शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! श्राद्धाच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा; 50 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 13:22 IST

एका धार्मिक कार्यक्रमात झालेल्या जेवणातून विषबाधा झाल्याने जवळपास 100 जणांची प्रकृती खालावली. त्यापैकी 50 जणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यात शनिवारी रात्री अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका धार्मिक कार्यक्रमात झालेल्या जेवणातून विषबाधा झाल्याने जवळपास 100 जणांची प्रकृती खालावली. त्यापैकी 50 जणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारीही रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी रुग्णांची प्रकृती जाणून घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, बांसवाडा शहरातील नया गावाजवळील पनियाला गावात अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. श्राद्धानिमित्त एका कुटुंबाने जेवण ठेवलं होतं. या कार्यक्रमासाठी 200 हून अधिक लोक जमले होते. तेथे अन्नातून विषबाधा झाल्याने अन्न खाणाऱ्या लोकांची प्रकृती ढासळू लागली. त्यामुळे तेथे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर त्यांना जिल्हा मुख्यालयात असलेल्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

50 हून अधिक जण रुग्णालयात दाखल 

डॉ. जिग्नेश पंड्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी 200 हून अधिक लोक उपस्थित होते. त्यापैकी सुमारे 100 जणांना त्रास झाला. 50 हून अधिक जणांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातही एकाचवेळी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने भीतीचे वातावरण होते. माहिती मिळताच जिल्हाधिकार्‍यांसह इतर वरिष्ठ अधिकारी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

जेवल्यानंतर लोकांना उलट्या आणि जुलाब 

कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, जेवल्यानंतर लगेचच लोकांना उलट्या आणि जुलाब असा त्रास सुरू झाला. एकामागून एक लोक आजारी पडू लागले. त्यानंतर लोकांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत लोकांना रुग्णालयात आणण्यात येत होतं. हे पाहता रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय अधिकारी तेथेच उभे होते. त्याचवेळी परिस्थिती पाहता अतिरिक्त कर्मचारीही पाचारण करण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान