शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
2
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
3
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
4
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
5
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
6
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
7
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
8
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
9
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
10
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
11
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
12
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
13
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
14
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
15
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
16
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
17
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
18
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
19
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
20
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
Daily Top 2Weekly Top 5

बाबा रामदेव यांची पतंजली आता टेक्सटाईल उद्योगात, विदेशी ब्रँड्सला टक्कर देण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 08:27 IST

रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण आता टेक्सटाईल उद्योगात येण्याची तयारी करत आहेत.

ठळक मुद्देरामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण आता टेक्सटाईल उद्योगात येण्याची तयारी करत आहेत.बाजारात लवकरच पतंजलीची अंतर्वस्त्रापासून ते क्रीडा पोषाखापर्यंतची उत्पादने पाहायला मिळतील. अलवर येथे पतंजली ग्रामोद्योगाचं उद्घाटन करताना रामदेव बाबांनीच ही माहिती दिली.

अलवर- पतंजली उद्योग समुहाचे आयुर्वेदिक आणि हर्बल उत्पादन सध्या अनेक जण वापरत आहेत. पतंजलीच्या या यशस्वी उत्पादनानंतर रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण आता टेक्सटाईल उद्योगात येण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे बाजारात लवकरच पतंजलीची अंतर्वस्त्रापासून ते क्रीडा पोषाखापर्यंतची उत्पादने पाहायला मिळतील. अलवर येथे पतंजली ग्रामोद्योगाचं उद्घाटन करताना रामदेव बाबांनीच ही माहिती दिली. पतंजली लवकरच कपडे आणि टेक्सटाईल बाजारात पाऊल ठेवणार असून विदेशी कंपन्यांना ते टक्कर देतील. पतंजली अंतर्वस्त्रापासून ते पारंपारिक कपडे आणि क्रीडा पोषाख तयार करणार असल्याचं बाबा रामदेव यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे.

नुकताच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात पतंजली आयुर्वेदचे सीईओ आणि रामदेव बाबांचे सहकारी बालकृष्ण हे देशातील आठवे सर्वांत श्रीमंत व्यक्ती असल्याचं समोर आलं आहे.  बालकृष्ण यांना होणारा फायदा हा गरजूंसाठी आहे, तो फायदा आरामदायी जीवन जगण्यासाठी नाही, असं रामदेव बाबा म्हणाले आहेत.

रामदेव बाबा यांनी आपला उद्देश हा देशातील विदेशी कंपन्यांचं असलेलं वर्चस्व संपवण्याचा आहे, असंही सांगितलं. कंपनी स्वदेशी कपडे तयार करणार असून याची सुरूवातीची गुंतवणूक ही ५ हजार कोटी रूपयांची असेल. या नव्या उद्योगाच्या माध्यमातून पतंजली चांगल्या दर्जाचे कपडे लोकांसाठी आणणार आहे. यामध्ये जीन्स पँटपासून ते स्वेटरपर्यंतच्या कपड्यांचा समावेश असेल, असं पतंजलीचे प्रवक्ता एस.के. तिजोरीवाला यांनी सांगितलं आहे.  पण या कपड्याच्या ब्रँडचं नाव नेमकं काय असेल? याबद्दल अजून सांगण्यात आलेलं नाही. 

मानवी शरीर 400 वर्षे जगण्यासाठी बनलेले आहे - बाबा रामदेव

 मानवी शरीर हे ४०० वर्षे जगण्यासाठी बनलेले आहे मात्र आपण अयोग्य जीवनशैलीद्वारे आजारांना आमंत्रण देतो आणि आयुष्य लवकर संपते, असा दावा योगगुरु बाबा रामदेव यांनी केला. चांगले अन्न आणि व्यायामाच्या मदतीने रोगमुक्त जीवन जगा, असा सल्लाही बाबा रामदेव यांनी लोकांना दिला. १२ व्या नॅशनल क्वालिटी कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना रामदेव म्हणाले, "मानवी शरीर हे ४०० वर्षे जगण्यासाठी बनलेले आहे, मात्र अतिरेकी अन्न व अयोग्य जीवनशैलीने आपण त्यावर अत्याचार करतो. आपण रक्तदाब, हृदयरोग आणि इतर आजारांना आमंत्रण देतो आणि आयुष्य कमी करुन घेतो व उर्वरित वर्षे डॉक्टर व औषधांच्या मदतीने जगतो".