शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ वाढवल्या सैन्य हालचाली, टँक अन् लढाऊ विमानं केली तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 13:51 IST

पाकिस्ताननंही नियंत्रण रेषेवर हालचाली वाढवल्या आहेत.

नवी दिल्ली: दहशतवाद्यांनी 14 फेब्रुवारीला भारतीय जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला केला. त्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्याच्या 13 दिवसांनंतर भारतीय हवाई दलानंपाकिस्तानात घुसून बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तीन तळ उद्ध्वस्त केले. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार, भारताच्या कारवाईत 325 दहशतवादी आणि त्याचे ट्रेनर ठार झाले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली असून, भारतानं हवाई नियंत्रण रेषेचं उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे. त्यानंतर पाकिस्ताननंही नियंत्रण रेषेवर हालचाली वाढवल्या आहेत.राजस्थानातल्या गंगानगर जिल्ह्याला लागून असलेल्या पाकिस्तानमधील सीमारेषेत पाकिस्ताननं सैन्यबळ वाढवलं आहे. तसेच बीकानेरच्या जवळपासच्या भागातील सैन्याच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. पाकिस्ताननं सिंध भागातील तीन मोठ्या एअरबेसवरून लढाऊ विमानांची उड्डाणं वाढवली आहेत. ज्यात कराचीहून जेएफ 17 थंडर, शाहबाजमधून एफ 16 आणि न्यू छोर एअरबेसमधून एफ 16सारख्या लढाऊ विमानांनी भरारी घेतली आहे. पाकिस्तानातील नियंत्रण रेषेतील 10 किलोमीटर आतपर्यंत हवाई क्षेत्रात लढाऊ विमानं सराव करत आहेत. तसेच बहावलपूरमधील पाकिस्तानी सैन्याच्या 31 कोरच्या इन्फ्रंट्री, मॅकेनाइज्ड व आर्म्ड फोर्सेसचीही ये-जा वाढली आहे. नियंत्रण रेषेवरही वातावरण शांत आहे.पाकिस्तानी सेनेच्या 31 कोरजवळ राजस्थान आणि पंजाब भाग आहे.  बीकानेर क्षेत्रातील बहावलपूर आणि जैसलमेरपासून जवळच असलेल्या पाकिस्तानच्या सीमा रेषेमध्येही सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात येत आहे. सीमा सुरक्षा दलानं हाय अलर्ट दिला असून, नियंत्रण रेषेवर लष्कर वाढवण्यात आलं आहे. भारतीय नियंत्रण रेषेवर हेरगिरीसाठी ड्रोन आणि यूएव्ही उडवले जात आहेत. कालच भारतानं कच्छच्या क्षेत्रात पाकिस्तानचे ड्रोन पाडले होते. भारतीय गुप्तचर यंत्रणांचीही परिस्थितीवर नजर आहे. समुद्री सीमेतील बंदरगा, नवलखी आणि पायक्रिकसह पूर्ण क्षेत्रात हाय अलर्ट दिलं आहे. सीमवर्ती भागात जवान तैनात करण्यात आले आहेत. 

उत्तर भारतात अलर्ट! लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट आणि चंदीगड विमानतळ बंद 

भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून, भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने आज सकाळी हवाई हद्दीचे उल्लंघन करून हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात दक्षतेचे आदेश देण्यात आले असून, लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट आणि चंदीगड विमानतळ सर्वसामान्य प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. आज सकाळी आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करत पाकिस्तानी लष्कराची लढाऊ विमाने भारताच्या हद्दीत घुसले होते. या विमानांना भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळाल्याने या विमानांनी बॉम्ब टाकून पळ काढला. दरम्यान भारताने प्रतिहल्ला करून पाकिस्तानचे एक एफ-16 विमान लामा व्हॅलीमध्ये पाडल्याचे वृत्त आहे.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तान