शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशींचा घुसखोरीचा प्रयत्न; हजारो नागरिक जमले बिहार सीमेवर, भारतात आश्रय देण्याची केली विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 07:13 IST

हजारो बांगलादेशी नागरिक सीमेवर जमा झाल्याचे व भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळताच बीएसएफचे कमांडंट अजय शुक्ला तसेच बिहारमधील इस्लामपूर येथील पोलिस घटनास्थळी पोहोचले.

एस. पी. सिन्हा -पाटणा/नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसक कारवाया तसेच राजकीय अस्थिरता यामुळे गांजलेले काही हजार लोक भारतालगतच्या सीमेवर जमा झाले होते. तिथून त्यांनी बिहारच्या किशनगंज जिल्ह्यात घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न गुरुवारी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हाणून पाडला. आम्हाला भारतात आश्रय द्या, अशी विनंती हे बांगलादेशी नागरिक करत आहेत.

हजारो बांगलादेशी नागरिक सीमेवर जमा झाल्याचे व भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळताच बीएसएफचे कमांडंट अजय शुक्ला तसेच बिहारमधील इस्लामपूर येथील पोलिस घटनास्थळी पोहोचले. बांगलादेशच्या हद्दीत जमा झालेल्या हजारो नागरिकांशी संवाद साधून, त्यांची समजूत काढून त्यांना परत पाठविण्यात आले. 

बांगलादेशमधील जनतेच्या हिताला भारत देतो प्राधान्यnबांगलादेशच्या जनतेच्या हिताला आम्ही प्राधान्य देतो. त्या देशात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असे भारताने गुरुवारी सांगितले. nपरराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ही माहिती दिली.

‘भारतात अस्थिरतेचा प्रयत्न सुरू’बांगलादेशमधील उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर भारतात अस्थिरता व तेथील जनतेमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे काही प्रवृत्तींचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख शांताकुमारी यांनी  केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील राष्ट्रसेविका समिती ही महिला संघटना आहे. 

‘कठीण प्रसंगात आईबरोबर असणे आवश्यक होते’ढाका : बांगलादेशमधील घटनांमध्ये झालेल्या जीवितहानीमुळे मी अतिशय दु:खी झाले, असे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कन्या सायमा वाझेद यांनी गुरुवारी सांगितले. त्या म्हणाल्या की, अतिशय कठीण प्रसंगात मी माझ्या आईसोबत नाही याचे अतिशय वाईट वाटते. सायमा वाझेद या जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाच्या विभागीय संचालक आहेत. 

मुख्यमंत्री शिंदेंची परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चामुंबई : राज्यातील विद्यार्थी, अभियंत्यांना मायदेशात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येईल, असे एस. जयशंकर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

सरकारसोबत काम करणार : अमेरिकान्यूयॉर्क : बांगलादेशात लोकशाही पुन्हा प्रस्थापित व्हावी म्हणून प्रयत्नशील आहे. त्यामुळे तिथे सत्तेवर येणाऱ्या मुहम्मद युनूस प्रमुख असलेल्या हंगामी सरकारबरोबर काम करण्यास आम्ही तयार आहोत, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले.

घटनांमागे पाकिस्तानी गुप्तहेर संघटनाढाका : बांगलादेशमध्ये लोकशाही पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसिना त्या देशात परत येतील असे त्यांचे पुत्र सजीब वाझेद जॉय यांनी गुरुवारी सांगितले. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयने केलेल्या कारवायांमुळे बांगलादेशात अशांतता निर्माण झाली, असा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशinfiltrationघुसखोरीBiharबिहार