शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

बाबा रामदेव यांची पतंजली आता टेक्सटाईल उद्योगात, विदेशी ब्रँड्सला टक्कर देण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 08:27 IST

रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण आता टेक्सटाईल उद्योगात येण्याची तयारी करत आहेत.

ठळक मुद्देरामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण आता टेक्सटाईल उद्योगात येण्याची तयारी करत आहेत.बाजारात लवकरच पतंजलीची अंतर्वस्त्रापासून ते क्रीडा पोषाखापर्यंतची उत्पादने पाहायला मिळतील. अलवर येथे पतंजली ग्रामोद्योगाचं उद्घाटन करताना रामदेव बाबांनीच ही माहिती दिली.

अलवर- पतंजली उद्योग समुहाचे आयुर्वेदिक आणि हर्बल उत्पादन सध्या अनेक जण वापरत आहेत. पतंजलीच्या या यशस्वी उत्पादनानंतर रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण आता टेक्सटाईल उद्योगात येण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे बाजारात लवकरच पतंजलीची अंतर्वस्त्रापासून ते क्रीडा पोषाखापर्यंतची उत्पादने पाहायला मिळतील. अलवर येथे पतंजली ग्रामोद्योगाचं उद्घाटन करताना रामदेव बाबांनीच ही माहिती दिली. पतंजली लवकरच कपडे आणि टेक्सटाईल बाजारात पाऊल ठेवणार असून विदेशी कंपन्यांना ते टक्कर देतील. पतंजली अंतर्वस्त्रापासून ते पारंपारिक कपडे आणि क्रीडा पोषाख तयार करणार असल्याचं बाबा रामदेव यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे.

नुकताच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात पतंजली आयुर्वेदचे सीईओ आणि रामदेव बाबांचे सहकारी बालकृष्ण हे देशातील आठवे सर्वांत श्रीमंत व्यक्ती असल्याचं समोर आलं आहे.  बालकृष्ण यांना होणारा फायदा हा गरजूंसाठी आहे, तो फायदा आरामदायी जीवन जगण्यासाठी नाही, असं रामदेव बाबा म्हणाले आहेत.

रामदेव बाबा यांनी आपला उद्देश हा देशातील विदेशी कंपन्यांचं असलेलं वर्चस्व संपवण्याचा आहे, असंही सांगितलं. कंपनी स्वदेशी कपडे तयार करणार असून याची सुरूवातीची गुंतवणूक ही ५ हजार कोटी रूपयांची असेल. या नव्या उद्योगाच्या माध्यमातून पतंजली चांगल्या दर्जाचे कपडे लोकांसाठी आणणार आहे. यामध्ये जीन्स पँटपासून ते स्वेटरपर्यंतच्या कपड्यांचा समावेश असेल, असं पतंजलीचे प्रवक्ता एस.के. तिजोरीवाला यांनी सांगितलं आहे.  पण या कपड्याच्या ब्रँडचं नाव नेमकं काय असेल? याबद्दल अजून सांगण्यात आलेलं नाही. 

मानवी शरीर 400 वर्षे जगण्यासाठी बनलेले आहे - बाबा रामदेव

 मानवी शरीर हे ४०० वर्षे जगण्यासाठी बनलेले आहे मात्र आपण अयोग्य जीवनशैलीद्वारे आजारांना आमंत्रण देतो आणि आयुष्य लवकर संपते, असा दावा योगगुरु बाबा रामदेव यांनी केला. चांगले अन्न आणि व्यायामाच्या मदतीने रोगमुक्त जीवन जगा, असा सल्लाही बाबा रामदेव यांनी लोकांना दिला. १२ व्या नॅशनल क्वालिटी कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना रामदेव म्हणाले, "मानवी शरीर हे ४०० वर्षे जगण्यासाठी बनलेले आहे, मात्र अतिरेकी अन्न व अयोग्य जीवनशैलीने आपण त्यावर अत्याचार करतो. आपण रक्तदाब, हृदयरोग आणि इतर आजारांना आमंत्रण देतो आणि आयुष्य कमी करुन घेतो व उर्वरित वर्षे डॉक्टर व औषधांच्या मदतीने जगतो".