शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

जय श्रीराम! राम मंदिरासाठी 'भीष्म प्रतिज्ञा'; तब्बल 31 वर्षांनंतर रामभक्त करणार अन्नग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 12:01 IST

7 सप्टेंबर 1992 रोजी वीरेंद्र कुमार बैठा उर्फ ​​झमेली बाबा यांनी शपथ घेतली होती की, राम मंदिर बांधलं जाईपर्यंत केवळ फळांवरच जगतील.

बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील बहादूरपूर ब्लॉकच्या खैरा गावात राहणारे वीरेंद्र कुमार बैठा उर्फ ​​झमेली बाबा 31 वर्षांनंतर अन्नग्रहण करणार आहेत. हे कारसेवक 31 वर्षांपासून फळं खाऊन आपलं जीवन जगत आहेत. जेव्हा प्रभू श्री राम आपल्या घरात प्रवेश करतील, तेव्हा ते स्वतःच्या हाताने जेवण बनवतील आणि ते अन्न खाऊन आपली तपश्चर्या पूर्ण करतील. झमेली बाबांची 31 वर्षांची तपश्चर्या 22 जानेवारीला पूर्ण होत आहे.

7 सप्टेंबर 1992 रोजी वीरेंद्र कुमार बैठा उर्फ ​​झमेली बाबा यांनी शपथ घेतली होती की, राम मंदिर बांधलं जाईपर्यंत केवळ फळांवरच जगतील. ज्या दिवशी मंदिर बांधलं जाईल आणि रामलल्ला विराजमान होतील, त्या दिवशी अन्नग्रहण करणार. आत्तापर्यंत झमेली बाबा एक छोटंस पान दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यांनी लग्नही केलं नसून समाजासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे. 

झमेली बाबा यांनी सांगितलं की, ते लहानपणापासून स्वयंसेवक आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनावरून ते दरभंगा येथून सुमारे अडीचशे कारसेवकांसह अयोध्येला रवाना झाले. सरयू नदीत स्नान केल्यानंतर अयोध्येत भव्य राम मंदिर बांधलं जावं या इच्छेने त्यांनी अन्नत्याग करण्याचा संकल्प केला. यावेळी जवळच्या स्टुडिओत फोटो काढला, तिथे पैसे दिल्यानंतर स्टुडिओ मालकाने तुमचं नाव आणि पत्ता लिहा, तो फोटो पोस्टाने पाठवतो, असं सांगितले. हा फोटो काही दिवसांनी पोस्टाने मिळाला. आजही त्यांनी तो ठेवला आहे. 

8 डिसेंबर 1992 रोजी ते आपल्या काही साथीदारांसह अयोध्येहून दरभंगा येथे पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, येथेही पोलीस त्या लोकांचा शोध घेत होते. लहेरियासराय स्थानकावरून रेल्वेमार्गे बलभद्रपूर आरएसएस कार्यालय गाठलं. यानंतर त्यांचा जीव वाचला. झमेली बाबा यांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे. त्यांना राम मंदिराचं निमंत्रण देखील मिळालं आहे. ते आता अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाची पूजा करणार आहेत.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या