शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 17:44 IST

दिल्लीतील प्रदूषण उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारमुळे होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री आतिशी यांनी केला आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील दिल्लीतील वाढत्या वायू आणि जलप्रदूषणावरुन दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत आतिशी म्हणाल्या की, दिल्लीतील वायू प्रदूषणासोबतच यमुनेतील जलप्रदूषणही वाढत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भाजपचे घाणेरडे राजकारण. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाचे मुख्य कारण भुसा जाळणे आहे. परंतु पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर 50 टक्क्यांनी भुसा जाळण्याच्या घटना कमी झाल्या आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील भाजप सरकार भुसा जाळणे रोखण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

दिल्लीच्या प्रदूषणाला इतर राज्ये जबाबदार आनंद विहार आयएसबीटीचे उदाहरण देताना आतिशी म्हणाल्या की, दिल्लीत सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जात आहेत. इतर राज्यातून डिझेल बसेस येत असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. वाढत्या प्रदूषणासाठी त्यांनी उत्तर प्रदेश आणि हरियाणातील वीटभट्ट्या आणि औष्णिक वीज प्रकल्पांना जबाबदार धरले.

यमुनेतील वाढत्या फेस आणि प्रदूषणावर बोलताना आतिशी म्हणाल्या की, हरियाणातून 165 एमजीडी आणि उत्तर प्रदेशातून 55 एमजीडी औद्योगिक कचरा यमुनेमध्ये दररोज सोडला जातो, ज्यामुळे जलप्रदूषण वाढत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी दिल्ली सरकार सातत्याने काम करत आहे. भाजपने यासाठी कठोर पावले न उचलल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असेही त्या म्हणाल्या.

भाजप यमुना साफ करू देत नाहीआप नेते सत्येंद्र जैन यांनीही पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आम आदमी पक्षाच्या सरकारने यमुना स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. भाजपला यमुना स्वच्छ होऊ द्यायची नाही, कारण त्यामुळे त्यांच्या राजकीय हितसंबंधांवर परिणाम होतो. हरियाणातून सुमारे 200 एमजीडी औद्योगिक सांडपाणी बादशाहपूर नाल्यातून पंप केले जाते आणि आम्ही आवाज उठवतो तेव्हा आम्हाला अटक केली जाते.

ते पुढे म्हणाले की, भाजपचे लोक फक्त फोटो काढायला येतात. यमुनेत फोम तयार होत नाही. कालिंदी कुंजवर यूपी सरकार बॅरेज चालवते, त्याचे दरवाजे बंद केल्यामुळे फेस तयार होत आहे. आता सर्व दरवाजे उघडा, फेस निघून जाईल. बनारसमध्ये दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषण असल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्लीतील सर्व थर्मल पॉवर प्लांट बंद आहेत पण एनसीआरमध्ये औष्णिक वीज प्रकल्प सुरू आहेत आणि 3000 वीटभट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचा आरोप केला.

टॅग्स :AAPआपdelhiदिल्लीAtishiआतिशीUttar Pradeshउत्तर प्रदेशHaryanaहरयाणा