शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'बँकेने प्रकरण सार्वजनिक करत पैसे मिळवण्याचे सर्व मार्ग बंद करुन घेतलेत', नीरव मोदीच्या उलट्या बोंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 09:02 IST

पंजाब नॅशनल बँकेने प्रकरण सार्वजनिक करत आपले कर्ज परत करण्याची क्षमता असणारे सर्व मार्ग बंद केल्याची बोंब नीरव मोदी मारत आहे

मुंबई - देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदीने प्रकरणातून हात काढत बँकेला जबाबदार धरत उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने प्रकरण सार्वजनिक करत आपले कर्ज परत करण्याची क्षमता असणारे सर्व मार्ग बंद केल्याची बोंब नीरव मोदी मारत आहे. दरम्यान यावेळी बँकेने दाखवलेली आकडेवारी आपण घेतलेल्या कर्जापेक्षा जास्त आहे असा दावाही त्याने केला आहे. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँक व्यवस्थापनाला 15/16 फेब्रुवारीदरम्यान एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र पीटीआयच्या हाती लागलं आहे. या पत्रात नीरव मोदीने आपली कर्जाची रक्कम पाच हजार कोटींपेक्षा कमी असल्याचा दावाही केला आहे. 

'कर्जाचा आकडा फुगवून सांगण्यात आल्या कारणाने प्रसारमाध्यमांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं आणि यामुळे लगेत शोधमोहिम आणि जप्तीची कारवाई सुरु झाली. प्रकरण सार्वजनिक करण्यात आल्या कारणाने आमच्या व्यवसायावर परिणाम झाला', असं नीरव मोदीने पत्रात लिहिलं आहे. 'यामुळे आमची कर्जफेडीची क्षमता कमी झाली आहे', असा दावाही त्याने पत्रातून केला आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नीरव मोदी आपल्या कुटुंबासोबत देश सोडून पळून गेला आहे.  

'कर्जवसुली करण्याच्या घाईत तुम्ही मी दिलेल्या ऑफरकडे दुर्लक्ष करत प्रकरण सार्वजनिक केलं. यामुळे आमचा ब्रॅण्ड आणि व्यवसाय उद्ध्वस्त झाला असून कर्जफेडीचे सर्व मार्ग बंद केले आहेत', असं नीरव मोदीन पत्रात लिहिलं आहे. 

मोदी व चोकसींनी २४ कंपन्या, १८ व्यावसायिकांनाही बुडवलेनीरव मोदी व मेहूल चोकसी जोडगोळीने सरकारी बँकाच नव्हे, तर २४ कंपन्या व १८ व्यावसायिकांनाही दिवाळखोर केले आहे. २0१३ ते २0१७ या काळात या कंपन्या व व्यक्तींनी मोदी-चोकसी यांच्या कंपन्यांची फ्रँचाइजी घेतली होती. दिल्ली, आग्रा, मेरठ, बंगळुरू, म्हैसूर, कर्नाल तसेच गुजरात व राजस्थानातील अनेक ठिकाणांसाठी या फ्रँचाइजी घेण्यात आल्या होत्या. फ्रँचाइजीसाठी मोदी-चोकसीच्या कंपन्यांनी ३ ते २0 कोटी डिपॉझिट घेतले होते. तथापि, नंतर त्यांना हिरे आणि रत्ने दिलीच नाहीत. या कंपन्या-व्यावसायिकांनी दोघांविरोधात फौजदारी तक्रारी दाखल केल्या आहेत.

पीएनबीने गमावले १0,७८१ कोटींचे बाजार भांडवलपंजाब नॅशनल बँकेने गेल्या बुधवारी नीरव मोदीच्या घोटाळ्याची माहिती जाहीर केली. तेव्हापासून बँकेचे समभाग घसरणीला लागले आहेत. मुंबई शेअर बाजारात गेल्या चार सत्रांत बँकेचे समभाग २८ टक्क्यांनी घसरले आहेत. १0,७८१.१२ कोटी रुपयांचे बाजार भांडवल बँकेने गमावले आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा