शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Baba Ramdev: "माझा वेळ टाटा, बिर्ला, अंबानी, अदानींपेक्षाही जास्त मौल्यवान"; असं का म्हणाले बाबा रामदेव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 17:00 IST

बाब रामदेव यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोरच केलं असं विधान

Baba Ramdev in Goa: रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांसारख्या अब्जाधीश उद्योगपतींपेक्षा आपला वेळ अधिक मौल्यवान असल्याचे योगगुरू बाबा रामदेव म्हणाले. खरे पाहता, रामदेव बाबा हे योगगुरू आणि उद्योजक आहेत. पण त्यांनी आपल्या वेळेची तुलना थेट देशातील सर्वात मोठ्या तीन-चार उद्योगपतींच्या वेळेशी केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले आहे. पण त्यांनी त्यांच्या या विधानामागचा अर्थ पटवून दिला. 

रामदेव म्हणाले की कॉर्पोरेटमधील लोक ९९ टक्के वेळ स्वतःसाठी वापरतात, तर योगसाधना करणाऱ्यांचा, संताचा वेळ हा सर्वांच्या भल्यासाठी असतो. अंबानी आणि अदानींसारख्या अब्जाधीशांनी घालवलेल्या वेळेपेक्षा माझा तीन दिवसांचा मुक्काम केल्याचा वेळ हा अधिक मोलाचा आहे. रामदेव त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या सन्मानार्थ आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे देखील उपस्थित होते.

आणखी काय म्हणाले बाबा रामदेव?

"मी हरिद्वारहून तीन दिवसांसाठी येथे आलो आहे. माझ्या वेळेची किंमत अदानी, अंबानी, टाटा आणि बिर्ला यांच्यापेक्षा जास्त आहे. कॉर्पोरेटमधील लोक हे ९९ टक्के वेळ हा स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात, तर संताचा वेळ हा सर्वांच्या भल्यासाठी वापरला जातो. अकबर, बाबर किंवा औरंगजेब नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आमचे हिरो आहेत," असे बाबा रामदेव म्हणाले.

"आम्हाला बहुतांश राज्य बोर्ड किंवा एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये चुकीचा इतिहास शिकवला गेला आहे. या पुस्तकांमध्ये मुघलांचा गौरव करण्यात आला आहे. हे बदलायला हवे. अकबर, बाबर किंवा औरंगजेब हे आमचे नायक नाहीत. आपले महान वीर छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि इतर देशासाठी बलिदान देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट महान आहे, हा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांनी कधीही कोणत्याही धर्म, वर्गाबाबत भेदभाव केला नाही, तर सर्वांना बरोबर घेऊन चालायचे," अशा शब्दात त्यांनी महापुरूषांचा गौरव केला.

"पाकिस्तानच्या आर्थिक संकटाबाबत त्यांनी शेरेबाजी केली. पाकिस्तान हा देश सध्या फारच वाईट स्थितीत आहे. पाकिस्तानने काय करावे हे आता त्यांच्या नियंत्रणात नाही. पाकिस्तानी सरकारच्या अत्यंत चुकीच्या धोरणांचा फटका त्यांना बसला आहे. त्यामुळेच हा शेजारी देश आर्थिक संकटातून जात आहे आणि त्याचे लवकरच चार भाग होणार आहेत. त्यामुळे आता तो एक छोटासा देश म्हणून शिल्लक राहील," अशी भविष्यवाणीही बाबा रामदेव यांनी केली.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाGautam Adaniगौतम अदानीMukesh Ambaniमुकेश अंबानीTataटाटा