शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 17:44 IST

दिल्लीतील प्रदूषण उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारमुळे होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री आतिशी यांनी केला आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील दिल्लीतील वाढत्या वायू आणि जलप्रदूषणावरुन दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत आतिशी म्हणाल्या की, दिल्लीतील वायू प्रदूषणासोबतच यमुनेतील जलप्रदूषणही वाढत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भाजपचे घाणेरडे राजकारण. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाचे मुख्य कारण भुसा जाळणे आहे. परंतु पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर 50 टक्क्यांनी भुसा जाळण्याच्या घटना कमी झाल्या आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील भाजप सरकार भुसा जाळणे रोखण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

दिल्लीच्या प्रदूषणाला इतर राज्ये जबाबदार आनंद विहार आयएसबीटीचे उदाहरण देताना आतिशी म्हणाल्या की, दिल्लीत सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जात आहेत. इतर राज्यातून डिझेल बसेस येत असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. वाढत्या प्रदूषणासाठी त्यांनी उत्तर प्रदेश आणि हरियाणातील वीटभट्ट्या आणि औष्णिक वीज प्रकल्पांना जबाबदार धरले.

यमुनेतील वाढत्या फेस आणि प्रदूषणावर बोलताना आतिशी म्हणाल्या की, हरियाणातून 165 एमजीडी आणि उत्तर प्रदेशातून 55 एमजीडी औद्योगिक कचरा यमुनेमध्ये दररोज सोडला जातो, ज्यामुळे जलप्रदूषण वाढत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी दिल्ली सरकार सातत्याने काम करत आहे. भाजपने यासाठी कठोर पावले न उचलल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असेही त्या म्हणाल्या.

भाजप यमुना साफ करू देत नाहीआप नेते सत्येंद्र जैन यांनीही पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आम आदमी पक्षाच्या सरकारने यमुना स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. भाजपला यमुना स्वच्छ होऊ द्यायची नाही, कारण त्यामुळे त्यांच्या राजकीय हितसंबंधांवर परिणाम होतो. हरियाणातून सुमारे 200 एमजीडी औद्योगिक सांडपाणी बादशाहपूर नाल्यातून पंप केले जाते आणि आम्ही आवाज उठवतो तेव्हा आम्हाला अटक केली जाते.

ते पुढे म्हणाले की, भाजपचे लोक फक्त फोटो काढायला येतात. यमुनेत फोम तयार होत नाही. कालिंदी कुंजवर यूपी सरकार बॅरेज चालवते, त्याचे दरवाजे बंद केल्यामुळे फेस तयार होत आहे. आता सर्व दरवाजे उघडा, फेस निघून जाईल. बनारसमध्ये दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषण असल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्लीतील सर्व थर्मल पॉवर प्लांट बंद आहेत पण एनसीआरमध्ये औष्णिक वीज प्रकल्प सुरू आहेत आणि 3000 वीटभट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचा आरोप केला.

टॅग्स :AAPआपdelhiदिल्लीAtishiआतिशीUttar Pradeshउत्तर प्रदेशHaryanaहरयाणा