शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

लोकशाही हक्क हिरावले जाऊ नयेत यासाठी सजग राहा - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 05:35 IST

लोकसभा निवडणुकांत मोठा विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर महिनाभराने नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम रविवारी पुन्हा सुरु झाला.

नवी दिल्ली : लोकशाहीला कोणीही गृहित धरू नये. जोपर्यंत लोकशाही हक्क हिरावून घेतले जात नाहीत तोपर्यंत त्यांचे महत्त्व कोणालाही कळत नाही. आपल्या हक्कांवर कोणी गदा आणणार नाही यासाठी जनतेने सजग राहायला हवे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकांत मोठा विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर महिनाभराने नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम रविवारी पुन्हा सुरु झाला. त्यात ते म्हणाले की, १९७७ साली तत्कालीन केंद्र सरकारने आणीबाणी लादून लोकांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणली होती. लोकशाही प्रत्येक नागरिकाचा आदर करणे आवश्यक आहे. नेमके तेच त्या काळात झाले नव्हते.

लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात मोदी यांनी केदारनाथ येथील गुंफेत जाऊन ध्यानधारणा केली होती. त्याबद्दल ते म्हणाले की, तो काही राजकीय दौरा नव्हता तर स्वत:चे आत्मपरीक्षण करण्यासाठी केलेली ती कृती होती. लोकसभा निवडणुकांच्या आधी फेब्रुवारी महिन्यात प्रसारित झालेल्या मन की बातच्या शेवटच्या भागाचा प्रचारासाठी उपयोग केल्याच्या आरोपाचाही मोदी यांनी इन्कार केला. त्यांनी सांगितले की, मन की बातद्वारे जनतेशी संवाद साधायला पुन्हा येईन असे मी त्या भागात म्हटले होते. अतिआत्मविश्वासापायी मी असे उद्गार काढल्याची टीका विरोधकांनी केली होती. जनतेने विश्वास दाखविला नसता तर मी पुन्हा पंतप्रधान होऊ शकलो नसतो.

पाणी वाचविण्यासाठी तीन आवाहनेमन की बात कार्यक्रमात मोदी यांनी जनतेला तीन आवाहने केली. स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर पाण्याचा एक एक थेंब वाचविण्यासाठी लोकचळवळ उभारावी, पाणी वाचविण्यासाठी पारंपारिक ज्ञान सर्वांना प्रदान करावे तसेच पाणी वाचविण्यासाठी काम करणाºया व्यक्ती व संस्थांची माहिती सरकारला कळवावी असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. पाणी वाचवा मोहिमेसाठी जनशक्ती व जलशक्ती ही टिष्ट्वटरहँडल वापरता येतील. केंद्र सरकारने स्वतंत्र जलमंत्रालयाची स्थापना केली असली तरी ही मोहिम जनतेच्या सक्रिय सहभागामुळेच यशस्वी होऊ शकते असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात