शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

Bageshwar Dham : “मी कोणी चमत्कारी नाही, सनातन हिंदू धर्माशी समस्या असलेल्यांनी दुसऱ्या देशात जावं”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 22:07 IST

"जेव्हा हिंदू भारतात राहतात, तेव्हा त्याला हिंदू राष्ट्र का म्हणू नये. ज्यांना सनातन हिंदू राष्ट्राशी अडचण आहे त्यांनी दुसऱ्या देशात जावं," असं वक्तव्य त्यांनी केलं.

बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री गेल्या अनेक दिवसांपासून देश-विदेशात चर्चेत आहेत. त्यांच्यावर अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. दरम्यान, मंगळवारी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. "जेव्हा हिंदू भारतात राहतात, तेव्हा त्याला हिंदू राष्ट्र का म्हणू नये. ज्यांना सनातन हिंदू राष्ट्राशी अडचण आहे त्यांनी दुसऱ्या देशात जावं," असं वक्तव्य त्यांनी केलं.

“मी कोणी चमत्कारी नाही, मी सामान्य व्यक्ती आहे. मी केवळ बागेश्वर धामचा दास आहे. मी कोणी इश्वर नाही. आम्ही ध्यानसाधना करतो आणि देवाच्या कृपेनं सर्वकाही होतं. आम्ही जिकडेही जातो बालाजीकडून आशीर्वाद घेऊन जातो. आपल्या शिष्यांवर कृपादृष्टी ठेवावी अशी आम्ही प्रार्थना करतो आणि ती होते,” असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले. 

कला आणि दरबारमध्ये अंतरधीरेंद्र शास्त्री यांनी मांईंड रिडर सुहानी शाह यांच्यावरही भाष्य केलं. “कला आणि दरबार यात फरक असतो. काच आणि मणी दिसण्यात एकसारखे असतात पण ते वेगळे आहेत. काच मण्याप्रमाणे चमकू शकते पण मण्यासारखं काम करत नाही. काचेची किंमतही मण्यासारखी असू शकत नाही. कलेला आम्ही नाकारत नाही. परंतु त्याची वैदिक परंपरेशी तुलना नाही. कलेत माईंड रिडिंगही येतं. दरबारात कृपा होते हे सर्वजण मानतात,” असंही त्यांनी नमूद केलं. एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. 

आव्हानावर काय म्हणाले?“आरोप करणाऱ्यांनी प्रभू श्रीरामालाही सोडलं नव्हतं, तर ते आम्हाला काय सोडतील. आम्हाला आरोप करणाऱ्यांशी काही समस्या नाही. बोलायला लोक माध्यमंही विकली गेल्याचं म्हणतात, पण सत्य निराळंच आहे. आम्हाला केवळ सनातनशी घेणंदेणं आहे. ज्यांनी कोणी आव्हान दिलंय त्यांनी आपलं सेटअप लावावं आम्ही जाण्यासाठी तयार आहोत. आम्ही कोणाच्या आव्हानाला घाबरुन पळालो नाही. ना आम्हाला कोणी आव्हानाबाबत लेखी पाठवलं, ना त्यांची कोणी व्यक्ती आली,” असंही धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्ट केलं.

पाकिस्तान भारताचा मुलगात्यांनी बोलताना पाकिस्तानबाबतही वक्तव्य केलं. “पाकिस्तान भारताचा मुलगा आहे आणि आम्ही पिता पुत्राची भेट घडवणार. जगात जितकेही भारतीय आहेत त्यांच्या शरीरात राम-कृष्णाचं रक्त आहे. आमची योजना सनातन, हिंदू राष्ट्र आणि अखंड भारताची आहे. संविधानाच्या पहिल्या पानावर प्रभू श्रीरामाचं चित्र आहे. यामुळेच आम्ही संविधानानुसार हिंदू राष्ट्र बनवू,” असं ते म्हणाले.

भगावा-ए-हिंद का नाही?“हिंदुस्तानात हिंदू राहतात तर याला हिंदू राष्ट्र का बनवू नये. या ठिकाणी राहणारे मुस्लीम, शीख, ख्रिश्चन धर्माची लोकं हिंदू आहेत. जगातील असे अनेक देश आहेत ज्यांना इस्लामिक देश म्हटलं जातं. कारण त्या ठिकाणी मुस्लीम आहेत. गजवा ए हिंद असू शकतं तर भगवा ए हिंद का नाही. आम्ही लोकांना जागरुक करू, हिंदू राष्ट्राचे फायदे सांगू आणि त्यांना शपथ देऊ. जेव्हा देशातील एक तृतीयांश लोक बोलतील तेव्हा सरकारला त्यांचं ऐकावं लागेलच,” असंही त्यांनी नमूद केलं.

लग्न कधी करणार ?आईचा उल्लेख करताना ते म्हणाले की, जेव्हा एखादी कथा असते तेव्हा आईही येते. आई ही आई असते, तिची ममता इतरांपेक्षा वेगळी असते. आईनं माझ्यासाठी खूप संघर्ष केला आहे. समाजसेवेमुळे त्यांची तिची फारशी भेट होऊ शकली नाही. आई अजूनही मला ओरडते. झोपण्यापासून ते खाण्यापर्यंत आईचा ओरडा आजही खावा लागतो. आई विवाहाबद्दलही बोलत असते. मी त्याबद्दल विचार करत आहे. येत्या दोन तीन वर्षांत विवाह करेन. आई-वडिल माझ्यासाठी मुलगी शोघतील असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामHinduismहिंदुइझम