शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
4
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
5
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
6
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
7
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
8
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
9
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
10
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
11
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
12
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
13
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
15
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
16
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
17
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
18
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
19
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
20
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!

९ वर्षांचा संकल्प फळला! रामलल्लाचा अभिषेक, महाआरतीला पाठवले ६०० किलो तूप, १०८ कलश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:03 IST

Ayodhya Ram Mandir: ६ महिने परिश्रमाने साकारण्यात आलेल्या ११ रथांतून ६०० किलो तूप अयोध्येला पाठवण्यात आले आहे.

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा राम मंदिरात केली जाणार आहे. जसजसे दिवस पुढे जात आहेत, तसे यासंदर्भातील तयारीला वेग आला आहे. या सोहळ्यासाठी हजारो भाविक अयोध्येत येणार आहेत. राम मंदिर आणि रामलल्ला प्राणप्रतिष्ठा यांमध्ये आपलाही काही खारीचा वाटा असावा, असे अनेकांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर आता अभिषेक आणि महाआरतीसाठी जोधपूरहून ६०० किलो तूप पाठवले जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पारंपरिक पद्धतीने बैलगाडी सजवून याचे १०८ कलश अयोध्येकडे रवाना करण्यात आले आहेत. १०८ कलशांमध्ये हे ६०० किलो तूप पाठवण्यात आले आहे. यामध्ये वापरण्यात आलेल्या बैलगाड्यांना रथाचे स्वरुप देण्यात आले आहे. हे कलश रवाना करण्यापूर्वी पूजन, आरती करण्यात आली. जोधपूरमधील श्री श्री महर्षी संदीपनी रामधर्म गोशालाचे संचालक महर्षी संदीपनी महाराज यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 

११ रथांमधून ६०० किलो तूप अयोध्येला पाठवण्यात आले

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शेकडो रामभक्त अयोध्येला रवाना झाले आहेत. ११ रथांमध्ये १०८ कलशांसह १०८ शिवलिंग ठेवण्यात आले आहेत. यासह गणपती बाप्पा, रामभक्त हनुमान यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या आहेत. उत्तर भारतात वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत देव दिवाळी साजरी केली जाते. या देव दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर हे ११ रथ अयोध्येकडे रवाना करण्यात आले. 

दरम्यान, जानेवारी २०२४ मध्ये राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. आमच्या येथे असलेल्या गोठ्यांमधून तयार केलेले तूप रामलल्लाच्या आरती आणि हवनात वापरले जाईल. जोधपूरहून तूप पाठवले गेले ही भाग्याची गोष्ट आहे. गोशाळेतून ११ विशेष रथ रवाना करण्यात आले. ६ महिन्यांपासून रथ साकारण्याची तयारी सुरू होती. या प्रत्येक रथाची किंमत ३.५ लाख रुपये आहे. ९ वर्षांपूर्वी याचा संकल्प केला गेला होता. अयोध्येत जेव्हाही राम मंदिर बांधले जाईल, तेव्हा या ठिकाणाहून शुद्ध देशी तूप पाठवले जाईल. राम मंदिरात त्याच तुपाने मंदिराची अखंड ज्योत प्रज्वलित होणार आहे, असे महर्षी संदीपनी महाराज यांनी सांगितले. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या