शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

तीन वर्षात बँकांचे १.७६ लाख कोटी रुपये बुडाले, नोटबंदीनंतर बँकांची वाताहत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 14:58 IST

नोटबंदीनंतर बँकांकडून कोट्यवधींची कर्ज माफ

नवी दिल्ली: गेल्या तीन वर्षात भारतीय बँकांनी तब्बल १.७६ लाख कोटी रुपये गमावले आहेत. शंभर कोटींपेक्षा अधिकचं कर्ज बुडवणाऱ्या ४१६ खातेधारकांची माहिती नुकतीच समोर आली आहे. या व्यक्तींनी बुडवलेल्या कर्जाची सरासरी रक्कम ४२४ कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात बँकांनी दिलेलं कर्ज बुडित खात्यात गेलं आहे. मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन ते बुडवणाऱ्या व्यक्तींचा आकडा पहिल्यांदाच समोर आला आहे. शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम बुडवणाऱ्या खातेधारकांची माहिती जाहीर करण्याच्या सूचना आरबीआयनं बँकांना दिल्या होत्या. त्यानंतर याबद्दलची आकडेवारी 'सीएनएन-न्यूज१८'नं माहिती अधिकारातून समोर आणली आहे. २०१४-१५ पासून सरकारी आणि खासगी बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्जमाफी करण्यात आल्याची आकडेवारी यात आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीत देशातील शेड्युल्ड कमर्शियल बँकांनी एकूण २.१७ कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत बँकांनी ६९,९७६ कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं होतं. यानंतर ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. नोटबंदीनंतरच्या दोन वर्षांमध्ये माफ करण्यात आलेल्या कर्जाचा आकडा थेट १,२७,७९७ कोटींवर जाऊन पोहोचला. म्हणजेच नोटाबंदीनंतर बँकांचं बुडित खात्यात गेलेलं कर्ज तब्बल ८३ टक्क्यांनी वाढलं. यानंतरही बँकांचं कर्ज बुडवणाऱ्यांची संख्या वाढतच गेली. त्यामुळे बुडित खात्यात गेलेली रक्कम १.२७ लाख कोटी रुपयांवरुन २.१७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली.  

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक