शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus :"कोरोनाविरुद्धची लढाई हा लोकांनी चालविलेला महायज्ञ"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 06:18 IST

लढाईत जनता आघाडीवर आहे व सरकार आणि प्रशासन तिला साथ देत आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कृतनिश्चयाबद्दल देशवासीयांचे रविवारी कृतज्ञतापूर्वक आभार मानले.

नवी दिल्ली : देश सध्या लढत असलेली कोरोनाविरुद्धची लढाई हा खऱ्या अर्थी लोकांनी हाती घेतलेला महायज्ञ आहे व प्रत्येक नागरिक यात आपल्या कुवतीनुसार आहुती देत आहे. लढाईत जनता आघाडीवर आहे व सरकार आणि प्रशासन तिला साथ देत आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कृतनिश्चयाबद्दल देशवासीयांचे रविवारी कृतज्ञतापूर्वक आभार मानले.‘आकाशवाणी’वरून ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, गरिबीशी दोन हात करणाºया व विकासाची आंस ठेवून मार्गक्रमण करणाºया भारतासारख्या देशापुढे अशा प्रकारची लढाई लढण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. देशातील प्रत्येक नागरिक या लढाईत शिपाई म्हणून व सेनानी म्हणून सामील झाला, हे देशाचे मोठे भाग्य आहे. इतिहासात या अभूतपूर्व लढाईची नक्कीच गौरवाने नोंद केली जाईल. मोदी म्हणाले की, प्रत्येक कठीण परिस्थिती, प्रत्येक लढाई आपल्याला काही तरी नवे धडे देते, काही नव्या शक्यतांचे मार्ग प्रशस्त करते व काही नव्या उद्दिष्टांचेही संकेत देते. आताच्या अडचणीच्या काळात देशवासीयांनी दाखविलेल्या दृृढनिश्चयाने देशात काही नव्या बदलांनाही सुरुवात झाली आहे. उद्योग, कार्यालये, शिक्षण संस्था व वैद्यकीय क्षेत्र काही तरी नवे करण्यास, नवे मार्ग शोधण्यास आतुर झाले आहे. सर्वांनी एखादी गोष्ट एकदिलाने करायची म्हटले की, काय केले जाऊ शकते, याचा अनुभव आपण सर्वच घेत आहोत.पंतप्रधान म्हणाले की, सध्याच्या ‘लॉकडाऊन’ने आपल्याला समाजाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली आहे. एरवी ज्यांची आपण दखलही घेत नाही, अशा लहान-सहान लोकांच्या उपयुक्ततेचे महत्त्व आपल्याला पटले आहे. त्यातूनच आपले हात इतरांना मदत करण्यासाठी पुढे जात आहेत व आपल्या मनात करुणा आणि ममत्वाची भावना जागृत झाली आहे.आताच्या या महामारीच्या निमित्ताने आयुर्वेदाची महती पटवून देण्याची गरज प्रतिपादित करून मोदी म्हणाले की, जगाने योगाचा जसा सहर्ष स्वीकार केला तसाच आयुर्वेदाचाही नक्की स्वीकार केला जाईल. यासाठी तरुण पिढीला कंबर कसावी लागेल. जगाला एखादी गोष्ट पुराव्याने सिद्ध केल्यावरच पटत असेल तर आपल्याला ती त्या पद्धतीने पटवून द्यावी लागेल.>फालतू आत्मविश्वास नकोआग, कर्ज आणि आजारपण यांना कमी लेखले तर ते दुपटीने आपल्यावर उलटतात या अर्थाचा एक संस्कृत श्लोक उद््धृत करून मोदी म्हणाले की, कोरोना माझ्यापर्यंत, माझ्या गल्ली-मोहल्ल्यापर्यंत येऊच शकत नाही, अशा फालतू आत्मविश्वासात कोणीही राहू नये.‘लॉकडाउन’ने समाजाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली आहे. एरवी ज्यांची आपण दखलही घेत नाही, अशा लहान-सहान लोकांच्या उपयुक्ततेचे महत्त्व आपल्याला पटले आहे. इतरांना मदत करण्यासाठी पुढे जात आहेत व आपल्या मनात ममत्व जागे झाले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या