शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
3
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
4
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
5
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
6
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
7
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
8
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
9
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
10
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
11
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
12
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
13
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
14
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
15
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
16
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
17
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
18
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
20
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

बांगलादेशच्या BNP पार्टीचा ढाका ते आगरताळा मोर्चा; भारत अलर्ट, सीमेवर तणाव वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 13:48 IST

बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर २ डिसेंबर रोजी त्रिपुरातील आगरताळा येथे हल्ला झाला होता.

ढाका - भारतातील त्रिपुराची राजधानी आगरताळा इथं बांगलादेशी उच्चायुक्ताच्या कार्यालयावर झालेल्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी खालिदा जिया यांच्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) ने मोठी घोषणा केली आहे. बीएनपीसह ३ संघटना मिळून ज्यात जातीयताबादी जुबो दल, स्वेचसेबक दल आणि छात्र दल ढाका ते आगारताळापर्यंत मोर्चा काढणार आहेत. सकाळी ९ वाजल्यापासून या मोर्चाला ढाकाच्या नयापलटन येथील बीएनपी कार्यालयासमोर लोक जमले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

बीएनपीच्या मित्र पक्षांनी सांगितले की, त्रिपुराची राजधानी आगरताळाच्या दिशेने लाँग मार्च काढला जाईल. त्याठिकाणी बांगलादेशच्या  उच्चायुक्तावरच हल्ला झाला नाही तर राष्ट्रध्वजाचा अवमान करून जातीय दंगली भडकवण्याचा कटही रचला गेला. ढाकात आगरताळाच्या दिशेने जाणाऱ्या मोर्चातील लोकांनी भारतावर बांगलादेशविरोधात गंभीर षडयंत्र रचत असल्याचा आरोप लावला आहे.

सीमेवर सुरक्षा वाढवली, जवान अलर्ट

बीएनपीने घोषित केलेल्या आंदोलनामुळे भारतीय सुरक्षा दलाने सीमेवर बंदोबस्त वाढवला आहे. त्याठिकाणी कुठलीही तणावग्रस्त स्थिती निर्माण होऊ नये यासाठी जवान अलर्ट आहेत. ३ दिवसांपूर्वी बीएनपी आणि त्यांच्या संघटनांनी ढाकात मोर्चा काढला होता. हा मोर्चा बीएनपी कार्यालयापासून सुरू झाला होता ज्याला रामपुरा इथं पोलिसांनी रोखले. त्यानंतर एका शिष्टमंडळाने भारतीय उच्चायुक्त कार्यालयात जात आगरताळा येथील घटनेच्या निषेधार्थ निवेदन दिले. 

बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर २ डिसेंबर रोजी त्रिपुरातील आगरताळा येथे हल्ला झाला होता. बांगलादेशमध्ये हिंदू संत चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेविरोधात लोकांनी रॅली काढली होती तेव्हा हा प्रकार घडला. यावेळी काही लोक उच्चायुक्तालयात घुसले होते. या लोकांनी बांगलादेशच्या ध्वजाची तोडफोड करून तो खाली उतरवून त्याला आग लावल्याचा आरोप आहे. या घटनेबद्दल भारत सरकारने  दु:ख व्यक्त केले होते. 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पाडले गेले. त्यानंतर बांग्लादेश आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात भारतात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचा पक्ष बीएनपी भारताविरोधात आक्रमक आहे. बांगलादेशाला बदनाम करण्यात आणि हिंसा पसरवण्याचा भारताचा प्रयत्न असतो असा आरोप बीएनपी पक्षाचे नेते करतात.   

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेश