शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील मशिदीच्या जमिनीवर अन्नधान्य पिकवून गरिबांना द्यावे : इक्बाल अन्सारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 15:41 IST

आमचं मान्य केल तर ठिक अन्यथा आम्ही ट्रस्टला विरोध करणार असल्याचे इक्बाल अन्सारी यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानुसार राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांना मशिद उभारण्यासाठी पाच एकर जमीन देण्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार रौनाही येथील धनीपूर भागात मुस्लीम समाजाला जमीन देण्यात आली आहे. मात्र या जमिनीचा उपयोग शेती करण्यासाठी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मशिदीसाठी देण्यात आलेल्या जमिनीला मुस्लीम पक्षकारांनी विरोध केला होता. मात्र सुन्नी वक्फ बोर्डाने समोर येऊन जमिनीचा स्वीकार केला. आता सुन्नी वक्फ बोर्डाकडून ट्रस्ट स्थापन करण्याची तयारी करण्यात येत आहे. लकवरच ट्रस्टची घोषणा होऊ शकते. बाबरी प्रकरणातील अन्य पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी या जमिनीसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

अन्सारी यांच्यानुसार ट्रस्ट अद्याप स्थापन झाले नाही. सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष कोणाचाही फोन घेत नाहीत. आम्ही अयोध्येत जमिनीची मागणी केली होती. जमीन मिळाल्यानंतर तिथे शाळा, रुग्णालय आणि धर्मशाळा उभारण्याचा आमचा मानस होता, असं अन्सारी यांनी सांगितले.

मुस्लिमांना देण्यात आलेली जमीन कृषीची आहे. शेतीसाठी ही जमीन योग्य आहे. त्यामुळे या जमिनीवर शेती करावी आणि त्यातून निघालेले अन्नधान्य गरिबांना वाटून द्यावे, अशी मागणी अन्सारी यांनी व्यक्त केली आहे. आमचं मान्य केल तर ठिक अन्यथा आम्ही ट्रस्टला विरोध करणार असल्याचे इकबाल अन्सारी यांनी स्पष्ट केले आहे.