वरूपाचे लेखन केले आहे, याची संपूर्ण माहिती साहित्य संमेलनाच्या आयोजकांना होती. माझे विचार मी आजवर खुलेपणाने मांडत आले आहे. त्या पार्श्वभूमीवर मला त्यांनी आनंदाने निमंत्रण दिले होते. मी यवतमाळला जायची तयारीही केली होती. मात्र, गेल्या रविवारी मला आयोजकांकडून निमंत्रण रद्द केल्याचा तीन ते चार ओळीचा ई-मेल आला.मोदी सरकारच्या राजवटीत मूलतत्त्ववाद व असहिष्णू वृत्ती वाढत असल्याच्या निषेधार्थ नयनतारा सहगल यांनी २०१५ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला होता. या पुरस्कार वापसीचे नंतर काही मान्यवरांनी अनुकरण केले. सहगल यांनी लिहिलेल्या ‘रीच लाईक अस’ या कादंबरीसाठी १९८६ मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी पुन्हा निमंत्रण धाडले तरी आता आपण तिथे जाणार नसल्याचे त्यांनी सोमवारीच स्पष्ट केले होते. (वृत्तसंस्था)महाराष्ट्राच्याच कन्यानयनतारा सहगल या एक प्रकारे महाराष्ट्राच्याच कन्या आहेत. त्यांचे वडील रणजित पंडित हे मूळचे कोकणवासी. ते विख्यात संस्कृत पंडित होते. त्यांनी कल्हणाच्या राजतरंगिणी या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले होते. स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतल्यामुळे त्यांनी कारावासही भोगला होता. रणजित पंडित यांचे १९४४ मध्ये निधन झाले. नयनतारा या विजयालक्ष्मी पंडित यांची मुलगी व पं. जवाहरलाल नेहरू यांच्या भाची आहेत.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन