शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

९ वर्षांचा संकल्प फळला! रामलल्लाचा अभिषेक, महाआरतीला पाठवले ६०० किलो तूप, १०८ कलश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:03 IST

Ayodhya Ram Mandir: ६ महिने परिश्रमाने साकारण्यात आलेल्या ११ रथांतून ६०० किलो तूप अयोध्येला पाठवण्यात आले आहे.

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा राम मंदिरात केली जाणार आहे. जसजसे दिवस पुढे जात आहेत, तसे यासंदर्भातील तयारीला वेग आला आहे. या सोहळ्यासाठी हजारो भाविक अयोध्येत येणार आहेत. राम मंदिर आणि रामलल्ला प्राणप्रतिष्ठा यांमध्ये आपलाही काही खारीचा वाटा असावा, असे अनेकांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर आता अभिषेक आणि महाआरतीसाठी जोधपूरहून ६०० किलो तूप पाठवले जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पारंपरिक पद्धतीने बैलगाडी सजवून याचे १०८ कलश अयोध्येकडे रवाना करण्यात आले आहेत. १०८ कलशांमध्ये हे ६०० किलो तूप पाठवण्यात आले आहे. यामध्ये वापरण्यात आलेल्या बैलगाड्यांना रथाचे स्वरुप देण्यात आले आहे. हे कलश रवाना करण्यापूर्वी पूजन, आरती करण्यात आली. जोधपूरमधील श्री श्री महर्षी संदीपनी रामधर्म गोशालाचे संचालक महर्षी संदीपनी महाराज यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 

११ रथांमधून ६०० किलो तूप अयोध्येला पाठवण्यात आले

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शेकडो रामभक्त अयोध्येला रवाना झाले आहेत. ११ रथांमध्ये १०८ कलशांसह १०८ शिवलिंग ठेवण्यात आले आहेत. यासह गणपती बाप्पा, रामभक्त हनुमान यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या आहेत. उत्तर भारतात वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत देव दिवाळी साजरी केली जाते. या देव दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर हे ११ रथ अयोध्येकडे रवाना करण्यात आले. 

दरम्यान, जानेवारी २०२४ मध्ये राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. आमच्या येथे असलेल्या गोठ्यांमधून तयार केलेले तूप रामलल्लाच्या आरती आणि हवनात वापरले जाईल. जोधपूरहून तूप पाठवले गेले ही भाग्याची गोष्ट आहे. गोशाळेतून ११ विशेष रथ रवाना करण्यात आले. ६ महिन्यांपासून रथ साकारण्याची तयारी सुरू होती. या प्रत्येक रथाची किंमत ३.५ लाख रुपये आहे. ९ वर्षांपूर्वी याचा संकल्प केला गेला होता. अयोध्येत जेव्हाही राम मंदिर बांधले जाईल, तेव्हा या ठिकाणाहून शुद्ध देशी तूप पाठवले जाईल. राम मंदिरात त्याच तुपाने मंदिराची अखंड ज्योत प्रज्वलित होणार आहे, असे महर्षी संदीपनी महाराज यांनी सांगितले. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या