शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सुटीनंतर सर्वोच्च न्यायालयासमोर येणार अयोध्या, राफेलचा खटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 05:35 IST

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात सध्या न्यायमूर्तींची सर्व ३१ पदे भरलेली आहेत.

नवी दिल्ली : सहा आठवड्यांच्या दीर्घ सुटीनंतर १ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय पुन्हा सुरू होणार असून, अयोध्येतील जमिनीचा वाद, राफेल घोटाळ्याची पुनरावलोकन याचिका आणि ‘चौकीदार चोर है’प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातील न्यायालयीन बेअदबीचाखटला यासारखे काही महत्त्वाचे खटले न्यायालयासमोर येणार आहेत.सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात सध्या न्यायमूर्तींची सर्व ३१ पदे भरलेली आहेत. न्यायालयासमोर असलेली राफेल घोटाळ्याची फेरविचार याचिका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांनी दाखल केलेली आहेत.ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण हे त्यांच्या वतीने काम पाहत आहेत. ३६ राफेल विमानांच्या खरेदीला आव्हान देणा-या याचिका फेटाळणा-या १४ डिसेंबर २०१८ रोजीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.‘चौकीदार चौर है’ हे आता न्यायालयानेही मान्य केले आहे, या राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या विरुद्ध भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या न्यायालयीन अवमान याचिकेवर सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पीठ सुनावणी घेणार आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांनी याआधीच माफी मागितली आहे.

पाचसदस्यीय पीठासमोर आहे प्रकरण- अयोध्या जमीन वादाचा खटला सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील पाचसदस्यीय पीठासमोर आहे. मध्यस्थीच्या माध्यमातून काही तोडगा काढता येतो का, हे अजमावून पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीनसदस्यीय समिती स्थापन केलेली आहे.- माजी न्या. एफ. एम. आय. कलीफउल्ला यांच्या नेतृत्वाखालील या समितीवर आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि वरिष्ठ वकील श्रीराम पांचू यांचा समावेश आहे. समितीला १५ आॅगस्टपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. समिती इन-कॅमेरा सुनावणी घेत आहे. समिती काय अहवाल देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय