शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

"भारतानं आपलं वर्चस्व प्रस्थापित करावं, अन्यथा...", बांगलादेश हिंसाचारावर महंत राजू दास यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 15:06 IST

Bangladesh Crisis : बांगलादेशातील परिस्थितीबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. हनुमानगढीचे महंत राजू दास यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Bangladesh Crisis : बांगलादेशातील परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. संसद भवन परिसरात ही सर्वपक्षीय बैठक झाली. या सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेशातील परिस्थितीबाबत सर्वांना माहिती दिली.

दुसरीकडे, बांगलादेशातील परिस्थितीबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. हनुमानगढीचे महंत राजू दास यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राजू दास यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिले की, "भारतानं बांगलादेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची, हीच वेळ आहे. अन्यथा बांगलादेश हा पाकिस्तानपेक्षा जास्त त्रास देईल. नरेंद्र मोदीजी, तुम्ही पुढे जा, संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे." तत्पूर्वी एका व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "हिंदूंनो, तुमचा कष्टाचा पैसा उद्या असाच लुटला जाईल. मग तुम्हाला काहीच मिळणार नाही. त्यामुळं आजच काहीतरी करा."

दरम्यान, बांगलादेशातील परिस्थितीबाबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना बांगलादेशातील परिस्थिती आणि भारत सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशातील परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आपल्या सरकारी निवासस्थानी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बांगलादेशातील संपूर्ण परिस्थितीची माहिती देण्यात आली. बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतात आलेल्या शेख हसीना यांच्यासोबतची भेट, बांगलादेशातील ताज्या राजकीय परिस्थिती आणि तेथील हिंसाचाराची सततची परिस्थिती याबद्दल माहिती दिली.

बांगलादेशात आंदोलकांनी हिंदूंना केलं लक्ष्यआरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये सुरू झालेला हिंसाचार शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतरही थांबलेला नाही. दरम्यान, या आंदोलकांनी देशात सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अल्पसंख्याक हिंदू समाजाला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. आंदोलक जमावाकडून हिंदूंना त्रास दिला जात आहे. काहींच्या घरांची जाळपोळ करण्याच्या घटना घडल्या आहेत. तर काहींची दुकानं लुटण्यात आळी आहेत. यादरम्यान, मेहरपूर येथील इस्कॉन मंदिरामध्ये दंगेखोरांनी तोडफोड करून मंदिराला आग लावल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय