शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; महामार्गावरील टोल घेण्याची पद्धत बदलणार, सरकारची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 23:10 IST

नवीन योजना आल्यावर वाहनचालकांना अर्धा मिनिटही टोल नाक्यावर उभे राहावे लागणार नाही. 

नवी दिल्ली : जर तुम्ही अनेकदा महामार्गावरून कारने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुमचा टोल टॅक्सवर खर्च होणारा वेळ आणखी कमी होणार आहे. सरकार लवकरच अडथळारहित टोलवसुली यंत्रणा (Barrier-less toll system) सुरू करण्याचा विचार करत आहे. नवीन योजना आल्यावर वाहनचालकांना अर्धा मिनिटही टोल नाक्यावर उभे राहावे लागणार नाही. 

यासंदर्भात बुधवारी माहिती देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री व्ही के सिंह म्हणाले की, अडथळारहित टोल वसुली यंत्रणा सध्या चाचणीत आहे. आमची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आम्ही लवकरच त्याची अंमलबजावणी करू. देशातील रस्त्यांवर निश्चित केलेल्या प्रवास अंतराच्या आधारे टोल भरण्याची व्यवस्थाही लागू केली जाईल. टोलवसुलीची नवी यंत्रणा कार्यान्वित झाल्यास तिची कार्यक्षमता वाढेल आणि प्रवासाचा वेळही कमी होईल, असे व्ही के सिंह म्हणाले.

वाहनांवर FASTag लावल्यामुळे टोल बुथवर लागणारा वेळ 47 सेकंदांवर आला आहे. परंतु सरकारला ते आणखी कमी करून 30 सेकंदांपेक्षा कमी करायचे आहे. यासाठी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर पायलट (प्रायोगिक) चाचणी सुरू आहे ज्यामध्ये उपग्रह आणि कॅमेरा आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. जेव्हा तुम्ही महामार्गावर प्रवेश करता आणि तेथे बसवलेला कॅमेरा तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक स्कॅन करतो, त्यानंतर त्या आधारे टोल बुथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही किती किलोमीटरचा प्रवास केला, हे निश्चित केले जाते, असे व्ही के सिंह यांनी सांगितले. 

याचबरोबर, हे सध्याच्या व्यवस्थेपेक्षा वेगळे आहे. ज्यामध्ये तुम्ही महामार्गावर किती किलोमीटरचा प्रवास केला याच्याशी काहीही संबंध नाही. हे पेमेंट टोलच्या नियमांवर आधारित आहे. तसेच, दूरसंचार क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात सध्याच्या सरकारने केलेल्या कामामुळेच अशी प्रगती होत आहे. दूरसंचार नेटवर्कमधील सुधारणांमुळे टोल प्लाझावर वाहनांचा डेटा गोळा करण्यात मदत होत आहे, असेही व्ही के सिंह यांनी सांगितले. 

टॅग्स :tollplazaटोलनाकाAutomobileवाहन