शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशच्या BNP पार्टीचा ढाका ते आगरताळा मोर्चा; भारत अलर्ट, सीमेवर तणाव वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 13:48 IST

बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर २ डिसेंबर रोजी त्रिपुरातील आगरताळा येथे हल्ला झाला होता.

ढाका - भारतातील त्रिपुराची राजधानी आगरताळा इथं बांगलादेशी उच्चायुक्ताच्या कार्यालयावर झालेल्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी खालिदा जिया यांच्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) ने मोठी घोषणा केली आहे. बीएनपीसह ३ संघटना मिळून ज्यात जातीयताबादी जुबो दल, स्वेचसेबक दल आणि छात्र दल ढाका ते आगारताळापर्यंत मोर्चा काढणार आहेत. सकाळी ९ वाजल्यापासून या मोर्चाला ढाकाच्या नयापलटन येथील बीएनपी कार्यालयासमोर लोक जमले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

बीएनपीच्या मित्र पक्षांनी सांगितले की, त्रिपुराची राजधानी आगरताळाच्या दिशेने लाँग मार्च काढला जाईल. त्याठिकाणी बांगलादेशच्या  उच्चायुक्तावरच हल्ला झाला नाही तर राष्ट्रध्वजाचा अवमान करून जातीय दंगली भडकवण्याचा कटही रचला गेला. ढाकात आगरताळाच्या दिशेने जाणाऱ्या मोर्चातील लोकांनी भारतावर बांगलादेशविरोधात गंभीर षडयंत्र रचत असल्याचा आरोप लावला आहे.

सीमेवर सुरक्षा वाढवली, जवान अलर्ट

बीएनपीने घोषित केलेल्या आंदोलनामुळे भारतीय सुरक्षा दलाने सीमेवर बंदोबस्त वाढवला आहे. त्याठिकाणी कुठलीही तणावग्रस्त स्थिती निर्माण होऊ नये यासाठी जवान अलर्ट आहेत. ३ दिवसांपूर्वी बीएनपी आणि त्यांच्या संघटनांनी ढाकात मोर्चा काढला होता. हा मोर्चा बीएनपी कार्यालयापासून सुरू झाला होता ज्याला रामपुरा इथं पोलिसांनी रोखले. त्यानंतर एका शिष्टमंडळाने भारतीय उच्चायुक्त कार्यालयात जात आगरताळा येथील घटनेच्या निषेधार्थ निवेदन दिले. 

बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर २ डिसेंबर रोजी त्रिपुरातील आगरताळा येथे हल्ला झाला होता. बांगलादेशमध्ये हिंदू संत चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेविरोधात लोकांनी रॅली काढली होती तेव्हा हा प्रकार घडला. यावेळी काही लोक उच्चायुक्तालयात घुसले होते. या लोकांनी बांगलादेशच्या ध्वजाची तोडफोड करून तो खाली उतरवून त्याला आग लावल्याचा आरोप आहे. या घटनेबद्दल भारत सरकारने  दु:ख व्यक्त केले होते. 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पाडले गेले. त्यानंतर बांग्लादेश आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात भारतात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचा पक्ष बीएनपी भारताविरोधात आक्रमक आहे. बांगलादेशाला बदनाम करण्यात आणि हिंसा पसरवण्याचा भारताचा प्रयत्न असतो असा आरोप बीएनपी पक्षाचे नेते करतात.   

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेश