शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

मतदार यादीत नाव नसल्याने

By admin | Updated: September 27, 2014 23:43 IST

मतदार यादीत नाव नसल्याने

नाशिक : मतदार यादीत नाव नसल्याने आपल्यावर मोठा अन्याय झाला, नव्हे किंबहुना आपल्या मनात असलेल्या पक्षाला मतदान करूच नये यासाठी हे मोठे षडयंत्रच आहे, असा दावा काही नागरिक आणि राजकीय पक्ष करीत असले, तरी प्रत्यक्षात वेळोवेळी निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांत सुधारणा करण्यासाठी मोहीम राबविली जाते, त्यावेळी उदासीनता दाखविल्यानेच ही परिस्थिती उद्भवली आहे.लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडले. एकीकडे मतदानाचा गतवेळेपेक्षा अधिक उत्साह दिसला, तर दुसरीकडे मतदार यादीत नावेच न सापडल्याने अनेक नागरिक संताप करताना आढळले. मतदार यादीतील ही वगळलेली नावे उच्चभ्रूंचीच होती. इतकेच नव्हे तर विशिष्ट वर्गाचीच नावे हेतुत: रद्द करण्यात आली, असा ठपका ठेवण्यासदेखील मागे-पुढे बघितले गेले नाही. तथापि, या परिस्थितीस आपणच कारणीभूत असल्याचे मात्र कोणालाही जाणवत नाही. निवडणूक आयोगाकडून वर्षातून दोनवेळा मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याचा जाहीर कार्यक्रम राबविला जातो. ज्या मतदान केंद्रावर नागरिक मतदान करतात, अशा ठिकाणीच मतदारयाद्या त्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातात. मतदार यादीत नाव वगळले गेले असेल, स्थलांतर झाले असेल किंवा मतदाराच्या नावात चूक झाली असेल तर त्यात सुधारणा करण्याची संधी उपलब्ध असते. नागरिकांनी या याद्या बघून त्यानुसार विहित अर्ज भरून द्यावे असे आवाहन निवडणूक विभाग माध्यमातून करते; परंतु त्यावेळी मात्र कोणीही मतदान केंद्रांकडे फिरकत नाही. यंदा तर निवडणुकीच्या अगोदर म्हणजे ९ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष मोहीम राबविली. मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही ते तपासावे आणि नसेल तर नावनोंदणी करावी, असे आवाहनदेखील करण्यात आले. या मोहिमेत तब्बल ८० हजार नव्या मतदारांनी नावे नोंदवली. परंतु अगोदरच मतदान करणार्‍या नागरिकांनी निर्धास्त राहून आपले नाव यादीत आहेच, त्यामुळे यादी तपासण्याची गरज काय, अशी भूमिका घेतली. आता निवडणूक दोन दिवसांवर आल्यानंतर मतदार चिठ्ठ्या न आल्याने अचानक सर्वच जागरूक झाले. त्यामुळे नागरिकांची उदासीनताच आता अडचणीची ठरली. त्यामुळे आता मतदान करण्याची खूप इच्छा होती; परंतु मतदान करता आले नाही, अशी ओरड करून काय उपयोग?