शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रेल्वे-विमान कंपनीवर सामानाची जबाबदारी; ग्राहक आयोगाकडून नुकसानभरपाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2023 05:50 IST

रेल्वे आणि संबंधित विमान कंपनीला नुकसान भरपाईचे आदेश आयाेगाने दिले आहेत. 

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, लुधियाना ( Marathi News ): प्रवासात सामान गहाळ झाल्याबद्दल दोन वेगवेगळ्या प्रकरणात ग्राहक आयोगाने रेल्वे आणि विमान कंपनीला जबाबदार आहे. रेल्वे आणि संबंधित विमान कंपनीला नुकसान भरपाईचे आदेश आयाेगाने दिले आहेत. 

विमान प्रकरण

एस. के. गर्ग यांनी मे २०१८ मध्ये एमिरेट्स एअरलाइन्सने सिएटल ते दिल्ली प्रवास केला. दिल्लीला पोहोचल्यावर त्यांची चेक इन केलेली बॅग गायब होती. त्यांच्या तक्रारीवर एअरलाइन्सने असा युक्तिवाद केला की, नियमानुसार चेक इन बॅगमध्ये मौल्यवान वस्तू आणि चलने प्रतिबंधित आहेत. 

आयोगाचे निरीक्षण

प्रवाशांचे सामान सुरक्षित आणून देणे एअरलाइन्सचे कर्तव्य आहे. व्यवसायासाठी विमा कंपन्या सक्रियपणे अधिकारी आणि एजंट तैनात करतात. परंतु, विमा रक्कम देताना पॉलिसीधारकांना मदत करीत नाहीत.

काय दिला आदेश? 

- विमा कंपनीने तक्रारदाराला १.६४ लाख ३० दिवसांत द्यावेत.   - एमिरेट्स एअरलाइन्सने २५ हजार नुकसानभरपाई द्यावी.

रेल्वे प्रकरण

रोहतक- मुंबई ट्रेनमध्ये एसी डब्यातून २०१७ मध्ये बॅग चोरीच्या प्रकरणात मोनिका रॉय यांनी रेल्वे विरुद्ध ग्राहक आयोग रोहतकमध्ये दावा दाखल केला होता. यात रेल्वे कायदा, १९८९ प्रमाणे सामान बुक केले तरच रेल्वे नुकसानीसाठी जबाबदार ठरते हा मुद्दा रेल्वेने बचावात मांडला. 

आयोगाने म्हटले...

अनारक्षित आणि आरक्षित तिकिटांच्या किमतीत लक्षणीय तफावत आहे. आरक्षित तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना किमान सुरक्षिततेची अपेक्षा असते. आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश, ही सेवेतील त्रुटी आहे.

किती भरपाई?

रेल्वेने २.४० लाख रुपये सामानाचे मूल्य म्हणून व सेवेतील त्रुटीपोटी पाच हजार आणि खटला खर्च पाच हजार प्रवाशाला द्यावेत.

 

टॅग्स :Airportविमानतळconsumerग्राहकIndian Railwayभारतीय रेल्वे