शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 17:44 IST

दिल्लीतील प्रदूषण उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारमुळे होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री आतिशी यांनी केला आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील दिल्लीतील वाढत्या वायू आणि जलप्रदूषणावरुन दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत आतिशी म्हणाल्या की, दिल्लीतील वायू प्रदूषणासोबतच यमुनेतील जलप्रदूषणही वाढत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भाजपचे घाणेरडे राजकारण. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाचे मुख्य कारण भुसा जाळणे आहे. परंतु पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर 50 टक्क्यांनी भुसा जाळण्याच्या घटना कमी झाल्या आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील भाजप सरकार भुसा जाळणे रोखण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

दिल्लीच्या प्रदूषणाला इतर राज्ये जबाबदार आनंद विहार आयएसबीटीचे उदाहरण देताना आतिशी म्हणाल्या की, दिल्लीत सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जात आहेत. इतर राज्यातून डिझेल बसेस येत असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. वाढत्या प्रदूषणासाठी त्यांनी उत्तर प्रदेश आणि हरियाणातील वीटभट्ट्या आणि औष्णिक वीज प्रकल्पांना जबाबदार धरले.

यमुनेतील वाढत्या फेस आणि प्रदूषणावर बोलताना आतिशी म्हणाल्या की, हरियाणातून 165 एमजीडी आणि उत्तर प्रदेशातून 55 एमजीडी औद्योगिक कचरा यमुनेमध्ये दररोज सोडला जातो, ज्यामुळे जलप्रदूषण वाढत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी दिल्ली सरकार सातत्याने काम करत आहे. भाजपने यासाठी कठोर पावले न उचलल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असेही त्या म्हणाल्या.

भाजप यमुना साफ करू देत नाहीआप नेते सत्येंद्र जैन यांनीही पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आम आदमी पक्षाच्या सरकारने यमुना स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. भाजपला यमुना स्वच्छ होऊ द्यायची नाही, कारण त्यामुळे त्यांच्या राजकीय हितसंबंधांवर परिणाम होतो. हरियाणातून सुमारे 200 एमजीडी औद्योगिक सांडपाणी बादशाहपूर नाल्यातून पंप केले जाते आणि आम्ही आवाज उठवतो तेव्हा आम्हाला अटक केली जाते.

ते पुढे म्हणाले की, भाजपचे लोक फक्त फोटो काढायला येतात. यमुनेत फोम तयार होत नाही. कालिंदी कुंजवर यूपी सरकार बॅरेज चालवते, त्याचे दरवाजे बंद केल्यामुळे फेस तयार होत आहे. आता सर्व दरवाजे उघडा, फेस निघून जाईल. बनारसमध्ये दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषण असल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्लीतील सर्व थर्मल पॉवर प्लांट बंद आहेत पण एनसीआरमध्ये औष्णिक वीज प्रकल्प सुरू आहेत आणि 3000 वीटभट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचा आरोप केला.

टॅग्स :AAPआपdelhiदिल्लीAtishiआतिशीUttar Pradeshउत्तर प्रदेशHaryanaहरयाणा