शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

अयोध्येतील मशिदीच्या जमिनीवर अन्नधान्य पिकवून गरिबांना द्यावे : इक्बाल अन्सारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 15:41 IST

आमचं मान्य केल तर ठिक अन्यथा आम्ही ट्रस्टला विरोध करणार असल्याचे इक्बाल अन्सारी यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानुसार राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांना मशिद उभारण्यासाठी पाच एकर जमीन देण्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार रौनाही येथील धनीपूर भागात मुस्लीम समाजाला जमीन देण्यात आली आहे. मात्र या जमिनीचा उपयोग शेती करण्यासाठी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मशिदीसाठी देण्यात आलेल्या जमिनीला मुस्लीम पक्षकारांनी विरोध केला होता. मात्र सुन्नी वक्फ बोर्डाने समोर येऊन जमिनीचा स्वीकार केला. आता सुन्नी वक्फ बोर्डाकडून ट्रस्ट स्थापन करण्याची तयारी करण्यात येत आहे. लकवरच ट्रस्टची घोषणा होऊ शकते. बाबरी प्रकरणातील अन्य पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी या जमिनीसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

अन्सारी यांच्यानुसार ट्रस्ट अद्याप स्थापन झाले नाही. सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष कोणाचाही फोन घेत नाहीत. आम्ही अयोध्येत जमिनीची मागणी केली होती. जमीन मिळाल्यानंतर तिथे शाळा, रुग्णालय आणि धर्मशाळा उभारण्याचा आमचा मानस होता, असं अन्सारी यांनी सांगितले.

मुस्लिमांना देण्यात आलेली जमीन कृषीची आहे. शेतीसाठी ही जमीन योग्य आहे. त्यामुळे या जमिनीवर शेती करावी आणि त्यातून निघालेले अन्नधान्य गरिबांना वाटून द्यावे, अशी मागणी अन्सारी यांनी व्यक्त केली आहे. आमचं मान्य केल तर ठिक अन्यथा आम्ही ट्रस्टला विरोध करणार असल्याचे इकबाल अन्सारी यांनी स्पष्ट केले आहे.