शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘आयुष्यमान’चा समाजातील शेवटच्या घटकाला लाभ - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 03:52 IST

आयुष्यमान भारत मिशन हे खऱ्या अर्थाने ‘एक भारत’ आणि सर्वांना समान उपचार पद्धतीच्या भावनेने समाजातील अखेरच्या रांगेत उभ्या व्यक्तीला चांगल्या आरोग्य सेवा सुनिश्चित करणारी योजना असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे रविवारी स्पष्ट केले.

रांची : आयुष्यमान भारत मिशन हे खऱ्या अर्थाने ‘एक भारत’ आणि सर्वांना समान उपचार पद्धतीच्या भावनेने समाजातील अखेरच्या रांगेत उभ्या व्यक्तीला चांगल्या आरोग्य सेवा सुनिश्चित करणारी योजना असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे रविवारी स्पष्ट केले.स्थानिक प्रभात तारा मैदानावर आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ करताना ते म्हणाले की, या योजनेत धर्म-संप्रदाय, जाती, उच्च-नीच असा भेदभाव असणार नाही. कोणत्याही जातीची, घटकाची किंवा संप्रदायाची व्यक्ती असो आरोग्य सेवा देताना भेदभाव होणार नाही. सर्वांना आरोग्य योजनेचा लाभ मिळणार असल्याची ग्वाही देतानाच त्यांनी हाच ‘सबका साथ, सबका विकास’ असल्याचे नमूद केले.देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकांनी ‘गरिबी हटाओ’चे नारे ऐकले. गरिबांच्या नावावर राजकारण करण्याऐवजी गरिबांच्या सशक्तीकरणावर भर दिला गेला असता तर देशाची आज ही स्थिती राहिली नसती. दरम्यान, मोदी यांनी चैबासा आणि कादेरमा येथे दोन वैद्यकीय महाविद्यालयांचा शिलान्यास केला.जगातील सर्वात मोठी योजना...देशातील ५० कोटींपेक्षा जास्त लोकांना ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा योजनेचा लाभ देणारी आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या संपूर्ण युरोपीय संघाच्या एकूण लोकसंख्येएवढी आहे. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या तीन देशांची एकूण लोकसंख्या जोडली तरी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या जवळपास जाणारी असेल. या योजनेचा पहिला टप्पा एप्रिलमध्ये सुरू करण्यात आला, त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती. याच मालिकेत पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली त्यावेळी दीनदयाल उपाध्याय यांची जयंती होती. त्यामुळे आयुष्यमान भारत योजनेचे दोन महापुरुषांशी नाते आहे, असा उल्लेखही मोदींनी केला. (वृत्तसंस्था)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आयुष्यमान भारत योजना ऐतिहासिक असून, या योजनेने देशातील गरिबांना सन्मानाने जगण्याचा अधिकार बहाल करण्याचे काम केले आहे. भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. - अमित शहा, भाजपचे अध्यक्ष.काय आहेत वैशिष्ट्ये....या योजनेशी जोडली गेलेली व्यक्ती कोणत्याही राज्यात या योजनेचा लाभ घेऊ शकेल.आतापर्यंत देशभरातील १३ हजारावर रुग्णालये जोडली गेली आहेत.कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंड, यकृत, मधुमेहासह एकूण १३०० पेक्षा जास्त आजारांवर इलाज.गंभीर आजारांवर केवळ सरकारीच नव्हे तर खासगी रुग्णालयांमध्येही उपचार.एकूण ५ लाखापर्यंत खर्चाची तरतूद राहणार असून तपासणी, औषधे आणि रुग्णालयात दाखल होण्यासह त्यापूर्वीचा खर्चही समाविष्ट असेल. आधीपासून कोणताही आजार असेल तर त्यावरील खर्चही जोडला जाईल.१४५५५ या नंबरवर फोन करून नजीकच्या सामान्य सेवा केंद्रातून या योजनांची माहिती मिळवता येईल.मोदींनी रांचीमध्ये १० वेलनेस सेंटर्सचा शुभारंभ केला. झारखंडमध्ये अशी ४० केंद्रे कार्यरत असून, देशभरातील संख्या २३०० च्या घरात गेली आहे.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतNarendra Modiनरेंद्र मोदी