शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Baba Ramdev: "माझा वेळ टाटा, बिर्ला, अंबानी, अदानींपेक्षाही जास्त मौल्यवान"; असं का म्हणाले बाबा रामदेव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 17:00 IST

बाब रामदेव यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोरच केलं असं विधान

Baba Ramdev in Goa: रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांसारख्या अब्जाधीश उद्योगपतींपेक्षा आपला वेळ अधिक मौल्यवान असल्याचे योगगुरू बाबा रामदेव म्हणाले. खरे पाहता, रामदेव बाबा हे योगगुरू आणि उद्योजक आहेत. पण त्यांनी आपल्या वेळेची तुलना थेट देशातील सर्वात मोठ्या तीन-चार उद्योगपतींच्या वेळेशी केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले आहे. पण त्यांनी त्यांच्या या विधानामागचा अर्थ पटवून दिला. 

रामदेव म्हणाले की कॉर्पोरेटमधील लोक ९९ टक्के वेळ स्वतःसाठी वापरतात, तर योगसाधना करणाऱ्यांचा, संताचा वेळ हा सर्वांच्या भल्यासाठी असतो. अंबानी आणि अदानींसारख्या अब्जाधीशांनी घालवलेल्या वेळेपेक्षा माझा तीन दिवसांचा मुक्काम केल्याचा वेळ हा अधिक मोलाचा आहे. रामदेव त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या सन्मानार्थ आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे देखील उपस्थित होते.

आणखी काय म्हणाले बाबा रामदेव?

"मी हरिद्वारहून तीन दिवसांसाठी येथे आलो आहे. माझ्या वेळेची किंमत अदानी, अंबानी, टाटा आणि बिर्ला यांच्यापेक्षा जास्त आहे. कॉर्पोरेटमधील लोक हे ९९ टक्के वेळ हा स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात, तर संताचा वेळ हा सर्वांच्या भल्यासाठी वापरला जातो. अकबर, बाबर किंवा औरंगजेब नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आमचे हिरो आहेत," असे बाबा रामदेव म्हणाले.

"आम्हाला बहुतांश राज्य बोर्ड किंवा एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये चुकीचा इतिहास शिकवला गेला आहे. या पुस्तकांमध्ये मुघलांचा गौरव करण्यात आला आहे. हे बदलायला हवे. अकबर, बाबर किंवा औरंगजेब हे आमचे नायक नाहीत. आपले महान वीर छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि इतर देशासाठी बलिदान देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट महान आहे, हा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांनी कधीही कोणत्याही धर्म, वर्गाबाबत भेदभाव केला नाही, तर सर्वांना बरोबर घेऊन चालायचे," अशा शब्दात त्यांनी महापुरूषांचा गौरव केला.

"पाकिस्तानच्या आर्थिक संकटाबाबत त्यांनी शेरेबाजी केली. पाकिस्तान हा देश सध्या फारच वाईट स्थितीत आहे. पाकिस्तानने काय करावे हे आता त्यांच्या नियंत्रणात नाही. पाकिस्तानी सरकारच्या अत्यंत चुकीच्या धोरणांचा फटका त्यांना बसला आहे. त्यामुळेच हा शेजारी देश आर्थिक संकटातून जात आहे आणि त्याचे लवकरच चार भाग होणार आहेत. त्यामुळे आता तो एक छोटासा देश म्हणून शिल्लक राहील," अशी भविष्यवाणीही बाबा रामदेव यांनी केली.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाGautam Adaniगौतम अदानीMukesh Ambaniमुकेश अंबानीTataटाटा