शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

तीन वर्षात बँकांचे १.७६ लाख कोटी रुपये बुडाले, नोटबंदीनंतर बँकांची वाताहत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 14:58 IST

नोटबंदीनंतर बँकांकडून कोट्यवधींची कर्ज माफ

नवी दिल्ली: गेल्या तीन वर्षात भारतीय बँकांनी तब्बल १.७६ लाख कोटी रुपये गमावले आहेत. शंभर कोटींपेक्षा अधिकचं कर्ज बुडवणाऱ्या ४१६ खातेधारकांची माहिती नुकतीच समोर आली आहे. या व्यक्तींनी बुडवलेल्या कर्जाची सरासरी रक्कम ४२४ कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात बँकांनी दिलेलं कर्ज बुडित खात्यात गेलं आहे. मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन ते बुडवणाऱ्या व्यक्तींचा आकडा पहिल्यांदाच समोर आला आहे. शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम बुडवणाऱ्या खातेधारकांची माहिती जाहीर करण्याच्या सूचना आरबीआयनं बँकांना दिल्या होत्या. त्यानंतर याबद्दलची आकडेवारी 'सीएनएन-न्यूज१८'नं माहिती अधिकारातून समोर आणली आहे. २०१४-१५ पासून सरकारी आणि खासगी बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्जमाफी करण्यात आल्याची आकडेवारी यात आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीत देशातील शेड्युल्ड कमर्शियल बँकांनी एकूण २.१७ कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत बँकांनी ६९,९७६ कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं होतं. यानंतर ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. नोटबंदीनंतरच्या दोन वर्षांमध्ये माफ करण्यात आलेल्या कर्जाचा आकडा थेट १,२७,७९७ कोटींवर जाऊन पोहोचला. म्हणजेच नोटाबंदीनंतर बँकांचं बुडित खात्यात गेलेलं कर्ज तब्बल ८३ टक्क्यांनी वाढलं. यानंतरही बँकांचं कर्ज बुडवणाऱ्यांची संख्या वाढतच गेली. त्यामुळे बुडित खात्यात गेलेली रक्कम १.२७ लाख कोटी रुपयांवरुन २.१७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली.  

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक