शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हृदयस्पर्शी! आई-वडिलांचं छत्र हरपलं, 'त्या' खचल्या नाहीत; कष्ट करून मुली झाल्या आत्मनिर्भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 15:02 IST

आई-वडिलांचं प्रेम मिळायला हवं होतं पण त्याच वयात दोन मुलींना दु:ख भोगावं लागलं आहे.

ज्या वयात हातात वह्या, पुस्तकं असायला हवी होती, आई-वडिलांचं प्रेम मिळायला हवं होतं पण त्याच वयात दोन मुलींना दु:ख भोगावं लागलं आहे. उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. दोन मुलींनी लहान वयातच आई-वडील गमावले. पण तरीही या दोन मुलींनी हार मानली नाही आणि आपली जिद्द कायम ठेवली. 

स्वीटी सिंह आणि पूजा सिंह सांगतात की, आम्ही जिल्ह्यातील बांसडीह रोड पोलीस स्टेशन हद्दीतील मनियारी जसाव येथील रहिवासी आहोत. पूजा सिंह ही स्वीटी सिंहची आत्या आहे. जिने स्वीटी सिंहला मोठं केलं. कारण स्वीटीच्या आई-वडिलांचं खूप कमी वयात निधन झालं. घरात कोणीच नसल्याने आत्याने मुलींना सांभाळलं. या दोघींनी जिल्ह्यातील कुंवर सिंह कॉलेजमधून बीए पूर्ण केलं आहे. त्याच दरम्यान गुळाच्या चहाचं दुकान सुरू झालं. जेणेकरून त्या आत्मनिर्भर होतील.

पूजा सिंहने सांगितलं की, आम्ही आमच्या गावातून दूध आणतो आणि चहा बनवतो. जे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात ते चहामध्ये टाकले जात नाहीत. हा गुळाचा चहा लवंग, वेलची, आलं आणि तुळस इत्यादी घटक वापरून तयार केला जातो. जे आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. ग्राहकांना लहान कप 10 रुपये आणि मोठा कप 20 रुपये या किमतीने दिला जातो. हे दुकान पहाटे 5:30 ते 11:00 पर्यंत सुरू असतं. त्यानंतर दोन्ही मुली शिक्षणासाठी वेळ देतात.

हे दुकान जगदीशपूर चौकात, बलिया रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर जिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. चहा पिण्यासाठी दुकानात आलेल्या सर्व ग्राहकांनी चहाची चव अप्रतिम असल्याचे सांगितले. हा गुळाचा चहा आहे जो आरोग्यासाठीही हानिकारक नाही. सध्या या मुलींची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी