शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"देश सुरक्षित राहिला तर राहुल गांधीही सुरक्षित राहतील…", असं का म्हणाले ब्रिजभूषण सिंह?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 13:16 IST

Brij Bhushan Sharan Singh : बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांना, विशेषत: हिंदूंना सातत्यानं लक्ष्य केलं जात आहे, याबाबत भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी चिंता व्यक्त करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Brij Bhushan Sharan Singh : मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन होऊन सुद्धा बांगलादेशातील परिस्थिती सामान्य झालेली नाही. बांगलादेशातील परिस्थिती अद्याप नियंत्रणाबाहेर आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे समर्थक बंड करू शकतात, असं म्हटलं जात आहे. तसंच, जमावाकडून देशात अनेक हिंदू समुदायावर हल्ले करण्यात येत आहेत. दरम्यान, बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांना, विशेषत: हिंदूंना सातत्यानं लक्ष्य केलं जात आहे, याबाबत भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी चिंता व्यक्त करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सांगितलं की, बांगलादेशमध्ये अत्यंत दुःखद परिस्थिती आहे. हे सर्व भारताच्या शेजारी घडत आहे. बांगलादेशात जे काही घडले आणि घडत आहे, त्याचा आपण कितीही निषेध केला तरी, त्यासाठी शब्द कमी आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, हे खेदजनक आहे. तसंच, देशातील मोठे नेते यावर बोलत नाहीत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एकही ट्विट केलेलं नाही. ही देशाची जबाबदारी जेवढी मोदी आणि भाजपची आहे, तेवढीच विरोधकांचीही आहे, असं ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले.

याचबरोबर, कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा संदर्भ देत ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, बंगालमध्ये डॉक्टर सुरक्षित नाहीत. पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्या असल्याचं म्हटलं होतं. तसंच, बांगलादेशच्या बाजूला कोलकाता आहे. त्यामुळं देश सुरक्षित राहिला तर राहुल गांधीही सुरक्षित राहतील, असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सांगितलं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केला होता. यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. 

शेख हसीना सध्या भारतात आश्रयाला आल्या आहेत. या घटनेनंतर आता बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. तरीही बांगलादेशातील परिस्थिती सामान्य झालेली नाही. बांगलादेशात शेकडो हिंदूंची घरे जाळण्यात आली. अनेक मंदिरांवर हल्ले झाले आहेत, त्यानंतर हिंदू समाज रस्त्यावर उतरला असून सुरक्षेची मागणी करत आहे. तसंच अल्पसंख्याकांवर अत्याचार करणाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापन करावं, अल्पसंख्याकांसाठी १० टक्के संसदीय जागा, अल्पसंख्याक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, अशा विविध मागण्या हिंदू समाजाकडून करण्यात येत आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीbrij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहBangladeshबांगलादेश