शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

टेन्शन वाढलं! पाकिस्तानातून राजस्थानमार्गे भारतात येतंय नवं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 08:03 IST

आता सीमावर्ती भागातून भारताच्या राजस्थानमध्ये पाकिस्तान नवंच संकट पाठवत आहे.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातला असून, भारतालाही त्याचा फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटातही पाकिस्तानकडून सातत्यानं दहशतवादी हल्ले केले जात आहेत. त्याला भारतीय लष्करही चोख प्रत्युत्तर देत आहे.सीमावर्ती भागातून भारताच्या राजस्थानमध्ये पाकिस्तान नवंच संकट पाठवत आहे. राजस्थानच्या पश्चिमी भागात पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणात टोळ पाठवण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातला असून, भारतालाही त्याचा फटका बसला आहे. पण भारतानं कोरोनाला रोखण्यात इतर देशांच्या तुलनेत बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे. कोरोनाच्या संकटातही पाकिस्तानकडून सातत्यानं दहशतवादी हल्ले केले जात आहेत. त्याला भारतीय लष्करही चोख प्रत्युत्तर देत आहे. त्यातच आता सीमावर्ती भागातून भारताच्या राजस्थानमध्ये पाकिस्तान नवंच संकट पाठवत आहे. राजस्थानच्या पश्चिमी भागात पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणात टोळ पाठवण्यास सुरुवात केली आहे. टोळांच्या एक मोठ्या गटानं पश्चिम राजस्थानच्या सीमेवर घुसखोरी केली आहे. पश्चिम राजस्थानच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून टोळांद्वारे शेतकऱ्यांच्या पिकांवर जोरदार हल्ला सुरू आहे. या टोळधाडीमुळे राजस्थानमधील शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या वर्षी या टोळांच्या समूहानं कहर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं.  त्यावेळीसुद्धा संपूर्ण पिके नष्ट झाली होती. गेल्या वर्षी या टोळधाडीनं संपूर्ण पीक नष्ट केल्याचे शेतकरी सांगतात. एकीकडे कोरोना विषाणूच्या धोक्यापासून स्वतःचा जीव वाचवायचा असतानाच दुसरीकडे पिकांचं टोळांपासून कसं संरक्षण करावं, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे. टोळांच्या हल्ल्यामुळे शेतकरी चिंतेत असून, पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकरी टोळांना घरातील भांडी वाजवून शेतापासून दूर पळवत आहेत.शेतकरी राजेंद्र सांगतात की, गेल्या काही दिवसांपासून माझ्या गावात आणि सीमेवरील इतर गावांमध्ये टोळांचा मोठा हल्ला झाला आहे. त्यामुळे आम्ही सर्व सावध आहोत. टोळ व कीटकांपासून पिकाचे संरक्षण करण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. केंद्र व राज्य सरकारांनी टोळांवर नियंत्रण काही योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत. तामलोरचे सरपंच हिंदूसिंह सांगतात की, टोळांच्याविषयी आमच्याकडे आधीपासूनच माहिती होती, त्यासाठी आम्ही जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभाग, टोळ विभाग आणि प्रशासकीय अधिका-यांची बैठक घेतली होती आणि त्यांना टोळ नियंत्रण ठेवण्यास सांगण्यात आले होते. 22 एप्रिल रोजी टोळ नियंत्रणासाठी कंट्रोल रूम उघडण्यातही आली. कंट्रोल रूमचे क्रमांकही सार्वजनिक केले आहेत आणि टोळांच्या आगमनाविषयी माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी सीमेवरील खेड्यांमध्ये टोळ दिसले.

मंगळवारी रात्री इंद्राणी आणि रतनानी भागात टोळ आल्याची माहिती मिळाली, त्यांना नियंत्रित करण्यासाठी चार गाड्या पाठवण्यात आल्या. याशिवाय गडरा रोड पांचला, रोहिडाळा, बिजावळ, रेणू का पार, सोडियाला मायानी या गावांमध्येही टोळांनी घुसखोरी केली होती. राजस्थानमधल्या बाडमेर जिल्ह्यातील चौहटनमधील वीरसिंगची ढाणी आणि कोटामधील तलावांमध्ये टोळ दिसले. तेथेही दोन वाहने पाठवून टोळांवर नियंत्रण मिळवले गेले. आगामी काळात टोळांशी सामना करण्यासाठी आम्ही सर्व तयारी पूर्ण केली आहे. जर आम्हाला गाड्या हव्या असतील तर आम्ही त्या भाड्याने घेऊ. बाडमेरचे जिल्हाधिकारी राकेश कुमार शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षात टोळांच्या मोठ्या झुंडीने शेतकर्‍यांच्या रबी व खरीप पिकांचे नुकसान केले आहे, ज्यावर प्रशासनानेही शेतकर्‍यांच्या पिकांचा विशेष पंचनामा करून नुकसानभरपाई दिली. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान