शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महापुरामुळे डोक्यावरुन छत हरवलेल्या 800 भारतीयांना बांगलादेशने दिला आसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 16:38 IST

पश्चिम बंगालमध्ये पुराने थैमान घातला असून अनेकजण बेघर झाले आहेत

ढाका, दि. 21 - पश्चिम बंगालमध्ये पुराने थैमान घातला असून अनेकजण बेघर झाले आहेत. अशाच बेघर झालेल्या 800 भारतीयांना बांगलादेशने आसरा दिला आहे. बांगलादेश सीमारेषवर असलेल्या मोगलघाट आणि लालमोनिरहाट येथे सध्याच्या घडीला अनेक भारतीयांनी आश्रय घेतला आहे. बंगालमधील धारला नदीला पूर आला असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांनी आपलं घर सोडून स्थलांतरण करावं लागलं आहे. पश्चिम बंगालमध्ये पाच लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, नेपाळच्या चितवन या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात पुरामुळे २०० भारतीय पर्यटक अडकून पडले आहेत.

मोगलघाटमधील हबीबूर रेहमान यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुरामुळे दुर्गापूर आणि मोगलघाटमध्ये 800 भारतीयांनी आश्रय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. माणुसकीच्या आधारे भारतीयांना येथे राहण्याची परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती बॉर्डर गार्ड बांगलादेशने दिली आहे 

बॉर्डर गार्ड बांगलादेशने दिलेल्या माहितीनुसार, 'बांगलादेश सीमारेषेजवळील दोन गावांना पुरांचा फटका बसला आहे. माणुसकीच्या नाते आम्ही भारतीय नागरिकांना आश्रय घेण्याची परवानगी दिली आहे'. बॉर्डर गार्ड बांगलादेशने जर आम्हाला मदत केली नसती तर आम्ही पुराच्या पाण्यात वाहून गेलो असतो असं 75 वर्षीय बशीरुद्दीन यांनी सांगितलं आहे. आश्रय घेतलेल्या भारतीयांनी परिस्थिती सुधारली की आम्ही पुन्हा मायदेशी परत येऊ असं सांगितलं आहे. 

पश्चिम बंगालमध्ये पुराने ३२ लोकांचा बळी घेतला आहे. राज्यातील ६ जिल्ह्यांमधील १४ लाख लोक पुरामुळे हवालदिल झाले आहेत. भूतान, बिहार आणि झारखंडच्या नद्यांना पूर आल्याने पश्चिम बंगालमध्ये पूर आला आहे. पुरामुळे राज्यात १०४ पाळीव जनावरे देखील मृत्युमुखी पडल्याची माहिती बंगालच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आसाम, बिहार,पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती गंभीर झाली असून ५० लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर पूर्वोत्तरमधील रेल्वेसेवा सद्या बंद करण्यात आली आहे.  बिहार राज्यामध्ये पुरामुळे ७२ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. राज्यातील १४ जिल्ह्यांमधील ७३.४४ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.