शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 17:44 IST

दिल्लीतील प्रदूषण उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारमुळे होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री आतिशी यांनी केला आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील दिल्लीतील वाढत्या वायू आणि जलप्रदूषणावरुन दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत आतिशी म्हणाल्या की, दिल्लीतील वायू प्रदूषणासोबतच यमुनेतील जलप्रदूषणही वाढत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भाजपचे घाणेरडे राजकारण. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाचे मुख्य कारण भुसा जाळणे आहे. परंतु पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर 50 टक्क्यांनी भुसा जाळण्याच्या घटना कमी झाल्या आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील भाजप सरकार भुसा जाळणे रोखण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

दिल्लीच्या प्रदूषणाला इतर राज्ये जबाबदार आनंद विहार आयएसबीटीचे उदाहरण देताना आतिशी म्हणाल्या की, दिल्लीत सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जात आहेत. इतर राज्यातून डिझेल बसेस येत असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. वाढत्या प्रदूषणासाठी त्यांनी उत्तर प्रदेश आणि हरियाणातील वीटभट्ट्या आणि औष्णिक वीज प्रकल्पांना जबाबदार धरले.

यमुनेतील वाढत्या फेस आणि प्रदूषणावर बोलताना आतिशी म्हणाल्या की, हरियाणातून 165 एमजीडी आणि उत्तर प्रदेशातून 55 एमजीडी औद्योगिक कचरा यमुनेमध्ये दररोज सोडला जातो, ज्यामुळे जलप्रदूषण वाढत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी दिल्ली सरकार सातत्याने काम करत आहे. भाजपने यासाठी कठोर पावले न उचलल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असेही त्या म्हणाल्या.

भाजप यमुना साफ करू देत नाहीआप नेते सत्येंद्र जैन यांनीही पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आम आदमी पक्षाच्या सरकारने यमुना स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. भाजपला यमुना स्वच्छ होऊ द्यायची नाही, कारण त्यामुळे त्यांच्या राजकीय हितसंबंधांवर परिणाम होतो. हरियाणातून सुमारे 200 एमजीडी औद्योगिक सांडपाणी बादशाहपूर नाल्यातून पंप केले जाते आणि आम्ही आवाज उठवतो तेव्हा आम्हाला अटक केली जाते.

ते पुढे म्हणाले की, भाजपचे लोक फक्त फोटो काढायला येतात. यमुनेत फोम तयार होत नाही. कालिंदी कुंजवर यूपी सरकार बॅरेज चालवते, त्याचे दरवाजे बंद केल्यामुळे फेस तयार होत आहे. आता सर्व दरवाजे उघडा, फेस निघून जाईल. बनारसमध्ये दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषण असल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्लीतील सर्व थर्मल पॉवर प्लांट बंद आहेत पण एनसीआरमध्ये औष्णिक वीज प्रकल्प सुरू आहेत आणि 3000 वीटभट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचा आरोप केला.

टॅग्स :AAPआपdelhiदिल्लीAtishiआतिशीUttar Pradeshउत्तर प्रदेशHaryanaहरयाणा