शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

महापुरामुळे डोक्यावरुन छत हरवलेल्या 800 भारतीयांना बांगलादेशने दिला आसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 16:38 IST

पश्चिम बंगालमध्ये पुराने थैमान घातला असून अनेकजण बेघर झाले आहेत

ढाका, दि. 21 - पश्चिम बंगालमध्ये पुराने थैमान घातला असून अनेकजण बेघर झाले आहेत. अशाच बेघर झालेल्या 800 भारतीयांना बांगलादेशने आसरा दिला आहे. बांगलादेश सीमारेषवर असलेल्या मोगलघाट आणि लालमोनिरहाट येथे सध्याच्या घडीला अनेक भारतीयांनी आश्रय घेतला आहे. बंगालमधील धारला नदीला पूर आला असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांनी आपलं घर सोडून स्थलांतरण करावं लागलं आहे. पश्चिम बंगालमध्ये पाच लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, नेपाळच्या चितवन या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात पुरामुळे २०० भारतीय पर्यटक अडकून पडले आहेत.

मोगलघाटमधील हबीबूर रेहमान यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुरामुळे दुर्गापूर आणि मोगलघाटमध्ये 800 भारतीयांनी आश्रय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. माणुसकीच्या आधारे भारतीयांना येथे राहण्याची परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती बॉर्डर गार्ड बांगलादेशने दिली आहे 

बॉर्डर गार्ड बांगलादेशने दिलेल्या माहितीनुसार, 'बांगलादेश सीमारेषेजवळील दोन गावांना पुरांचा फटका बसला आहे. माणुसकीच्या नाते आम्ही भारतीय नागरिकांना आश्रय घेण्याची परवानगी दिली आहे'. बॉर्डर गार्ड बांगलादेशने जर आम्हाला मदत केली नसती तर आम्ही पुराच्या पाण्यात वाहून गेलो असतो असं 75 वर्षीय बशीरुद्दीन यांनी सांगितलं आहे. आश्रय घेतलेल्या भारतीयांनी परिस्थिती सुधारली की आम्ही पुन्हा मायदेशी परत येऊ असं सांगितलं आहे. 

पश्चिम बंगालमध्ये पुराने ३२ लोकांचा बळी घेतला आहे. राज्यातील ६ जिल्ह्यांमधील १४ लाख लोक पुरामुळे हवालदिल झाले आहेत. भूतान, बिहार आणि झारखंडच्या नद्यांना पूर आल्याने पश्चिम बंगालमध्ये पूर आला आहे. पुरामुळे राज्यात १०४ पाळीव जनावरे देखील मृत्युमुखी पडल्याची माहिती बंगालच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आसाम, बिहार,पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती गंभीर झाली असून ५० लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर पूर्वोत्तरमधील रेल्वेसेवा सद्या बंद करण्यात आली आहे.  बिहार राज्यामध्ये पुरामुळे ७२ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. राज्यातील १४ जिल्ह्यांमधील ७३.४४ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.