शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

तोफखाना होणार प्रबळ; अल्ट्रालाइट हॉवित्झर, के ९ वज्रमुळे सामर्थ्यात मोलाची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 06:47 IST

भारतीय लष्कराच्या सैन्यदलाची गेल्या २० वर्षांपासूनची आधुनिक तोफांची मागणी येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे.

- निनाद देशमुख पुणे : भारतीय लष्कराच्या सैन्यदलाची गेल्या २० वर्षांपासूनची आधुनिक तोफांची मागणी येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. अमेरिकन बनावटीच्या अल्ट्रालाईट हॉवित्झर आणि कोरियन बनावटीच्या के ९ वज्र या तोफा येत्या शुक्रवारी लष्कराला सुपूर्द करण्यात येणार आहेत. नाशिक येथील आर्टिलियरी सेंटरमध्ये केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या अत्याधुनिक तोफांचे हस्तांतरण होणार असून, सैन्याच्या मारकक्षमतेत मोठी वाढ होणार आहे.कुठल्याही लष्करात तोफखाना महत्त्वाचा असतो. कारण, दूरवर तोफगोळ्यांची मारकक्षमता तसेच पुढे असलेल्या सैन्याला कव्हर करण्यासाठी मोलाची भूमिका तोफखाना बजावत असतो. भारतीय लष्करात सद्यस्थितीत बोफोर्स तोफ ही सर्वाधिक आधुनिक तोफ आहे. या अल्ट्रालाईट हॉवित्झर प्रकारच्या तोफा लष्करात असाव्या, अशी मागणी गेल्या २० वर्षांपासून होती. मात्र, बोफोर्स प्रकरणानंतर नव्या तोफा लष्करात दाखल होऊ शकल्या नव्हत्या.यामुळे सर्व भार हा बोफोर्स तोफांवर येत होता. तसेच तोफखान्यातील काही महत्त्वाच्या तोफांचा कालावधी संपल्याने त्या निवृत्त करण्यात आल्या. यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढणे गरजेचे असल्याने नव्या तोफा लष्करात दाखल होणे गरजेचे होते. गेल्या काही दिवसांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते. अमेरिकेशी झालेल्या करारानुसार अल्ट्रालाईट हॉवित्झर (एम ७७७) तोफा तयार करण्यात आल्या आहेत. तसेच कोरियन बनावटीच्या के ९ वज्र या तोफा लष्कराला सुपूर्द करण्यात येणार आहेत. आधुनिक असलेल्या या तोफांमुळे लष्कराची २० वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. जवळपास ४० ते ४५ किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता या तोफांमध्ये आहे.केंद्रीय संरक्षणमंत्र्यांकडून हस्तांतरणनाशिक येथील आर्टिलियरी सेंटरला येत्या शुक्रवारी केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारामन भेट देणार आहेत. या वेळी आयोजित कार्यक्रमात या दोन्ही तोफा लष्कराला हस्तांतरित करणार आहेत.भारतीय लष्कराला गेल्या ३० वर्षांपासून आधुनिक तोफांची गरज होती. दरम्यान झालेल्या सरकारने बोफोर्स प्रकरणामुळे नवी शस्त्रे खरेदी केली नाही. याचे गंभीर परिणाम भारताच्या सुरक्षेवर झाला. यामुळे नव्या तोफांची गरज भारतीय सैन्यदलाला होती. या तोफांचे अनेक भाग भारतातच बनविलेले आहेत. यामुळे शस्त्रास्त्रनिर्मितीतसुद्धा आपण पुढे गेलो आहोत.- दत्तात्रय शेकटकर,निवृत्त लेफ्टनंट जनरलतोफखाना दलाची पोकळी निघणार भरून१९८४ नंतर बोफार्स प्रकरणानंतर लष्कराच्या तोफखान्यात नव्या तोफा दाखल झाल्या नव्हत्या. केवळ बोफार्स याच तोफांवर लष्कराचा भार होता. या बरोबरच नवी लष्करी साधने सुद्धा येऊ शकली नव्हती. मध्यम पल्ल्याच्या अनेक तोफा निवृत्त झाल्यामुळे तोफखान्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. यामुळे ही पोकळी भरून निघणे आवश्यक होते. या दोन नव्या तोफा लष्कराच्या ताफ्यात दाखल होत असल्याने गेल्या २० वर्षांतील पोकळी भरून निघणार आहे.-निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान