शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

९ वर्षांचा संकल्प फळला! रामलल्लाचा अभिषेक, महाआरतीला पाठवले ६०० किलो तूप, १०८ कलश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:03 IST

Ayodhya Ram Mandir: ६ महिने परिश्रमाने साकारण्यात आलेल्या ११ रथांतून ६०० किलो तूप अयोध्येला पाठवण्यात आले आहे.

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा राम मंदिरात केली जाणार आहे. जसजसे दिवस पुढे जात आहेत, तसे यासंदर्भातील तयारीला वेग आला आहे. या सोहळ्यासाठी हजारो भाविक अयोध्येत येणार आहेत. राम मंदिर आणि रामलल्ला प्राणप्रतिष्ठा यांमध्ये आपलाही काही खारीचा वाटा असावा, असे अनेकांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर आता अभिषेक आणि महाआरतीसाठी जोधपूरहून ६०० किलो तूप पाठवले जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पारंपरिक पद्धतीने बैलगाडी सजवून याचे १०८ कलश अयोध्येकडे रवाना करण्यात आले आहेत. १०८ कलशांमध्ये हे ६०० किलो तूप पाठवण्यात आले आहे. यामध्ये वापरण्यात आलेल्या बैलगाड्यांना रथाचे स्वरुप देण्यात आले आहे. हे कलश रवाना करण्यापूर्वी पूजन, आरती करण्यात आली. जोधपूरमधील श्री श्री महर्षी संदीपनी रामधर्म गोशालाचे संचालक महर्षी संदीपनी महाराज यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 

११ रथांमधून ६०० किलो तूप अयोध्येला पाठवण्यात आले

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शेकडो रामभक्त अयोध्येला रवाना झाले आहेत. ११ रथांमध्ये १०८ कलशांसह १०८ शिवलिंग ठेवण्यात आले आहेत. यासह गणपती बाप्पा, रामभक्त हनुमान यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या आहेत. उत्तर भारतात वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत देव दिवाळी साजरी केली जाते. या देव दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर हे ११ रथ अयोध्येकडे रवाना करण्यात आले. 

दरम्यान, जानेवारी २०२४ मध्ये राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. आमच्या येथे असलेल्या गोठ्यांमधून तयार केलेले तूप रामलल्लाच्या आरती आणि हवनात वापरले जाईल. जोधपूरहून तूप पाठवले गेले ही भाग्याची गोष्ट आहे. गोशाळेतून ११ विशेष रथ रवाना करण्यात आले. ६ महिन्यांपासून रथ साकारण्याची तयारी सुरू होती. या प्रत्येक रथाची किंमत ३.५ लाख रुपये आहे. ९ वर्षांपूर्वी याचा संकल्प केला गेला होता. अयोध्येत जेव्हाही राम मंदिर बांधले जाईल, तेव्हा या ठिकाणाहून शुद्ध देशी तूप पाठवले जाईल. राम मंदिरात त्याच तुपाने मंदिराची अखंड ज्योत प्रज्वलित होणार आहे, असे महर्षी संदीपनी महाराज यांनी सांगितले. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या