शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

Coronavirus :"कोरोनाविरुद्धची लढाई हा लोकांनी चालविलेला महायज्ञ"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 06:18 IST

लढाईत जनता आघाडीवर आहे व सरकार आणि प्रशासन तिला साथ देत आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कृतनिश्चयाबद्दल देशवासीयांचे रविवारी कृतज्ञतापूर्वक आभार मानले.

नवी दिल्ली : देश सध्या लढत असलेली कोरोनाविरुद्धची लढाई हा खऱ्या अर्थी लोकांनी हाती घेतलेला महायज्ञ आहे व प्रत्येक नागरिक यात आपल्या कुवतीनुसार आहुती देत आहे. लढाईत जनता आघाडीवर आहे व सरकार आणि प्रशासन तिला साथ देत आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कृतनिश्चयाबद्दल देशवासीयांचे रविवारी कृतज्ञतापूर्वक आभार मानले.‘आकाशवाणी’वरून ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, गरिबीशी दोन हात करणाºया व विकासाची आंस ठेवून मार्गक्रमण करणाºया भारतासारख्या देशापुढे अशा प्रकारची लढाई लढण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. देशातील प्रत्येक नागरिक या लढाईत शिपाई म्हणून व सेनानी म्हणून सामील झाला, हे देशाचे मोठे भाग्य आहे. इतिहासात या अभूतपूर्व लढाईची नक्कीच गौरवाने नोंद केली जाईल. मोदी म्हणाले की, प्रत्येक कठीण परिस्थिती, प्रत्येक लढाई आपल्याला काही तरी नवे धडे देते, काही नव्या शक्यतांचे मार्ग प्रशस्त करते व काही नव्या उद्दिष्टांचेही संकेत देते. आताच्या अडचणीच्या काळात देशवासीयांनी दाखविलेल्या दृृढनिश्चयाने देशात काही नव्या बदलांनाही सुरुवात झाली आहे. उद्योग, कार्यालये, शिक्षण संस्था व वैद्यकीय क्षेत्र काही तरी नवे करण्यास, नवे मार्ग शोधण्यास आतुर झाले आहे. सर्वांनी एखादी गोष्ट एकदिलाने करायची म्हटले की, काय केले जाऊ शकते, याचा अनुभव आपण सर्वच घेत आहोत.पंतप्रधान म्हणाले की, सध्याच्या ‘लॉकडाऊन’ने आपल्याला समाजाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली आहे. एरवी ज्यांची आपण दखलही घेत नाही, अशा लहान-सहान लोकांच्या उपयुक्ततेचे महत्त्व आपल्याला पटले आहे. त्यातूनच आपले हात इतरांना मदत करण्यासाठी पुढे जात आहेत व आपल्या मनात करुणा आणि ममत्वाची भावना जागृत झाली आहे.आताच्या या महामारीच्या निमित्ताने आयुर्वेदाची महती पटवून देण्याची गरज प्रतिपादित करून मोदी म्हणाले की, जगाने योगाचा जसा सहर्ष स्वीकार केला तसाच आयुर्वेदाचाही नक्की स्वीकार केला जाईल. यासाठी तरुण पिढीला कंबर कसावी लागेल. जगाला एखादी गोष्ट पुराव्याने सिद्ध केल्यावरच पटत असेल तर आपल्याला ती त्या पद्धतीने पटवून द्यावी लागेल.>फालतू आत्मविश्वास नकोआग, कर्ज आणि आजारपण यांना कमी लेखले तर ते दुपटीने आपल्यावर उलटतात या अर्थाचा एक संस्कृत श्लोक उद््धृत करून मोदी म्हणाले की, कोरोना माझ्यापर्यंत, माझ्या गल्ली-मोहल्ल्यापर्यंत येऊच शकत नाही, अशा फालतू आत्मविश्वासात कोणीही राहू नये.‘लॉकडाउन’ने समाजाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली आहे. एरवी ज्यांची आपण दखलही घेत नाही, अशा लहान-सहान लोकांच्या उपयुक्ततेचे महत्त्व आपल्याला पटले आहे. इतरांना मदत करण्यासाठी पुढे जात आहेत व आपल्या मनात ममत्व जागे झाले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या