शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

साक्षी हत्याकांडप्रकरणी बागेश्वर बाबांचा तीव्र संताप; म्हणाले, “असा प्रकार पाहून...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 12:28 IST

साक्षी हत्याकांडाने राजधानी दिल्ली हादरली असून, यासंदर्भात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Bageshwar Dham Dhirendra Shastri:दिल्लीतील शाहबाद डेअरी भागातील रस्त्यावर साहिल नामक तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडची सार्वजनिक ठिकाणी चाकूने वार करून निर्घृण हत्या केली होती. या घटनेत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या मुलीचे नाव साक्षी असून, ती अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी तीव्र संताप व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली आहे.  

ही पूर्वनियोजित हत्या होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी राहत असलेल्या गल्लीत तो थांबला होता. सार्वजनिक शौचालयातून ती बाहेर आल्यावर आरोपी तरुणीसमोर आला. यानंतर त्याने मुलीवर चाकूने अनेक वार केले आणि तिला दगडाने ठेचले. पण तेथून जाणाऱ्या लोकांनीही मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. 

असा प्रकार पाहून...

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले आहे की, या घटनेने खूप दु:ख झाले आहे. हे पाहून ज्याचे रक्त उकळत नाही तो आधीच मेला आहे, असेच मानावे लागेल. लोक आम्हाला कट्टरवादी म्हणतात. लोक सांगतात की, आम्ही वादग्रस्त बोलतो. जगात असा एकही भाऊ नसेल ज्याचे आपल्या बहिणींची अशी अवस्था पाहून रक्त उसळत नसेल. हे पाहून ज्याचे रक्त उसळत नाही तो आधीच मेला आहे, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे आमचा सनातनवर विश्वास आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो की, आमचा सनातन धर्म मारायला शिकवत नाही, तर वाचवायला शिकवतो, असे बागेश्वर बाबा यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आरोपी साहिलने दिल्ली पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याला त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नसल्याचे त्याने म्हटले आहे.

 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामdelhiदिल्ली