शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

अनधिकृत व्यवहारांची जबाबदारी बँकांचीच; भरपाई द्यावीच लागेल : सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:39 IST

सर्वोच्च न्यायालयाने खातेधारकांनाही अत्यंतिक सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली: अनधिकृत वित्तीय व्यवहारांची माहिती तत्काळ बँकेला दिली गेली असेल, तर त्यासाठी भरपाई देण्याची जबाबदारी बँकांवरच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ग्राहकांच्या खात्यातील अनधिकृत व्यवहारांच्या जबाबदारीपासून बँका मागे हदू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने बँकांना स्पष्ट शब्दांत बजावले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने खातेधारकांनाही अत्यंतिक सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्याही प्रकारच्या बँक व्यवहारांशी संबंधित ओटीपी अन्य व्यक्तीस दिला जाणार नाही, याची खबरदारी ग्राहकांनी घेतली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले. न्या. जे. बी. पारदीवाला आणि न्या. आर महादेवन यांच्या न्यायपीठाने हा निर्णय दिला. एक ग्राहक आणि भारतीय स्टेट बैंक यांच्यातील वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

काय होते प्रकरण? 

ईशान्य भारतातील एका ग्राहकाने ऑनलाइन शॉपिंग केली होती. खरेदी केलेले साहित्य परत करीत असताना एका भामट्याचा त्याला फोन आला. भामट्याच्या सांगण्यावरून त्याने एक अॅप डाऊनलोड केले. त्याद्वारे भामट्यांनी त्याच्या खात्यावरून ९४.२०४.८० रुपये उडवले.

याप्रकरणी ग्राहकाने बँकेकडे भरपाई मागितली. मात्र, ती बँकेने नाकारली. गुवाहाटी उच्च न्यायालयाने ग्राहकाच्या बाजूने निकाल देऊन त्याचे पैसे परत करण्याचे आदेश बँकेला दिले. या आदेशास बँकेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. आता सर्वोच्च न्यायालयानेही ग्राहकाच्या बाजूने निकाल दिला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय