शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

राम मंदिर बांधल्यानंतरच लग्न करण्याचा केला होता संकल्प; आता 33 वर्षांनी झाला विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 11:00 IST

एका कपलने 33 वर्षांपूर्वी अयोध्येत राम मंदिर बांधले जाईल आणि रामलला विराजमान होतील तेव्हाच लग्न करू, असा संकल्प केला होता. आता या कपलचा संकल्प पूर्ण झाला आहे.

राजस्थानमध्ये राहणाऱ्या एका कपलने 33 वर्षांपूर्वी अयोध्येत राम मंदिर बांधले जाईल आणि रामलला विराजमान होतील तेव्हाच लग्न करू, असा संकल्प केला होता. आता या कपलचा संकल्प पूर्ण झाला आहे. अयोध्येच्या कारसेवकपुरम परिसरात त्यांनी विवाह केला आहे. या लग्नाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

जयपूर, राजस्थानचे रहिवासी असलेले डॉ. महेंद्र भारती हे 1990 साली लग्नासाठी पात्र झाले होते, पण त्याचवेळी कारसेवकांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने ते खूप व्यथित झाले. त्यांनी त्याचवेळी एक संकल्प केला होता. जोपर्यंत अयोध्येत भगवान रामाचे भव्य मंदिर बांधले जात नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असा संकल्प केला होता. 

रामलला विराजमान झाल्यानंतर आता डॉ. महेंद्र भारती यांनी अजमेर येथील रहिवासी असलेल्या डॉ. शालिनी गौतम यांच्याशी अयोध्येत लग्न केलं आहे. 33 वर्षांनी हा संकल्प पूर्ण झाल्यानंतर या कपलने लग्न केलं. 

डॉ. महेंद्र हे 20 वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. त्यांची जीवनसाथी शालिनी गौतम कॉलेजमध्ये शिकवते. लग्नासाठी यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही, असंही ते म्हणाले. सनातन संस्कृतीच्या पुनर्स्थापनेचा हा काळ आहे. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही हे खूप महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे.

डॉ. महेंद्र भारती म्हणाले की, मी खूप आनंदी आहे, खूप भारावून गेलो आहे. हा क्षण माझ्या आयुष्यात शुभसंकेत म्हणून आला आहे. 1990 मध्ये मी संकल्प केला होता की प्रभू श्री रामाचे मंदिर बांधले जाईल तेव्हाच मी लग्न करेन आणि भव्य मंदिरात त्यांचे दर्शन घेईन. माझी इच्छा पूर्ण झाली आहे.   

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याmarriageलग्न