शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

Ayodhya Verdict : ऐतिहासिक निकालानंतर सुटणार तब्बल 27 वर्षांचा उपवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 08:51 IST

अयोध्या निकालानंतर आता तब्बल 27 वर्षांचा उपवास सुटणार आहे.

ठळक मुद्देअयोध्या निकालानंतर आता तब्बल 27 वर्षांचा उपवास सुटणार आहे. राम मंदिर व्हावे यासाठी केवळ दूध आणि फळे खाऊन उपवास करणाऱ्या जबलपूरच्या 81 वर्षीय आजींनी निकालानंतर उपवास सोडण्याचा निर्णय घेतला.ऊर्मिला चतुर्वेदी असं 81 वर्षीय आजींचं नाव असून त्या संस्कृत शिक्षिका आहेत.

जबलपूर - संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. निकालानंतर अयोध्येमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे. कित्येक दशकांपासून न्यायालयात अयोध्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अयोध्या निकालानंतर आता तब्बल 27 वर्षांचा उपवास सुटणार आहे. राम मंदिर व्हावे यासाठी केवळ दूध आणि फळे खाऊन उपवास करणाऱ्या जबलपूरच्या 81 वर्षीय आजींनी निकालानंतर उपवास सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

ऊर्मिला चतुर्वेदी असं 81 वर्षीय आजींचं नाव असून त्या संस्कृत शिक्षिका आहेत. गेल्या 27 वर्षांपासून त्या उपवास करत होत्या. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नियमित आहार घेतील अशी माहिती चतुर्वेदी यांच्या मुलाने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या प्रकरणावरील निकालानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना धन्यवाद देणारे पत्र देखील चतुर्वेदी पाठवणार आहेत. ऊर्मिला यांच्या मुलाने त्यांच्या उपवासाची माहिती दिली आहे. 

'माझी आई गेल्या 27 वर्षांपासून फळे आणि दूध घेऊन जगत आहे. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी हा उपवास केला. आई रामभक्त असून, अयोध्येत मंदिर व्हावे यासाठी तिने हा निर्णय घेतला होता. निकालानंतर आईने समाधान व्यक्त केले आहे' अशी माहिती ऊर्मिला यांच्या मुलाने दिली आहे. तसेच उपवास सोडण्यासाठी ऊर्मिला यांचे कुटुंबीय एक सोहळा आयोजित करणार आहेत. कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक संघटनेशी ऊर्मिला संबंधित नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचा निर्णय न्यायालयानं सुनावला. तीन महिन्यात राम मंदिराच्या उभारणीसाठी योजना आखा. एक न्यास स्थापन करुन मंदिर निर्माणाचा आराखडा द्या, अशा सूचना न्यायालयानं दिल्या आहेत. शिया वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्यात यावी, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच इतरत्र पाच एकर जमीन दिली जावी आणि ती मोक्याची असावी, असं न्यायालयानं निकालाचं वाचन करताना म्हटलं. सुन्नी वक्फ बोर्डानं न्यायालयाच्या या निकालाचं स्वागत केलं आहे. हिंदू पक्षकारांनीदेखील न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत यामधून विविधतेतील एकता जपली गेल्याचं म्हटलं आहे.

तत्पूर्वी न्यायालयात निकाल वाचन सुरू होताच शिया वक्फ बोर्डाचा दावा फेटाळण्यात आला. शिया आणि सुन्नी या दोन समुदायांमध्ये वाद होता. वादग्रस्त जमीन सुन्नी वक्फ बोर्डची नसून आमची आहे असा शिया बोर्डचा दावा होता. तो आधी अलाहाबाद उच्च न्यायालयानं फेटाळला होता. त्यामुळे शिया बोर्डनं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानंदेखील त्यांचा दावा फेटाळला. याशिवाय निर्मोही आखाड्याचा दावादेखील न्यायालयानं फेटाळून लावला आहे.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयRam Mandirराम मंदिर