शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सलाम!... स्वतःचा जीव गमावून पायलट्सनी वाचवले संपूर्ण गावाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 09:41 IST

आग लागलेले विमान गावापासून नेले लांब, निर्मनुष्य भागात झाले क्रॅश.

बाडमेरः राजस्थानच्या उत्तरलाई एअरबेसवरून उड्डाण घेतलेले मिग-२१ लढाऊ विमान काही किलोमीटर अंतरावर कोसळले. या अपघातात विंग कमांडर मोहित राणा आणि फ्लाईट लेफ्टनंट अद्वितीय बल हे शदी झाले. मात्र, दोघांनीही विमानाला आग लागल्यानंतर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत प्रसंगावधान राखल्याने शेकडो जणांचे प्राण वाचले.

मोहित राणा आणि अद्वितीय बल यांनी गुरुवारी रात्री ९ वाजून १० मिनिटांनी मिग-२१ बायसन या विमानातून उड्डाण केले होते. मात्र, काही मिनिटांमध्येच विमानाला आग लागली. त्यावेळी विमान एअरबेसपासून ४० किमीवर भीमडा गावाच्या वर होते. गावाची लोकसंख्या सुमारे २,५०० एवढी आहे. दोनच पर्याय होते. लगेच इजेक्ट करून विमान गावावर पडू द्यावे. मात्र, तसे केले असते तर शेकडो जणांचे प्राण धोक्यात आले असते. दुसरा म्हणजे स्वतःच्या प्राणांचा विचार न करता विमान दूर क्रॅश करावे. दुसरा पर्याय निवडत त्यांनी विमान गावापासून दोन किलोमीटरवर निर्मनुष्य परिसरात नेले. तिथे एका टेकडीवर विमान क्रॅश झाले.

लोकसंख्येचा अंदाज आला होताविंग कमांडर मोहित राणा हे मूळचे हिमाचल प्रदेशातील मंडी येथील रहिवासी होते. तर अद्वितीय बल हे जम्मू येथील रहिवासी होते. विमानाला हवेतच आग लागल्यानंतर गावावरूनच दोन-तीन घिरट्या घातल्या. लोकांचा अंदाज आल्यामुळेच दोघांनी विमान उतरवण्यासाठी सुरक्षित जागा शोधली. क्रॅशनंतर अर्धा किलोमीटर परिसरात मलबा पसरला होता.

स्क्वाड्रन ५१ होणार निवृत्तभारतीय हवाई दल मिग-२१ बायसन विमानांचे स्क्वाड्रन ५१ सप्टेंबरअखेरीस निवृत्त करणार आहे. श्रीनगर एअरबेसवर हे स्क्वाड्रन तैनात आहे. २०१९च्या बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर स्क्वाड्रनला प्रसिद्धी मिळाली. या स्क्वाड्रनच्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले होते.

टॅग्स :Rajasthanराजस्थानairforceहवाईदल