शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Baba Ramdev: "माझा वेळ टाटा, बिर्ला, अंबानी, अदानींपेक्षाही जास्त मौल्यवान"; असं का म्हणाले बाबा रामदेव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 17:00 IST

बाब रामदेव यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोरच केलं असं विधान

Baba Ramdev in Goa: रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांसारख्या अब्जाधीश उद्योगपतींपेक्षा आपला वेळ अधिक मौल्यवान असल्याचे योगगुरू बाबा रामदेव म्हणाले. खरे पाहता, रामदेव बाबा हे योगगुरू आणि उद्योजक आहेत. पण त्यांनी आपल्या वेळेची तुलना थेट देशातील सर्वात मोठ्या तीन-चार उद्योगपतींच्या वेळेशी केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले आहे. पण त्यांनी त्यांच्या या विधानामागचा अर्थ पटवून दिला. 

रामदेव म्हणाले की कॉर्पोरेटमधील लोक ९९ टक्के वेळ स्वतःसाठी वापरतात, तर योगसाधना करणाऱ्यांचा, संताचा वेळ हा सर्वांच्या भल्यासाठी असतो. अंबानी आणि अदानींसारख्या अब्जाधीशांनी घालवलेल्या वेळेपेक्षा माझा तीन दिवसांचा मुक्काम केल्याचा वेळ हा अधिक मोलाचा आहे. रामदेव त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या सन्मानार्थ आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे देखील उपस्थित होते.

आणखी काय म्हणाले बाबा रामदेव?

"मी हरिद्वारहून तीन दिवसांसाठी येथे आलो आहे. माझ्या वेळेची किंमत अदानी, अंबानी, टाटा आणि बिर्ला यांच्यापेक्षा जास्त आहे. कॉर्पोरेटमधील लोक हे ९९ टक्के वेळ हा स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात, तर संताचा वेळ हा सर्वांच्या भल्यासाठी वापरला जातो. अकबर, बाबर किंवा औरंगजेब नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आमचे हिरो आहेत," असे बाबा रामदेव म्हणाले.

"आम्हाला बहुतांश राज्य बोर्ड किंवा एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये चुकीचा इतिहास शिकवला गेला आहे. या पुस्तकांमध्ये मुघलांचा गौरव करण्यात आला आहे. हे बदलायला हवे. अकबर, बाबर किंवा औरंगजेब हे आमचे नायक नाहीत. आपले महान वीर छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि इतर देशासाठी बलिदान देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट महान आहे, हा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांनी कधीही कोणत्याही धर्म, वर्गाबाबत भेदभाव केला नाही, तर सर्वांना बरोबर घेऊन चालायचे," अशा शब्दात त्यांनी महापुरूषांचा गौरव केला.

"पाकिस्तानच्या आर्थिक संकटाबाबत त्यांनी शेरेबाजी केली. पाकिस्तान हा देश सध्या फारच वाईट स्थितीत आहे. पाकिस्तानने काय करावे हे आता त्यांच्या नियंत्रणात नाही. पाकिस्तानी सरकारच्या अत्यंत चुकीच्या धोरणांचा फटका त्यांना बसला आहे. त्यामुळेच हा शेजारी देश आर्थिक संकटातून जात आहे आणि त्याचे लवकरच चार भाग होणार आहेत. त्यामुळे आता तो एक छोटासा देश म्हणून शिल्लक राहील," अशी भविष्यवाणीही बाबा रामदेव यांनी केली.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाGautam Adaniगौतम अदानीMukesh Ambaniमुकेश अंबानीTataटाटा