शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशच्या BNP पार्टीचा ढाका ते आगरताळा मोर्चा; भारत अलर्ट, सीमेवर तणाव वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 13:48 IST

बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर २ डिसेंबर रोजी त्रिपुरातील आगरताळा येथे हल्ला झाला होता.

ढाका - भारतातील त्रिपुराची राजधानी आगरताळा इथं बांगलादेशी उच्चायुक्ताच्या कार्यालयावर झालेल्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी खालिदा जिया यांच्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) ने मोठी घोषणा केली आहे. बीएनपीसह ३ संघटना मिळून ज्यात जातीयताबादी जुबो दल, स्वेचसेबक दल आणि छात्र दल ढाका ते आगारताळापर्यंत मोर्चा काढणार आहेत. सकाळी ९ वाजल्यापासून या मोर्चाला ढाकाच्या नयापलटन येथील बीएनपी कार्यालयासमोर लोक जमले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

बीएनपीच्या मित्र पक्षांनी सांगितले की, त्रिपुराची राजधानी आगरताळाच्या दिशेने लाँग मार्च काढला जाईल. त्याठिकाणी बांगलादेशच्या  उच्चायुक्तावरच हल्ला झाला नाही तर राष्ट्रध्वजाचा अवमान करून जातीय दंगली भडकवण्याचा कटही रचला गेला. ढाकात आगरताळाच्या दिशेने जाणाऱ्या मोर्चातील लोकांनी भारतावर बांगलादेशविरोधात गंभीर षडयंत्र रचत असल्याचा आरोप लावला आहे.

सीमेवर सुरक्षा वाढवली, जवान अलर्ट

बीएनपीने घोषित केलेल्या आंदोलनामुळे भारतीय सुरक्षा दलाने सीमेवर बंदोबस्त वाढवला आहे. त्याठिकाणी कुठलीही तणावग्रस्त स्थिती निर्माण होऊ नये यासाठी जवान अलर्ट आहेत. ३ दिवसांपूर्वी बीएनपी आणि त्यांच्या संघटनांनी ढाकात मोर्चा काढला होता. हा मोर्चा बीएनपी कार्यालयापासून सुरू झाला होता ज्याला रामपुरा इथं पोलिसांनी रोखले. त्यानंतर एका शिष्टमंडळाने भारतीय उच्चायुक्त कार्यालयात जात आगरताळा येथील घटनेच्या निषेधार्थ निवेदन दिले. 

बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर २ डिसेंबर रोजी त्रिपुरातील आगरताळा येथे हल्ला झाला होता. बांगलादेशमध्ये हिंदू संत चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेविरोधात लोकांनी रॅली काढली होती तेव्हा हा प्रकार घडला. यावेळी काही लोक उच्चायुक्तालयात घुसले होते. या लोकांनी बांगलादेशच्या ध्वजाची तोडफोड करून तो खाली उतरवून त्याला आग लावल्याचा आरोप आहे. या घटनेबद्दल भारत सरकारने  दु:ख व्यक्त केले होते. 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पाडले गेले. त्यानंतर बांग्लादेश आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात भारतात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचा पक्ष बीएनपी भारताविरोधात आक्रमक आहे. बांगलादेशाला बदनाम करण्यात आणि हिंसा पसरवण्याचा भारताचा प्रयत्न असतो असा आरोप बीएनपी पक्षाचे नेते करतात.   

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेश