शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:23 IST

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि इतर काही ठिकाणी झालेल्या हिंसाचाराबद्दल बांगलादेशने चुकीच्या टिप्पण्या केल्या आहेत.

India on Bangladesh: नव्या वक्फ कायद्यावरुन पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये बांगलादेशचे कनेक्शन समोर आलं होतं. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात बांगलादेशी दंगलखोरांचा सहभाग असल्याचा खुलासा प्राथमिक तपासात झाला आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर भाष्य केल्याबद्दल भारताने बांगलादेशला चांगलेच सुनावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हिंसाचारावर बांगलादेशने केलेले भाष्य नाकारले. त्यांची टिप्पणी चुकीची आहे आणि बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांवरून लक्ष विचलित करणे हा त्यांचा उद्देश असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.

पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर बांगलादेशने भारतातील अल्पसंख्याक मुस्लिमांबाबत एक विधान केले. मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी नवी दिल्लीला अल्पसंख्याक मुस्लिम लोकसंख्येचे पूर्ण संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले. यासोबतच, त्यांनी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील सांप्रदायिक हिंसाचारात बांगलादेशचा सहभाग असल्याची भूमिका नाकारली. यावरुनच परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशला फटकारले.

पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर विधाने करणाऱ्या बांगलादेशला परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सुनावले आहे. भारताच्या मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करण्याऐवजी बांगलादेशने त्यांच्या देशातील अल्पसंख्याकांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करावे, असं रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं.

"पश्चिम बंगालमधील घटनांबद्दल बांगलादेशची भूमिका आम्हाला मान्य नाही. बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील अत्याचारांबद्दल भारताच्या चिंतेवरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. असे गुन्हे करणारे लोक तिथे मुक्तपणे फिरत आहेत. अनावश्यक टिप्पण्या करण्याऐवजी आणि चांगुलपणा दाखवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, बांगलादेशने आपल्या देशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे," असे रणधीर जयस्वाल म्हणाले.

दरम्यान,  वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेने मंजूर केल्यानंतर, विरोधकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मुर्शिदाबादसह पश्चिम बंगालच्या अनेक भागात वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध हिंसक निदर्शने झाली. जातीय हिंसाचाराच्या घटनांवरून भाजपने बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. बंगालमधील अनियंत्रित परिस्थितीवरुन भाजपने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डBangladeshबांगलादेशIndiaभारतwest bengalपश्चिम बंगाल