शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

तीन वर्षात बँकांचे १.७६ लाख कोटी रुपये बुडाले, नोटबंदीनंतर बँकांची वाताहत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 14:58 IST

नोटबंदीनंतर बँकांकडून कोट्यवधींची कर्ज माफ

नवी दिल्ली: गेल्या तीन वर्षात भारतीय बँकांनी तब्बल १.७६ लाख कोटी रुपये गमावले आहेत. शंभर कोटींपेक्षा अधिकचं कर्ज बुडवणाऱ्या ४१६ खातेधारकांची माहिती नुकतीच समोर आली आहे. या व्यक्तींनी बुडवलेल्या कर्जाची सरासरी रक्कम ४२४ कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात बँकांनी दिलेलं कर्ज बुडित खात्यात गेलं आहे. मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन ते बुडवणाऱ्या व्यक्तींचा आकडा पहिल्यांदाच समोर आला आहे. शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम बुडवणाऱ्या खातेधारकांची माहिती जाहीर करण्याच्या सूचना आरबीआयनं बँकांना दिल्या होत्या. त्यानंतर याबद्दलची आकडेवारी 'सीएनएन-न्यूज१८'नं माहिती अधिकारातून समोर आणली आहे. २०१४-१५ पासून सरकारी आणि खासगी बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्जमाफी करण्यात आल्याची आकडेवारी यात आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीत देशातील शेड्युल्ड कमर्शियल बँकांनी एकूण २.१७ कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत बँकांनी ६९,९७६ कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं होतं. यानंतर ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. नोटबंदीनंतरच्या दोन वर्षांमध्ये माफ करण्यात आलेल्या कर्जाचा आकडा थेट १,२७,७९७ कोटींवर जाऊन पोहोचला. म्हणजेच नोटाबंदीनंतर बँकांचं बुडित खात्यात गेलेलं कर्ज तब्बल ८३ टक्क्यांनी वाढलं. यानंतरही बँकांचं कर्ज बुडवणाऱ्यांची संख्या वाढतच गेली. त्यामुळे बुडित खात्यात गेलेली रक्कम १.२७ लाख कोटी रुपयांवरुन २.१७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली.  

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक