शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आझम खान यांनी मागितली माफी, लोकसभेत आळवला नरमाईचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 07:12 IST

आझम खान यांनी माफी मागावी अशी मागणी अनेक पक्षांच्या खासदारांनी केली होती.

नवी दिल्ली : भाजपच्या खासदार रमादेवी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह उद्गार काढल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी अखेर लोकसभेत सोमवारी माफी मागितली आहे. तिहेरी तलाक विधेयकाच्या मुद्द्यावर गुरुवारी लोकसभेत चर्चा सुरू असताना पीठासीन अधिकारी रमादेवी यांच्याबद्दल आझम खान यांनी अत्यंत गलिच्छ उद्गार काढले. त्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता.

आझम खान यांनी माफी मागावी अशी मागणी अनेक पक्षांच्या खासदारांनी केली होती. आझम खान यांनी माफी मागावी असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू होताच त्यांना सांगितले. त्यावेळी आझम खान म्हणाले की, मी नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलो होतो. राज्यसभेचाही सदस्य होतो. त्यामुळे संसदीय कामकाज कसे चालते याचा मला जाण आहे. कोणाच्याही भावना दुखवायचा माझा हेतू नव्हता. तरी देखील माझ्याकडून चूक झाली असे कोणाला वाटत असेल तर मी माफी मागतो. मात्र त्यांचे काही शब्द स्पष्टपणे ऐकू न आल्याने त्यांची माफीचा पुनरुच्चार करावा अशी मागणी संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली. त्याला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विरोध केला. मात्र जोशी यांची मागणी मान्य करून लोकसभा अध्यक्षांनी आझम खान यांना माफीचा पुनरुच्चार करायला लावला.

गलिच्छ शेरेबाजी करण्याची आझमखान यांना सवय : रमादेवीमहिलांबद्दल गलिच्छ शेरेबाजी करण्याची आझम खान यांना सवयच आहे असा टोला भाजप खासदार रमादेवी यांनी त्यांना लोकसभेतच लगावला. त्या म्हणाल्या की, सभागृहाबाहेर महिलांबाबत गलिच्छ उद्गार काढण्याचे प्रकार आझम खान यांच्याकडून अनेकदा घडले आहेत. यावेळी फरक इतकाच की त्यांनी ती कृती लोकसभेत केली. आझम खान यांनी काढलेल्या उद्गारांमुळे सर्वांनाच वेदना झाल्या. अशी घाणेरडी वक्तव्ये ऐकण्यासाठी आपण सभागृहात येत नाही असेही रमादेवी यांनी आझम खान यांना सुनावले. 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभा