शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बाबा रामदेव यांची पतंजली आता टेक्सटाईल उद्योगात, विदेशी ब्रँड्सला टक्कर देण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 08:27 IST

रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण आता टेक्सटाईल उद्योगात येण्याची तयारी करत आहेत.

ठळक मुद्देरामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण आता टेक्सटाईल उद्योगात येण्याची तयारी करत आहेत.बाजारात लवकरच पतंजलीची अंतर्वस्त्रापासून ते क्रीडा पोषाखापर्यंतची उत्पादने पाहायला मिळतील. अलवर येथे पतंजली ग्रामोद्योगाचं उद्घाटन करताना रामदेव बाबांनीच ही माहिती दिली.

अलवर- पतंजली उद्योग समुहाचे आयुर्वेदिक आणि हर्बल उत्पादन सध्या अनेक जण वापरत आहेत. पतंजलीच्या या यशस्वी उत्पादनानंतर रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण आता टेक्सटाईल उद्योगात येण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे बाजारात लवकरच पतंजलीची अंतर्वस्त्रापासून ते क्रीडा पोषाखापर्यंतची उत्पादने पाहायला मिळतील. अलवर येथे पतंजली ग्रामोद्योगाचं उद्घाटन करताना रामदेव बाबांनीच ही माहिती दिली. पतंजली लवकरच कपडे आणि टेक्सटाईल बाजारात पाऊल ठेवणार असून विदेशी कंपन्यांना ते टक्कर देतील. पतंजली अंतर्वस्त्रापासून ते पारंपारिक कपडे आणि क्रीडा पोषाख तयार करणार असल्याचं बाबा रामदेव यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे.

नुकताच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात पतंजली आयुर्वेदचे सीईओ आणि रामदेव बाबांचे सहकारी बालकृष्ण हे देशातील आठवे सर्वांत श्रीमंत व्यक्ती असल्याचं समोर आलं आहे.  बालकृष्ण यांना होणारा फायदा हा गरजूंसाठी आहे, तो फायदा आरामदायी जीवन जगण्यासाठी नाही, असं रामदेव बाबा म्हणाले आहेत.

रामदेव बाबा यांनी आपला उद्देश हा देशातील विदेशी कंपन्यांचं असलेलं वर्चस्व संपवण्याचा आहे, असंही सांगितलं. कंपनी स्वदेशी कपडे तयार करणार असून याची सुरूवातीची गुंतवणूक ही ५ हजार कोटी रूपयांची असेल. या नव्या उद्योगाच्या माध्यमातून पतंजली चांगल्या दर्जाचे कपडे लोकांसाठी आणणार आहे. यामध्ये जीन्स पँटपासून ते स्वेटरपर्यंतच्या कपड्यांचा समावेश असेल, असं पतंजलीचे प्रवक्ता एस.के. तिजोरीवाला यांनी सांगितलं आहे.  पण या कपड्याच्या ब्रँडचं नाव नेमकं काय असेल? याबद्दल अजून सांगण्यात आलेलं नाही. 

मानवी शरीर 400 वर्षे जगण्यासाठी बनलेले आहे - बाबा रामदेव

 मानवी शरीर हे ४०० वर्षे जगण्यासाठी बनलेले आहे मात्र आपण अयोग्य जीवनशैलीद्वारे आजारांना आमंत्रण देतो आणि आयुष्य लवकर संपते, असा दावा योगगुरु बाबा रामदेव यांनी केला. चांगले अन्न आणि व्यायामाच्या मदतीने रोगमुक्त जीवन जगा, असा सल्लाही बाबा रामदेव यांनी लोकांना दिला. १२ व्या नॅशनल क्वालिटी कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना रामदेव म्हणाले, "मानवी शरीर हे ४०० वर्षे जगण्यासाठी बनलेले आहे, मात्र अतिरेकी अन्न व अयोग्य जीवनशैलीने आपण त्यावर अत्याचार करतो. आपण रक्तदाब, हृदयरोग आणि इतर आजारांना आमंत्रण देतो आणि आयुष्य कमी करुन घेतो व उर्वरित वर्षे डॉक्टर व औषधांच्या मदतीने जगतो".