शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरुहून थेट कोप्पलू गावात, 'त्या' बापमाणसाला युवक काँग्रेसकडून मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 08:18 IST

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील कोप्पलू गावात ही घटना घडली. कोप्पालू गावात राहणाऱ्या आनंद (45) यांनी त्यांच्या दहा वर्षीय मुलाला लागणारं औषध आणण्यासाठी सायकलवरून थेट बंगळुरू गाठलं

ठळक मुद्देयुवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद यांना औषधे आणि काही प्रमाणात धान्य देऊन त्यांची मदत केली. विशेष म्हणजे मदतीसाठी हे कार्यकर्ते बंगळुरूवरुन कोप्पालू या गावी पोहोचले. 

बंगळुरू - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्येने पावणेतीन कोटींचा आकडा पार केला आहे. तर, या महामारीच्या संकटात देशभरात आत्तापर्यंत तब्बल 3,31,895 लोकांना जीव गमवावा लागला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाने सुख-दुख, हाल-अपेष्टा, संकटं अन् संकटावर मात करणारी अनेक उदाहरणे आपल्यासमोर ठेवली आहेत. अशीच एक बापलेकाची भावूक घटना समोर आली आहे. लेकाचा जीव वाचवण्यासाठी एका पित्याने सायकलवरून तब्बल 300 किमीचा प्रवास केला. याबाबतचे वृत्त माध्यमात झळकताच युवक काँग्रेसने पित्याच्या मदतीला धावून आली.   

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील कोप्पलू गावात ही घटना घडली. कोप्पालू गावात राहणाऱ्या आनंद (45) यांनी त्यांच्या दहा वर्षीय मुलाला लागणारं औषध आणण्यासाठी सायकलवरून थेट बंगळुरू गाठलं. साधारण 300 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवरुन केला आणि मुलासाठी औषध आणलं. आनंद सांगतात की, माझा मुलगा आजारी आहे. मला औषधासाठी सायकलने जावे लागले. बर्‍याच ठिकाणी औषध शोधले. पण ते उपलब्ध नव्हतं. त्यामुळे सायकलने जाण्याचा निर्णय घेतल्याचं ते सांगतात.  

कोरोना आधी दर दोन महिन्यांनी आनंद बंगळुरूला जाऊन ते औषध आणत असत. मात्र, आता लॉकडाऊनमुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळे घरामध्ये असलेलं औषध संपलं. मुलाचा जीव वाचवण्यासाठी औषध महत्त्वाचं असल्याने आनंद यांनी सायकलवरुन बंगळुरूला जाण्याचा निर्णय पक्का केला. 23 मे रोजी ते बंगळुरूला जाण्यासाठी निघाले आणि त्यानंतर 26 मे रोजी तिथून परत आले.

आनंद यांच्या प्रवासाची कथा माध्यमात आल्यानंतर युवक काँग्रेसने त्यांच्या कोप्पालू या गावी जाऊन त्यांना मदत केली आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद यांना औषधे आणि काही प्रमाणात धान्य देऊन त्यांची मदत केली. विशेष म्हणजे मदतीसाठी हे कार्यकर्ते बंगळुरूवरुन कोप्पालू या गावी पोहोचले.  कोरोना महामारीच्या संकटात माणूसकीचे मोठे दर्शनही घडले आहे. कुठे माणूसकी हरवल्याचं पाहायला मिळालं, तर कुठे माणूसकीची अने उदाहरणे ही कायमची आदर्श बनली आहे. कोरोनामुळे आपण खूप काही गमावलंय, पण कोरोनाने बरंच काही शिकवलंयही. 

मे महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना मे महिना सर्वात धोकादायक ठरला आहे. नवीन रुग्ण आणि मृतांच्या संख्येने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. फक्त मे महिन्यात कोरोनाच्या 90.3 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महिन्याच्या शेवटी थोडासा दिलासा मिळाला. मात्र तरीही एप्रिलच्या तुलनेत 30% जास्त आहे. एप्रिल महिन्यात एकूण 69.4 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तसेच मे महिन्यात जवळपास एक लाख 20 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा खूपच जास्त असून एप्रिलच्या तुलनेत अधिक आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याBengaluruबेंगळूरCyclingसायकलिंग