शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:23 IST

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि इतर काही ठिकाणी झालेल्या हिंसाचाराबद्दल बांगलादेशने चुकीच्या टिप्पण्या केल्या आहेत.

India on Bangladesh: नव्या वक्फ कायद्यावरुन पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये बांगलादेशचे कनेक्शन समोर आलं होतं. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात बांगलादेशी दंगलखोरांचा सहभाग असल्याचा खुलासा प्राथमिक तपासात झाला आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर भाष्य केल्याबद्दल भारताने बांगलादेशला चांगलेच सुनावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हिंसाचारावर बांगलादेशने केलेले भाष्य नाकारले. त्यांची टिप्पणी चुकीची आहे आणि बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांवरून लक्ष विचलित करणे हा त्यांचा उद्देश असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.

पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर बांगलादेशने भारतातील अल्पसंख्याक मुस्लिमांबाबत एक विधान केले. मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी नवी दिल्लीला अल्पसंख्याक मुस्लिम लोकसंख्येचे पूर्ण संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले. यासोबतच, त्यांनी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील सांप्रदायिक हिंसाचारात बांगलादेशचा सहभाग असल्याची भूमिका नाकारली. यावरुनच परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशला फटकारले.

पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर विधाने करणाऱ्या बांगलादेशला परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सुनावले आहे. भारताच्या मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करण्याऐवजी बांगलादेशने त्यांच्या देशातील अल्पसंख्याकांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करावे, असं रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं.

"पश्चिम बंगालमधील घटनांबद्दल बांगलादेशची भूमिका आम्हाला मान्य नाही. बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील अत्याचारांबद्दल भारताच्या चिंतेवरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. असे गुन्हे करणारे लोक तिथे मुक्तपणे फिरत आहेत. अनावश्यक टिप्पण्या करण्याऐवजी आणि चांगुलपणा दाखवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, बांगलादेशने आपल्या देशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे," असे रणधीर जयस्वाल म्हणाले.

दरम्यान,  वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेने मंजूर केल्यानंतर, विरोधकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मुर्शिदाबादसह पश्चिम बंगालच्या अनेक भागात वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध हिंसक निदर्शने झाली. जातीय हिंसाचाराच्या घटनांवरून भाजपने बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. बंगालमधील अनियंत्रित परिस्थितीवरुन भाजपने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डBangladeshबांगलादेशIndiaभारतwest bengalपश्चिम बंगाल