शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

बंगाल हिंसाचाराचे बांगलादेश कनेक्शन; पैशांचे फंडिंग झाल्याचे पुरावे, रामनवमीची ठरली होती तारीख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 17:33 IST

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात नवीन वक्फ कायद्यावरून झालेल्या हिंसाचाराच्या प्राथमिक चौकशीची माहिती गृह मंत्रालयाला देण्यात आली आहे.

West Bengal Murshidabad Violence : वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्यावरुन पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. वक्फ विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतरही पश्चिम बंगालमध्ये त्याला जोरदार विरोध करण्यात येत आहे. या विरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबादमध्ये हिंसक आंदोलन झालं. या आंदोलनात तीन जणांचा मृत्यू झाला तर २०० जणांना अटक करण्यात आली. मुर्शिदाबादमधील अनेक ठिकाणी दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर आता हा सर्व पूर्वनियोजत कट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात बांगलादेशी दंगलखोरांचा सहभाग असल्याचा खुलासा प्राथमिक तपासात झाला आहे.

वक्फ कायद्याच्या निषेधाच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल केंद्रीय तपास यंत्रणांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या हिंसाचारामागे बांगलादेशस्थित दहशतवादी संघटना अन्सार उल बांगला टीम असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत-बांगलादेश सीमेला लागून असलेल्या भागात एबीटी स्लीपर सेल सक्रिय आहेत, जे बऱ्याच वेळापासून या हिंसाचाराची योजना आखत होते, अशी माहिती माध्यमांनी दिली. सरकारी सूत्रांनुसार, हिंसाचारात काही बांगलादेशी लोकांचा सहभाग होता.

सोमवारी मुर्शिदाबादनंतर दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात इंडियन सेक्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या होत्या. त्यानंतर पुन्हा बंगालमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. हिंसाचारानंतर, जांगीपूर, धुलियान, सुती आणि शमशेरगंज सारख्या संवेदनशील भागात बीएसएफ, सीआरपीएफ, राज्य सशस्त्र पोलिस आणि आरएएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. अशातच गृहमंत्रालयाला देण्यात आलेल्या माहितीनुसार, या हिंसाचाराचे नियोजन बऱ्याच काळापासून केले जात होते. गेल्या ३ महिन्यांपासून परिसरातील लोक ही घटना घडवून आणण्याचा कट रचत होते. यासाठी परदेशातून निधी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांना मिळालेल्या पुराव्यानुसार या हिंसाचारासाठी सुरुवातीला रामनवमीची तारीख ठरवण्यात आली होती. मात्र कडक सुरक्षेमुळे निर्णय बदलला आणि मग नवीन वक्फ कायद्याच्या मंजुरीनंतर हिंसाचार घडवण्यात आला. तपास यंत्रणेला असाही संशय आहे की हे स्लीपर सेल मुर्शिदाबाद व्यतिरिक्त भारत-बांगलादेश सीमेवरील इतर सीमावर्ती जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारचा हिंसाचार घडवून आणण्याची योजना आखत आहेत. हिंसाचार घडवून आणण्यासाठी परदेशातून पैसे पाठवण्यात आल्याचे पुरावे सापडले आहेत. या पैशाचा वापर गर्दी गोळा करण्यासाठी, सोशल मीडियावर प्रक्षोभक मेसेज पसरवण्यासाठी करण्यात आला. 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डwest bengalपश्चिम बंगालBangladeshबांगलादेश