शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री पुन्हा बॅकफूटवर, Tweet करत व्यक्त केली दिलगिरी; जाणून घ्या आता काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 20:21 IST

परशुराम जयंतीच्या निमित्ताने पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सोशल मिडियाच्या माध्यमाने आपल्या भक्तांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भक्तांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिले.

भोपाळ - आपल्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत आणि वादात असणारे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुन्हा एकदा बॅकफूटवर आले आहेत. हैहयवंशी क्षत्रिय समाजा संदर्भात केलेल्या एका वक्तव्यावर आता धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “गेल्या काही दिवसांत एक विषय लक्षात आला आहे. एका चर्चेदरम्यान, मी भगवान परशुरामजी आणि महाराज सहस्त्रबाहू अर्जुनजी यांच्यात झालेल्या युद्धासंदर्भात जे काही बोललो, ते पवित्र हिंदू धर्मग्रंथांतील वर्णनाच्या आधारे बोललो आहे. आपला उद्देश कोणत्याही समाजाच्या अथवा वर्गाच्या भावना दुखावण्याचा नव्हता. ना कधी असेल. कारण आपण नेहमीच सनातन एक्याच्या बाजूने राहत आलो आहोत. तरीही, जर आपल्या कुठल्याही शब्दामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही दिलगीर आहोत. आपण सर्व हिंदू एक आहोत. एकच राहू. आमची एकता हीच आमची शक्ती आहे." असे ट्विट बागेश्वर धामच्या टि्वटर हँडलवर करण्यात आले आहे.

परशुराम जयंतीच्या दिवशी करण्यात आले होते वक्तव्य -परशुराम जयंतीच्या निमित्ताने पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सोशल मिडियाच्या माध्यमाने आपल्या भक्तांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भक्तांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिले. याच वेळी, त्यांनी भगवान परशुरामा यांच्या संदर्भात सांगायला सुरुवात केली आणि म्हणाले की, "हे क्षत्रिय अचानकपणे कुठून प्रकट व्हायचे?  यासंदर्भात थोडी चर्चा करू. सहस्त्रबाहू ज्या घराण्यातील होता तो हैहय वंश होता. भगवान परशुरामांनी हैहय वंशाचा नाश करण्यासाठी हातात कुऱ्हाड घेतली. हैहय वंशाचा राजा अत्यंत दुष्ट, ऋषींवर अत्याचार करणारा आणि स्त्रियांवर बलात्कार करणारा होता." 

एवढ्यावरच बाबा बागेश्वर थांबले नाही, ते पुढे म्हणाले, दुष्टांना मार्गातून बाजूला करणे हे साधूंचे कामच आहे. यामुळे त्यांनी हैहय वंशाच्या राजांना मारायला सुरुवात केली. मात्र आपल्या शास्त्रांच्या मर्यादांचे पालन करत त्यांनी, ना कधी स्त्रियांवर आपला परशू उचलला, ना मुला-मुलींवर. त्यानी आताताई राजांचा वध केला. पण त्यांच्या मुलांना हात लावला नाही. पण जेव्हा ती मुले तरुण झाली आणि त्यांनीही अत्याचार सुरू केले, त्यांनीही आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी भगवान परशुराम यांच्यावर हल्ला केला, तेव्हा भगवान परशुरामांनी त्या त्यांचा वध केला, नंतर त्यांना मुले झाली, त्यांचाही वध केला.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामMadhya Pradeshमध्य प्रदेश