शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

'बँकेने प्रकरण सार्वजनिक करत पैसे मिळवण्याचे सर्व मार्ग बंद करुन घेतलेत', नीरव मोदीच्या उलट्या बोंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 09:02 IST

पंजाब नॅशनल बँकेने प्रकरण सार्वजनिक करत आपले कर्ज परत करण्याची क्षमता असणारे सर्व मार्ग बंद केल्याची बोंब नीरव मोदी मारत आहे

मुंबई - देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदीने प्रकरणातून हात काढत बँकेला जबाबदार धरत उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने प्रकरण सार्वजनिक करत आपले कर्ज परत करण्याची क्षमता असणारे सर्व मार्ग बंद केल्याची बोंब नीरव मोदी मारत आहे. दरम्यान यावेळी बँकेने दाखवलेली आकडेवारी आपण घेतलेल्या कर्जापेक्षा जास्त आहे असा दावाही त्याने केला आहे. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँक व्यवस्थापनाला 15/16 फेब्रुवारीदरम्यान एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र पीटीआयच्या हाती लागलं आहे. या पत्रात नीरव मोदीने आपली कर्जाची रक्कम पाच हजार कोटींपेक्षा कमी असल्याचा दावाही केला आहे. 

'कर्जाचा आकडा फुगवून सांगण्यात आल्या कारणाने प्रसारमाध्यमांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं आणि यामुळे लगेत शोधमोहिम आणि जप्तीची कारवाई सुरु झाली. प्रकरण सार्वजनिक करण्यात आल्या कारणाने आमच्या व्यवसायावर परिणाम झाला', असं नीरव मोदीने पत्रात लिहिलं आहे. 'यामुळे आमची कर्जफेडीची क्षमता कमी झाली आहे', असा दावाही त्याने पत्रातून केला आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नीरव मोदी आपल्या कुटुंबासोबत देश सोडून पळून गेला आहे.  

'कर्जवसुली करण्याच्या घाईत तुम्ही मी दिलेल्या ऑफरकडे दुर्लक्ष करत प्रकरण सार्वजनिक केलं. यामुळे आमचा ब्रॅण्ड आणि व्यवसाय उद्ध्वस्त झाला असून कर्जफेडीचे सर्व मार्ग बंद केले आहेत', असं नीरव मोदीन पत्रात लिहिलं आहे. 

मोदी व चोकसींनी २४ कंपन्या, १८ व्यावसायिकांनाही बुडवलेनीरव मोदी व मेहूल चोकसी जोडगोळीने सरकारी बँकाच नव्हे, तर २४ कंपन्या व १८ व्यावसायिकांनाही दिवाळखोर केले आहे. २0१३ ते २0१७ या काळात या कंपन्या व व्यक्तींनी मोदी-चोकसी यांच्या कंपन्यांची फ्रँचाइजी घेतली होती. दिल्ली, आग्रा, मेरठ, बंगळुरू, म्हैसूर, कर्नाल तसेच गुजरात व राजस्थानातील अनेक ठिकाणांसाठी या फ्रँचाइजी घेण्यात आल्या होत्या. फ्रँचाइजीसाठी मोदी-चोकसीच्या कंपन्यांनी ३ ते २0 कोटी डिपॉझिट घेतले होते. तथापि, नंतर त्यांना हिरे आणि रत्ने दिलीच नाहीत. या कंपन्या-व्यावसायिकांनी दोघांविरोधात फौजदारी तक्रारी दाखल केल्या आहेत.

पीएनबीने गमावले १0,७८१ कोटींचे बाजार भांडवलपंजाब नॅशनल बँकेने गेल्या बुधवारी नीरव मोदीच्या घोटाळ्याची माहिती जाहीर केली. तेव्हापासून बँकेचे समभाग घसरणीला लागले आहेत. मुंबई शेअर बाजारात गेल्या चार सत्रांत बँकेचे समभाग २८ टक्क्यांनी घसरले आहेत. १0,७८१.१२ कोटी रुपयांचे बाजार भांडवल बँकेने गमावले आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा