शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 22:21 IST

बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर उस्मान भाईला ठार केले आहे.

ठळक मुद्देगेल्या महिन्याच्या 8 तारखेला जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी वसीम बारीची हत्या केली होती.

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे भारतीय जनता पार्टीचे नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला सुरक्षा दलाने घेतला आहे. बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर उस्मान भाईला ठार केले आहे. उस्मान भाई हा वसीम बारी आणि त्यांचे वडील व भाऊ यांच्या हत्येत सहभागी होता.

दहशतवादी उस्मान याने भाजपा नेते वसीम बारी, त्यांचा भाऊ आणि वडील यांना ठार मारले होते. या दहशतवाद्याचा खात्मा केल्यामुळे पोलीस आणि सुरक्षा दलाला मोठे यश मिळले आहे, असे काश्मीर रेंजचे आयजी  विजय कुमार यांनी सांगितले.

गेल्या महिन्याच्या 8 तारखेला जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी वसीम बारीची हत्या केली होती. दहशतवाद्यांनी वसीम बारी यांचा भाऊ आणि वडील यांनाही गोळ्या घालून ठार केले होते.

बारामुल्लाच्या क्रेइरी भागात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात 36 तास चकमक सुरु होती. यात सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. वसीम बारी यांच्या हत्येत सहभागी असलेला उस्मान भाई हा या चकमकीत मारला गेला. तो गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये आणि उत्तर काश्मीरमध्ये सक्रीय होता.

याआधी सोमवारी रात्री क्रेइरी भागात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन थांबविले होते. मात्र, मंगळवारी पहाटे पुन्हा गोळीबार सुरू झाला. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी