शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

तोफखाना होणार प्रबळ; अल्ट्रालाइट हॉवित्झर, के ९ वज्रमुळे सामर्थ्यात मोलाची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 06:47 IST

भारतीय लष्कराच्या सैन्यदलाची गेल्या २० वर्षांपासूनची आधुनिक तोफांची मागणी येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे.

- निनाद देशमुख पुणे : भारतीय लष्कराच्या सैन्यदलाची गेल्या २० वर्षांपासूनची आधुनिक तोफांची मागणी येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. अमेरिकन बनावटीच्या अल्ट्रालाईट हॉवित्झर आणि कोरियन बनावटीच्या के ९ वज्र या तोफा येत्या शुक्रवारी लष्कराला सुपूर्द करण्यात येणार आहेत. नाशिक येथील आर्टिलियरी सेंटरमध्ये केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या अत्याधुनिक तोफांचे हस्तांतरण होणार असून, सैन्याच्या मारकक्षमतेत मोठी वाढ होणार आहे.कुठल्याही लष्करात तोफखाना महत्त्वाचा असतो. कारण, दूरवर तोफगोळ्यांची मारकक्षमता तसेच पुढे असलेल्या सैन्याला कव्हर करण्यासाठी मोलाची भूमिका तोफखाना बजावत असतो. भारतीय लष्करात सद्यस्थितीत बोफोर्स तोफ ही सर्वाधिक आधुनिक तोफ आहे. या अल्ट्रालाईट हॉवित्झर प्रकारच्या तोफा लष्करात असाव्या, अशी मागणी गेल्या २० वर्षांपासून होती. मात्र, बोफोर्स प्रकरणानंतर नव्या तोफा लष्करात दाखल होऊ शकल्या नव्हत्या.यामुळे सर्व भार हा बोफोर्स तोफांवर येत होता. तसेच तोफखान्यातील काही महत्त्वाच्या तोफांचा कालावधी संपल्याने त्या निवृत्त करण्यात आल्या. यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढणे गरजेचे असल्याने नव्या तोफा लष्करात दाखल होणे गरजेचे होते. गेल्या काही दिवसांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते. अमेरिकेशी झालेल्या करारानुसार अल्ट्रालाईट हॉवित्झर (एम ७७७) तोफा तयार करण्यात आल्या आहेत. तसेच कोरियन बनावटीच्या के ९ वज्र या तोफा लष्कराला सुपूर्द करण्यात येणार आहेत. आधुनिक असलेल्या या तोफांमुळे लष्कराची २० वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. जवळपास ४० ते ४५ किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता या तोफांमध्ये आहे.केंद्रीय संरक्षणमंत्र्यांकडून हस्तांतरणनाशिक येथील आर्टिलियरी सेंटरला येत्या शुक्रवारी केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारामन भेट देणार आहेत. या वेळी आयोजित कार्यक्रमात या दोन्ही तोफा लष्कराला हस्तांतरित करणार आहेत.भारतीय लष्कराला गेल्या ३० वर्षांपासून आधुनिक तोफांची गरज होती. दरम्यान झालेल्या सरकारने बोफोर्स प्रकरणामुळे नवी शस्त्रे खरेदी केली नाही. याचे गंभीर परिणाम भारताच्या सुरक्षेवर झाला. यामुळे नव्या तोफांची गरज भारतीय सैन्यदलाला होती. या तोफांचे अनेक भाग भारतातच बनविलेले आहेत. यामुळे शस्त्रास्त्रनिर्मितीतसुद्धा आपण पुढे गेलो आहोत.- दत्तात्रय शेकटकर,निवृत्त लेफ्टनंट जनरलतोफखाना दलाची पोकळी निघणार भरून१९८४ नंतर बोफार्स प्रकरणानंतर लष्कराच्या तोफखान्यात नव्या तोफा दाखल झाल्या नव्हत्या. केवळ बोफार्स याच तोफांवर लष्कराचा भार होता. या बरोबरच नवी लष्करी साधने सुद्धा येऊ शकली नव्हती. मध्यम पल्ल्याच्या अनेक तोफा निवृत्त झाल्यामुळे तोफखान्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. यामुळे ही पोकळी भरून निघणे आवश्यक होते. या दोन नव्या तोफा लष्कराच्या ताफ्यात दाखल होत असल्याने गेल्या २० वर्षांतील पोकळी भरून निघणार आहे.-निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान