शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

टेन्शन वाढलं! पाकिस्तानातून राजस्थानमार्गे भारतात येतंय नवं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 08:03 IST

आता सीमावर्ती भागातून भारताच्या राजस्थानमध्ये पाकिस्तान नवंच संकट पाठवत आहे.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातला असून, भारतालाही त्याचा फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटातही पाकिस्तानकडून सातत्यानं दहशतवादी हल्ले केले जात आहेत. त्याला भारतीय लष्करही चोख प्रत्युत्तर देत आहे.सीमावर्ती भागातून भारताच्या राजस्थानमध्ये पाकिस्तान नवंच संकट पाठवत आहे. राजस्थानच्या पश्चिमी भागात पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणात टोळ पाठवण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातला असून, भारतालाही त्याचा फटका बसला आहे. पण भारतानं कोरोनाला रोखण्यात इतर देशांच्या तुलनेत बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे. कोरोनाच्या संकटातही पाकिस्तानकडून सातत्यानं दहशतवादी हल्ले केले जात आहेत. त्याला भारतीय लष्करही चोख प्रत्युत्तर देत आहे. त्यातच आता सीमावर्ती भागातून भारताच्या राजस्थानमध्ये पाकिस्तान नवंच संकट पाठवत आहे. राजस्थानच्या पश्चिमी भागात पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणात टोळ पाठवण्यास सुरुवात केली आहे. टोळांच्या एक मोठ्या गटानं पश्चिम राजस्थानच्या सीमेवर घुसखोरी केली आहे. पश्चिम राजस्थानच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून टोळांद्वारे शेतकऱ्यांच्या पिकांवर जोरदार हल्ला सुरू आहे. या टोळधाडीमुळे राजस्थानमधील शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या वर्षी या टोळांच्या समूहानं कहर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं.  त्यावेळीसुद्धा संपूर्ण पिके नष्ट झाली होती. गेल्या वर्षी या टोळधाडीनं संपूर्ण पीक नष्ट केल्याचे शेतकरी सांगतात. एकीकडे कोरोना विषाणूच्या धोक्यापासून स्वतःचा जीव वाचवायचा असतानाच दुसरीकडे पिकांचं टोळांपासून कसं संरक्षण करावं, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे. टोळांच्या हल्ल्यामुळे शेतकरी चिंतेत असून, पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकरी टोळांना घरातील भांडी वाजवून शेतापासून दूर पळवत आहेत.शेतकरी राजेंद्र सांगतात की, गेल्या काही दिवसांपासून माझ्या गावात आणि सीमेवरील इतर गावांमध्ये टोळांचा मोठा हल्ला झाला आहे. त्यामुळे आम्ही सर्व सावध आहोत. टोळ व कीटकांपासून पिकाचे संरक्षण करण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. केंद्र व राज्य सरकारांनी टोळांवर नियंत्रण काही योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत. तामलोरचे सरपंच हिंदूसिंह सांगतात की, टोळांच्याविषयी आमच्याकडे आधीपासूनच माहिती होती, त्यासाठी आम्ही जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभाग, टोळ विभाग आणि प्रशासकीय अधिका-यांची बैठक घेतली होती आणि त्यांना टोळ नियंत्रण ठेवण्यास सांगण्यात आले होते. 22 एप्रिल रोजी टोळ नियंत्रणासाठी कंट्रोल रूम उघडण्यातही आली. कंट्रोल रूमचे क्रमांकही सार्वजनिक केले आहेत आणि टोळांच्या आगमनाविषयी माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी सीमेवरील खेड्यांमध्ये टोळ दिसले.

मंगळवारी रात्री इंद्राणी आणि रतनानी भागात टोळ आल्याची माहिती मिळाली, त्यांना नियंत्रित करण्यासाठी चार गाड्या पाठवण्यात आल्या. याशिवाय गडरा रोड पांचला, रोहिडाळा, बिजावळ, रेणू का पार, सोडियाला मायानी या गावांमध्येही टोळांनी घुसखोरी केली होती. राजस्थानमधल्या बाडमेर जिल्ह्यातील चौहटनमधील वीरसिंगची ढाणी आणि कोटामधील तलावांमध्ये टोळ दिसले. तेथेही दोन वाहने पाठवून टोळांवर नियंत्रण मिळवले गेले. आगामी काळात टोळांशी सामना करण्यासाठी आम्ही सर्व तयारी पूर्ण केली आहे. जर आम्हाला गाड्या हव्या असतील तर आम्ही त्या भाड्याने घेऊ. बाडमेरचे जिल्हाधिकारी राकेश कुमार शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षात टोळांच्या मोठ्या झुंडीने शेतकर्‍यांच्या रबी व खरीप पिकांचे नुकसान केले आहे, ज्यावर प्रशासनानेही शेतकर्‍यांच्या पिकांचा विशेष पंचनामा करून नुकसानभरपाई दिली. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान