शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महापुरामुळे डोक्यावरुन छत हरवलेल्या 800 भारतीयांना बांगलादेशने दिला आसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 16:38 IST

पश्चिम बंगालमध्ये पुराने थैमान घातला असून अनेकजण बेघर झाले आहेत

ढाका, दि. 21 - पश्चिम बंगालमध्ये पुराने थैमान घातला असून अनेकजण बेघर झाले आहेत. अशाच बेघर झालेल्या 800 भारतीयांना बांगलादेशने आसरा दिला आहे. बांगलादेश सीमारेषवर असलेल्या मोगलघाट आणि लालमोनिरहाट येथे सध्याच्या घडीला अनेक भारतीयांनी आश्रय घेतला आहे. बंगालमधील धारला नदीला पूर आला असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांनी आपलं घर सोडून स्थलांतरण करावं लागलं आहे. पश्चिम बंगालमध्ये पाच लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, नेपाळच्या चितवन या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात पुरामुळे २०० भारतीय पर्यटक अडकून पडले आहेत.

मोगलघाटमधील हबीबूर रेहमान यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुरामुळे दुर्गापूर आणि मोगलघाटमध्ये 800 भारतीयांनी आश्रय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. माणुसकीच्या आधारे भारतीयांना येथे राहण्याची परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती बॉर्डर गार्ड बांगलादेशने दिली आहे 

बॉर्डर गार्ड बांगलादेशने दिलेल्या माहितीनुसार, 'बांगलादेश सीमारेषेजवळील दोन गावांना पुरांचा फटका बसला आहे. माणुसकीच्या नाते आम्ही भारतीय नागरिकांना आश्रय घेण्याची परवानगी दिली आहे'. बॉर्डर गार्ड बांगलादेशने जर आम्हाला मदत केली नसती तर आम्ही पुराच्या पाण्यात वाहून गेलो असतो असं 75 वर्षीय बशीरुद्दीन यांनी सांगितलं आहे. आश्रय घेतलेल्या भारतीयांनी परिस्थिती सुधारली की आम्ही पुन्हा मायदेशी परत येऊ असं सांगितलं आहे. 

पश्चिम बंगालमध्ये पुराने ३२ लोकांचा बळी घेतला आहे. राज्यातील ६ जिल्ह्यांमधील १४ लाख लोक पुरामुळे हवालदिल झाले आहेत. भूतान, बिहार आणि झारखंडच्या नद्यांना पूर आल्याने पश्चिम बंगालमध्ये पूर आला आहे. पुरामुळे राज्यात १०४ पाळीव जनावरे देखील मृत्युमुखी पडल्याची माहिती बंगालच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आसाम, बिहार,पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती गंभीर झाली असून ५० लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर पूर्वोत्तरमधील रेल्वेसेवा सद्या बंद करण्यात आली आहे.  बिहार राज्यामध्ये पुरामुळे ७२ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. राज्यातील १४ जिल्ह्यांमधील ७३.४४ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.