शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजांवर बंदी

By admin | Updated: June 16, 2014 04:03 IST

स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घातली आहे.

मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर (जि. नगर)स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घातली आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही बंदी घातली आहे. २६ जानेवारी व १५ आॅगस्टला विविध सरकारी, निमसरकारी तसेच खासगी संस्थांमार्फत ध्वजारोहण समारंभ होतात. राष्ट्रध्वजाविषयीचे आपले प्रेम, निष्ठा, अभिमान दाखविण्यासाठी वैयक्तिकरीत्या छोट्या कागदी व प्लॅस्टिक राष्ट्रध्वजांचा वापर होतो. शालेय विद्यार्थी व लहान मुलांसह अनेक व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज विकत घेतात. मात्र हे ध्वज त्याच दिवशी किंवा नंतर रस्त्याकडेला, जमिनीवर पडलेले आढळतात. प्लॅस्टिक लवकर नष्ट होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रप्रतिष्ठेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजनिर्मितीस पायबंद घालण्यासाठी त्याचे उत्पादक, विक्रेते व वितरकांवर सरकारी यंत्रणांनी कारवाई करावी, असे आदेश राज्याच्या गृह विभागाने १४ जून रोजी दिले आहेत.राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५० व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम, १९७१ तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे जनतेच्या वैयक्तिक वापरासाठी छोट्या कागदी ध्वजाचा वापर करावा. पण त्यांचा वापर करताना त्याचा योग्य मान राखावा. राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी फेकून देऊ नये. राष्ट्रध्वज खराब झाल्याचे आढळल्यास ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करावेत. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी तसेच राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकचा वापर होणार नाही, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.