शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

ईडी अधिकाऱ्याविरोधातील प्रकरणात समतोल राखा; सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 10:14 IST

ईडीचे अधिकारी तिवारी यांना कथित लाचप्रकरणी तामिळनाडूच्या दक्षता व भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाने (डीव्हीएसी) अटक केली होती.

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयासारख्या (ईडी) केंद्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्याशी संबंधित प्रकरणाचा तपास राज्य पोलिस करत असतील तर अशा प्रकरणांमध्ये संतुलन राखण्याची गरज सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखीत केली. ईडीने दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले. अंकित तिवारी विरोधातील प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआई) सुपूर्द करण्याची विनंती या याचिकेत ईडीने केली आहे.

ईडीचे अधिकारी तिवारी यांना कथित लाचप्रकरणी तामिळनाडूच्या दक्षता व भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाने (डीव्हीएसी) अटक केली होती. संघराज्य व्यवस्थेत प्रत्येक घटकाला स्वतःची ओळख आणि अधिकार क्षेत्र कायम ठेवता यावे, हे संघराज्य व्यवस्थेत निश्चित करणे आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती सूर्यकांत व न्या. उज्ज्वल भुइयां यांच्या खंडपीठाने नमूद केले. एखादे राज्य मानमानी करत केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना अटक करू लागले तर संवैधानिक संकट निमार्ण होऊ शकते. अशा परिस्थितीत राज्यांजवळ अटक करण्याचा अधिकार आहे, असे म्हटले तर ते संघराज्य व्यवस्थेसाठी धोकादायक ठरले.

मात्र, राज्य पोलिसांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातील प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार नाकारणे हे योग्य ठरणार नसल्याचे स्पष्ट करत अशा प्रकरणात समतोल राखणे गरजेचे आहे.  या प्रकरणात समतोल राखण्यासाठी आम्ही दोन्ही युक्तिवादाचा विचार करू. आरोपीला प्रकरणाच्या तपासात मत मांडण्याचा अधिकार नसला तरी संबंधित प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीचा त्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. संबंधित प्रकरणाची पुढील सुनावणी २० मार्च रोजी होणार आहे. लाचप्रकरणी अटक केलेल्या तिवारीला २० मार्च रोजी सर्वोच्च न्यायालाने जामीन मंजूर केला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय