शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बंगाल हिंसाचाराचे बांगलादेश कनेक्शन; पैशांचे फंडिंग झाल्याचे पुरावे, रामनवमीची ठरली होती तारीख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 17:33 IST

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात नवीन वक्फ कायद्यावरून झालेल्या हिंसाचाराच्या प्राथमिक चौकशीची माहिती गृह मंत्रालयाला देण्यात आली आहे.

West Bengal Murshidabad Violence : वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्यावरुन पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. वक्फ विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतरही पश्चिम बंगालमध्ये त्याला जोरदार विरोध करण्यात येत आहे. या विरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबादमध्ये हिंसक आंदोलन झालं. या आंदोलनात तीन जणांचा मृत्यू झाला तर २०० जणांना अटक करण्यात आली. मुर्शिदाबादमधील अनेक ठिकाणी दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर आता हा सर्व पूर्वनियोजत कट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात बांगलादेशी दंगलखोरांचा सहभाग असल्याचा खुलासा प्राथमिक तपासात झाला आहे.

वक्फ कायद्याच्या निषेधाच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल केंद्रीय तपास यंत्रणांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या हिंसाचारामागे बांगलादेशस्थित दहशतवादी संघटना अन्सार उल बांगला टीम असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत-बांगलादेश सीमेला लागून असलेल्या भागात एबीटी स्लीपर सेल सक्रिय आहेत, जे बऱ्याच वेळापासून या हिंसाचाराची योजना आखत होते, अशी माहिती माध्यमांनी दिली. सरकारी सूत्रांनुसार, हिंसाचारात काही बांगलादेशी लोकांचा सहभाग होता.

सोमवारी मुर्शिदाबादनंतर दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात इंडियन सेक्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या होत्या. त्यानंतर पुन्हा बंगालमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. हिंसाचारानंतर, जांगीपूर, धुलियान, सुती आणि शमशेरगंज सारख्या संवेदनशील भागात बीएसएफ, सीआरपीएफ, राज्य सशस्त्र पोलिस आणि आरएएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. अशातच गृहमंत्रालयाला देण्यात आलेल्या माहितीनुसार, या हिंसाचाराचे नियोजन बऱ्याच काळापासून केले जात होते. गेल्या ३ महिन्यांपासून परिसरातील लोक ही घटना घडवून आणण्याचा कट रचत होते. यासाठी परदेशातून निधी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांना मिळालेल्या पुराव्यानुसार या हिंसाचारासाठी सुरुवातीला रामनवमीची तारीख ठरवण्यात आली होती. मात्र कडक सुरक्षेमुळे निर्णय बदलला आणि मग नवीन वक्फ कायद्याच्या मंजुरीनंतर हिंसाचार घडवण्यात आला. तपास यंत्रणेला असाही संशय आहे की हे स्लीपर सेल मुर्शिदाबाद व्यतिरिक्त भारत-बांगलादेश सीमेवरील इतर सीमावर्ती जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारचा हिंसाचार घडवून आणण्याची योजना आखत आहेत. हिंसाचार घडवून आणण्यासाठी परदेशातून पैसे पाठवण्यात आल्याचे पुरावे सापडले आहेत. या पैशाचा वापर गर्दी गोळा करण्यासाठी, सोशल मीडियावर प्रक्षोभक मेसेज पसरवण्यासाठी करण्यात आला. 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डwest bengalपश्चिम बंगालBangladeshबांगलादेश