शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहन सिंग, राजन यांच्यामुळेच सार्वजनिक बँका डबघाईला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 04:44 IST

निर्मला सीतारामन; एका फोनवर कर्जांचे वाटप होत असे

न्यूयॉर्क : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या कारकार्दीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती खूपच वाईट होती, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

येथील कोलंबिया विद्यापीठाच्या स्कूल आॅफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्समधील व्याख्यानात त्या म्हणाल्या की, या दोघांमुळे त्या काळात थकीत कर्जांचे प्रमाण प्रचंड वाढून सरकारी बँकांची स्थिती पार बिघडली. आपण सरकारी बँकांची बिघडलेली घडी पुन्हा नव्याने बसविण्यावर प्राधान्य देणार आहोत. डॉ. राजन यांच्याविषयी मला अतीव आदर आहे. पण ते आरबीआयचे गव्हर्नर असताना बँकांनी वाटेल तशी कर्जे वाटली. त्यांची कर्जफेड झाली नाही. थकीत कर्जांचे प्रमाण वाढण्यास त्यामुळे तेच जबाबदार आहेत.

सीतारामन म्हणाल्या की, अर्थव्यवस्था अतिशय चांगल्या स्थितीत असताना डॉ. राजन यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून निवड झाली. पण त्यांच्या काळात थकीत कर्ज व घोटाळ्यांमुळे सरकारी बँकांची घसरण सुरू झाली, ही वस्तुस्थिती आहे. राजन यांच्या काळात केवळ एका फोनवर अनेक कर्जे मंजूर झाली. त्यामुळे सरकारी बँका डबघाईला आल्या. ही सर्व माहिती आता बाहेर येत आहे. या बँकांचे गाडे रुळावर आणावे लागेल. या बँका त्यासाठी केंद्र सरकारवरच अवलंबून आहेत.

त्यामुळेच रघुराम राजन आज जे काही बोलतात, त्याविषयी आपणास शंका येते, असे सांगून अर्थमंत्री म्हणाल्या की, डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान व डॉ. रघुराम राजन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतानाच सार्वजनिक बँकांची थकीत कर्जे ९१९0 कोटी रुपयांवरून २.१६ लाख कोटींवर गेली, हे विसरून चालणार नाही. (वृत्तसंस्था)सिंग, राजन यांना दिले प्रत्युत्तरडॉ. मनमोहन सिंग व रघुराम राजन यांनी गेल्या काही दिवसांत देशाची आर्थिक स्थिती बिघडल्याच्या कारणावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. डॉ. रघुराम राजन यांनी मोदी सरकारने पहिल्या पाच वर्षांत आर्थिक आघाडीवर चांगली कामगिरी केली नसल्याची टीका केली होती. सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याचेही ते म्हणाले होते. देशात सध्या मंदीचे वातावरण असून, त्यास मोदी सरकारची आर्थिक धोरणे कारणीभू आहेत. नोटाबंदी आणि घाईघाईने जीएसटी लागू केल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आणि लाखो लोकांचा रोजगार गेला आहे, असे डॉ. सिंग म्हणाले होते. त्यामुळे निर्मला सीतारामन यांनी त्या दोघांवरच टीका केली.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन