शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बीएचयूमधील हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याने एसएचओ, सीओ आणि एसीएम निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 12:27 IST

विद्यापीठात सुरू असलेला हा हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याने स्टेशन ऑफिसर (एसओ), सीओ आणि अतिरिक्त शहर दंडाधिकारी या तीन जणांना निलंबित करण्यात आलं आहे.

ठळक मुद्दे बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) विद्यार्थिनीच्या छेडछाडीविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.विद्यापीठात सुरू असलेला हा हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याने स्टेशन ऑफिसर (एसओ), सीओ आणि अतिरिक्त शहर दंडाधिकारी या तीन जणांना निलंबित करण्यात आलं आहे.

वाराणसी - बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) विद्यार्थिनीच्या छेडछाडीविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. पोलिसांच्या लाठीमारामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर या प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून तब्बल १,२०० विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले.

विद्यार्थिनींवरील लाठीमार प्रकरणी स्टेशन हाऊस ऑफिसर आणि सर्कल ऑफिसर यांना निलंबित करण्यात आलं आहेत. याशिवाय विद्यापीठ परिसरातील परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याने अतिरिक्त शहर दंडाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराला बाहेरील व्यक्ती जबाबदार असल्याचं विद्यापीठ प्रशासनाने म्हटलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनीच्या छेडछाडीविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला शनिवारी मध्यरात्री हिंसक वळण लागलं. विद्यापीठाचे कुलगुरु जी. सी. त्रिपाठी यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींवर रात्री 10 वाजता पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये काही विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या. विद्यापीठात सुरू असलेला हा हिंसाचार रोखता आला नाही म्हणूनच तीन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

शहरातील कॉलेज आजपासून बंदबीएचयूमध्ये सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन लक्षात घेऊन बीएचयूला आजपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीएचयू आता नवरात्रौत्सवानंतर सुरू होणार आहे. 6 ऑक्टोबरपासून कॉलेज पुन्हा सुरू होणार असल्याचं समजतं आहे. बीएचयूच्या प्राचार्य डॉ. पूनम सिंह यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. तसंच शहरातील डॉक्टर संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय आणि महात्मा गांधी काशी विद्यापाठी तसंच शहरातील इतर कॉलेज आजपासून बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी योगेश्वर राम मिश्रा यांनी दिले आहेत. 

सोशल मीडियावर  #अबकी_बार_बेटी_पर_वार हा हॅशटॅग ट्रेंडिंग बीएचयूमधील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं वृत्त आल्यापासून सोशल मीडियावर  #अबकी_बार_बेटी_पर_वार हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. विद्यापीठात सुरक्षेची हमी मागणा-या विद्यार्थिनींवर करण्यात आलेला लाठीचार्ज म्हणजे  'बेटी पर वार' असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.  अनेकांनी पंतप्रधानांचा वाराणसी दौरा आणि रविवारच्या मन की बात कार्यक्रमासोबत या घटनेला जोडलं असून पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे.  जर मुलींच्या जागी गाय असती तर असा हल्ला झाला नसता अशे अनेक खोचक ट्वीट यावेळी करण्यात आले आहेत. 

काय आहे प्रकरण फाइन आर्ट्स अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाला असलेल्या एका विद्यार्थिनीची बाइकवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी दोन दिवसांपूर्वी छेड काढली होती. त्याबाबत तिनं सुरक्षारक्षकांकडे तक्रार केली असता, त्यांनी तिलाच उपदेशाचे डोस पाजले होते. अंधार झाल्यावर तू बाहेर काय करत होतीस, असं त्यांनी तिला विचारलं. हा सगळा प्रकार तिनं आपल्या मैत्रिणींना सांगितला होता, तेव्हा सगळ्यांनी मिळून धरणं आंदोलन करायचं ठरवलं होतं. आयआयटी-बीएचयू आणि महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीही त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरल्या होत्या. कुलगुरूंनी या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. परंतु, तेवढ्याने विद्यार्थिनींचं समाधान झालं नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पोस्टर जाळून निषेध नोंदवला. त्यानंतरही आंदोलन शांततामय मार्गाने सुरू होतं. पण, कुलगरू जी सी त्रिपाठी यांच्या घराबाहेर निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थिनींवर सुरक्षारक्षकांनी लाठीचार्ज केला आणि परिस्थिती चिघळली.