शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

महामार्ग बांधणीच्या रथाला बँकांच्या नकाराचा अडसर

By admin | Updated: May 8, 2017 05:11 IST

केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचा महामार्ग बांधणीचा वेगवान रथ आता बँकांनी अडवला आहे. बँकांनी कर्जपुरवठा करण्यास

सुरेश भटेवरा/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचा महामार्ग बांधणीचा वेगवान रथ आता बँकांनी अडवला आहे. बँकांनी कर्जपुरवठा करण्यास नकार दिल्याने, महामार्ग बांधणीच्या सुमारे ३० प्रकल्पांचे काम टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊनही सुरू होऊ शकलेले नाही. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ डिसेंबर २0१५ रोजी भूमिपूजन करण्यात आलेल्या दिल्ली मेरठ एक्स्प्रेस-वेच्या दोन टप्प्यांचाही समावेश आहे. कर्जपुरवठा रोखणाऱ्या बँका म्हणतात, आर्थिकदृष्ट्या हे महामार्ग प्रकल्प व्यवहार्य नाहीत, कारण प्रकल्प उभारणाऱ्या खाजगी कंपन्या प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही कर्जाची परतफेड करू शकतील की नाही, याविषयी बँकांना शंका आहे. बँकांच्या दृष्टिने या प्रकल्पांचे आर्थिक गणित (फायनान्शिअल क्लोजर) भंरवशाचे नाही. साहजिकच बुडित कर्जांच्या (एनपीए) ओझ्याखाली अगोदरच दबलेल्या बँका महामार्ग प्रकल्पांना कर्ज पुरवून नवा धोका पत्करायला तयार नाहीत.दिल्लीत झालेल्या एका बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांनी महामार्ग बांधणीच्या ६७ कामांविषयी सद्यस्थितीचे सादरीकरण मंत्री गडकरी यांच्यासमोर केले. यापैकी २२४३ कि.मी. अंतराच्या ३0 प्रकल्पांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होऊनही बँकांना ‘फायनान्शिअल क्लोजर’ विषयी समाधान नसल्याने हे प्रकल्प अडकून पडले आहेत, असे सांगण्यात आले. यापैकी बहुतांश महामार्ग हे ‘हायब्रिड अ‍ॅन्युईटी मॉडेलनु’सार बांधण्यात येणार आहेत.महामार्ग बांधणीच्या प्रकल्प उभारणीत सहभागी एका कंपनीच्या अभियंत्याने नाव जाहीर न करण्याच्या शर्तीवर सांगीतले की प्रकल्पांचे ‘फायनान्शिअल क्लोजर’ न होण्यास मुख्यत्वे बँकांच जबाबदार आहेत. एनपीएच्या भीतीमुळे बँकांचे अधिकारी कर्जपुरवठा करायला तयार नाहीत. त्यांना वाटते की हे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाहीत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही खाजगी कंपन्यांना त्यातून कर्जांची परतफेड करता येईल एवढा पैसा मिळेल, असे बँकांना वाटत नाही.पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दिल्ली मेरठ या महत्वाकांक्षी महामार्ग बांधणीच्या कामाचे भूमिपूजन ३१ डिसेंबर २0१५ रोजी करण्यात आले होते. या महामार्गाच्या उभारणीचे काम तीन टप्प्यात होणार आहे. तथापि ‘एनएचएआय’च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यक्षात ३ पैकी एकाच टप्प्याचे कामच गेल्या दिड वर्षात सुरू होऊ शकले आहे. देशात २२४३ कि.मी. अंतराचे आणखी २९ प्रकल्प बँकांनी कर्जपुरवठयास नकार दिल्यामुळे रखडले आहेत.सरकारी आश्वासनही अपुरेबँकांची भीती लक्षात आल्यावर परिवहन मंत्रालयाने एक बैठक आयोजित केली. बैठकीला बँक अधिकारीदेखील उपस्थित होते.बँकांना विनंती करण्यात आली की, महामार्ग बांधणीत ज्यांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत, त्या कंपन्यांना बँकांनी कर्जपुरवठा केला, तर प्रकल्पांचे कामकाज सुरू होऊ शकेल. कर्जाच्या परतफेडीत बँकांना काही अडचणी आल्याच, तर केंद्र सरकार बँकांना मदत करील. तथापि, या आश्वासनानंतरही बँका कर्जपुरवठ्यासाठी तयार नाहीत.कर्जाच्या परतफेडीत बँकांना काही अडचणी आल्याच, तर केंद्र सरकार बँकांना मदत करील. तथापि, या आश्वासनानंतरही बँका कर्जपुरवठ्यासाठी तयार नाहीत.