शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

धक्कादायक! श्राद्धाच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा; 50 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 13:22 IST

एका धार्मिक कार्यक्रमात झालेल्या जेवणातून विषबाधा झाल्याने जवळपास 100 जणांची प्रकृती खालावली. त्यापैकी 50 जणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यात शनिवारी रात्री अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका धार्मिक कार्यक्रमात झालेल्या जेवणातून विषबाधा झाल्याने जवळपास 100 जणांची प्रकृती खालावली. त्यापैकी 50 जणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारीही रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी रुग्णांची प्रकृती जाणून घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, बांसवाडा शहरातील नया गावाजवळील पनियाला गावात अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. श्राद्धानिमित्त एका कुटुंबाने जेवण ठेवलं होतं. या कार्यक्रमासाठी 200 हून अधिक लोक जमले होते. तेथे अन्नातून विषबाधा झाल्याने अन्न खाणाऱ्या लोकांची प्रकृती ढासळू लागली. त्यामुळे तेथे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर त्यांना जिल्हा मुख्यालयात असलेल्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

50 हून अधिक जण रुग्णालयात दाखल 

डॉ. जिग्नेश पंड्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी 200 हून अधिक लोक उपस्थित होते. त्यापैकी सुमारे 100 जणांना त्रास झाला. 50 हून अधिक जणांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातही एकाचवेळी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने भीतीचे वातावरण होते. माहिती मिळताच जिल्हाधिकार्‍यांसह इतर वरिष्ठ अधिकारी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

जेवल्यानंतर लोकांना उलट्या आणि जुलाब 

कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, जेवल्यानंतर लगेचच लोकांना उलट्या आणि जुलाब असा त्रास सुरू झाला. एकामागून एक लोक आजारी पडू लागले. त्यानंतर लोकांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत लोकांना रुग्णालयात आणण्यात येत होतं. हे पाहता रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय अधिकारी तेथेच उभे होते. त्याचवेळी परिस्थिती पाहता अतिरिक्त कर्मचारीही पाचारण करण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान