शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

“वक्फ बोर्डाची प्रत्येक इंच जमीन गरिबांना...”; राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचे रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:26 IST

Ayodhya Ram Mandir Acharya Satyendra Nath Das News: वक्फ बोर्डाबाबत आचार्य सत्येंद्र दास यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचे समर्थन केले.

Ayodhya Ram Mandir Acharya Satyendra Nath Das News: उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिरातील रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामललावर अभिषेक केला. २२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. परंतु, हिंदू पंचांगातील 'तिथी'नुसार यंदाचा वर्धापन सोहळा ११ ते १३ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला.

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितले की, राम मंदिराच्या उभारणीनंतर मागील वर्षभराच्या कालखंडात देश-विदेशातील ३ कोटींहून अधिक भक्तांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. या मंदिराचे तीन मजले पूर्ण झाले आहेत. सध्या मंदिराच्या शिखराचे काम सुरू असून, ते दोन महिन्यांत पूर्ण होईल. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया देतान वक्फ बोर्डाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. 

वक्फ बोर्डाची प्रत्येक इंच जमीन गरिबांना द्या

वक्फ बोर्डाबाबत आचार्य सत्येंद्र दास यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचे समर्थन केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फ बोर्डाला 'माफिया बोर्ड' म्हटले होते. यावर बोलताना आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे विधान बरोबर आहे. क रण वक्फ बोर्डाची बहुतेक जमीन वादग्रस्त राहिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या एका निर्णयाचे स्वागत करताना ते म्हणाले की, प्रत्येक इंच जमीन गरिबांना दिली जाईल.

दरम्यान, आचार्य सत्येंद्र दास यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आणि सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकात असूनही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला. मुख्यमंत्र्यांचा प्रयागराजमध्येही एक कार्यक्रम होता, परंतु त्यांनी रामलला प्राणप्रतिष्ठा उत्सवाला उपस्थिती लावली, यावरून त्यांचे समर्पण आणि योगदान दिसून येते. 

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरyogi adityanathयोगी आदित्यनाथwaqf board amendment billवक्फ बोर्डAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश